शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात ५६ जणांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:21 IST

पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

ठळक मुद्देनैसर्गिक आपत्ती : वीज पडून सर्वाधिक ३७ जणांचा मृत्यू, ५४ नागरिक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाळा आला की अनेक गावातील नागरिकांचा जीव टांगणीला लागतो. जिल्ह्यातील भामरागडसह इतर काही तालुक्यांमध्ये पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त आहे. यात गेल्या ५ वर्षात ५६ जणांना आपले प्राण गमवावे लागले.नदी, नाल्यांना येणारा पूर, अतिवृष्टी, झाडे व घर कोसळणे यासह वीज पडणे यासारख्या नैसर्गिक संकटांना दरवर्षीच नागरिकांना तोंड द्यावे लागते. सुविधांच्या अभावामुळे पुराच्या वेढ्यात सापडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविणे एक आव्हानच असते. गडचिरोली जिल्ह्यात ७८ टक्के भूभाग जंगलाने व्यापलेला आहे. वैनगंगा, खोब्रागडी, कठानी, इंद्रावती, र्पकोटा, सती या नद्यांसह अनेक उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. पावसाळ्यात या नद्यांना येणारे पूर नदीकाठावरच्या नागरिकांसाठीच नाही तर नदी ओलांडून जावे लागणाऱ्या अनेक गावांसाठीही मोठे अडचणीचे ठरतात. आपत्ती निवारण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात पुरात वाहून गेल्याने १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात वर्ष २०१३ मध्ये ७, २०१४ मध्ये ३ आणि २०१६ मध्ये ५ लोकांचा बळी गेला आहे. मात्र २०१५ आणि २०१७ मध्ये पुरात कोणालाही प्राण गमवावे लागले नाही. अतिवृष्टीमुळे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घर आणि झाड पडल्याने २०१३ मध्ये २ आणि २०१४ मध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावे लागले. यानंतर घरे आणि झाडे पडण्याच्या अनेक घटना झाल्या, पण यात जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक वीज पडून मरण पावणाºयांची संख्या ३७ आहे. तर ५४ जण जखमी झाले आहेत. यासोबतच काही प्राण्यांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस