शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

पाच वर्षात ५६ जणांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:21 IST

पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : वीज पडून सर्वाधिक ३७ जणांचा मृत्यू, ५४ नागरिक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.नदी, नाल्यांना येणारा पूर, अतिवृष्टी, झाडे व घर कोसळणे यासह वीज पडणे यासारख्या नैसर्गिक संकटांना दरवर्षीच नागरिकांना तोंड द्यावे लागते. सुविधांच्या अभावामुळे पुराच्या वेढ्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे एक आव्हानच असते. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. वैनगंगा, खोब्रागडी, कठानी, इंद्रावती, र्पकोटा, सती या नद्यांसह अनेक उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. पावसाळ्यात या नद्यांना येणारे पूर नदीकाठावरच्या नागरिकांसाठीच नाही तर नदी ओलांडून जावे लागणाऱ्या अनेक गावांसाठीही मोठे अडचणीचे ठरतात. आपत्ती निवारण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात पुरात वाहून गेल्याने १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात वर्ष २०१३ मध्ये ७, २०१४ मध्ये ३ आणि २०१६ मध्ये ५ लोकांचा बळी गेला आहे. मात्र २०१५ आणि २०१७ मध्ये पुरात कोणालाही प्राण गमवावे लागले नाही. अतिवृष्टीमुळे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घर आणि झाड पडल्याने २०१३ मध्ये २ आणि २०१४ मध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले. यानंतर घरे आणि झाडे पडण्याच्या अनेक घटना झाल्या, पण यात जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक वीज पडून मरण पावणाºयांची संख्या ३७ आहे. तर ५४ जण जखमी झाले आहेत. यासोबतच काही प्राण्यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस