शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

५२६ घरकुले मंजूर; गरजू, गरिबांचे 'गृह'स्वप्न होणार पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:07 IST

रमाई आवास योजना : १ हजार घरकुलांचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : असावे घर ते आपुले छान...या प्रमाणे डोक्यावर हक्काचे छत असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत एक हजार जणांचे घराचं स्वप्न साकार होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५२६ घरकुलांना मंजुरी मिळाली असून लाभार्थ्यांना लवकरच अनुदान वाटप केले जाणार आहे.१.२० लाख रुपये घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना मिळतात. बांधकामाच्या टप्प्यानुसार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते.

रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध कुटुंबांना स्वतःच्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर पक्के घर बांधून दिले जाते. ही योजना ग्रामीण आणि शहरी भागात राबवली जाते. या योजनेअंतर्गत २६९ चौरस फुटाचे पक्के घर बांधून दिले जाते. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध कुटुंबांचे राहणीमान उंचावणे आणि निवाऱ्याचा प्रश्न सुटणे हे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात एक हजार घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५२६ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत लोखंड, सिमेंट, विटांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गोरगरिबांना घर बांधणे आवाक्याबाहेर जात आहे. मजुरीसाठीही पूर्वीपेक्षा आता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत शासकीय योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाचा आधार घेत हे स्वप्न साकार करण्याची संधी आहे.

यांना मिळेल लाभ...

  • अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) किंवा कमी उत्पन्न गटातील (LIG) तसेच कुठेही पक्के घर नसलेल्या लाभार्थ्यास लाभ दिला जातो.
  • महिला, ज्येष्ठ नागरिक आणि असुरक्षित गटांना विशेष प्राधान्य दिले जाते. यातून गोरगरीब व गरजूंचे घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

सहपालकमंत्री जयस्वाल यांनी दिली मंजुरीरमाई आवास घरकुल योजनेला पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीची मंजुरी आवश्यक असते. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी नुकताच याला हिरवा कंदील दिला. त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण दूर झाली असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित लाभार्थ्यांनाही लाभ दिला जाणार आहे.

"रमाई आवास योजना ही गरजू व गरीब लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५२६ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. ज्यांना या योजनेतून घर हवे, त्यांनी रीतसर अर्ज करावा."- डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त समाजकल्याण, गडचिरोली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली