शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात ५६ जणांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:21 IST

पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : वीज पडून सर्वाधिक ३७ जणांचा मृत्यू, ५४ नागरिक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.नदी, नाल्यांना येणारा पूर, अतिवृष्टी, झाडे व घर कोसळणे यासह वीज पडणे यासारख्या नैसर्गिक संकटांना दरवर्षीच नागरिकांना तोंड द्यावे लागते. सुविधांच्या अभावामुळे पुराच्या वेढ्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे एक आव्हानच असते. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. वैनगंगा, खोब्रागडी, कठानी, इंद्रावती, र्पकोटा, सती या नद्यांसह अनेक उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. पावसाळ्यात या नद्यांना येणारे पूर नदीकाठावरच्या नागरिकांसाठीच नाही तर नदी ओलांडून जावे लागणाऱ्या अनेक गावांसाठीही मोठे अडचणीचे ठरतात. आपत्ती निवारण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात पुरात वाहून गेल्याने १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात वर्ष २०१३ मध्ये ७, २०१४ मध्ये ३ आणि २०१६ मध्ये ५ लोकांचा बळी गेला आहे. मात्र २०१५ आणि २०१७ मध्ये पुरात कोणालाही प्राण गमवावे लागले नाही. अतिवृष्टीमुळे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घर आणि झाड पडल्याने २०१३ मध्ये २ आणि २०१४ मध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले. यानंतर घरे आणि झाडे पडण्याच्या अनेक घटना झाल्या, पण यात जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक वीज पडून मरण पावणाºयांची संख्या ३७ आहे. तर ५४ जण जखमी झाले आहेत. यासोबतच काही प्राण्यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस