शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

५२ हजार ८५२ शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:14 IST

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडा आणि बोंडअळीमुळे धान आणि कापूस पीकांचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देमावा-तुडतुडा व बोंडअळीने ग्रस्त : केवळ १६ हजार ६६३ शेतकऱ्यांना मिळाली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडा आणि बोंडअळीमुळे धान आणि कापूस पीकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जाहीर केलेल्या मदत वाटपाच्या निकषानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल ५२ हजार ८५२ शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाने अपुरी मदत पाठविल्याने केवळ १६ हजार ६६३ शेतकऱ्यांनाच ही मदत मिळू शकली.शासनाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील ६९ हजार ५१५ शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यात ३४ कोटी १२ लाख धानपिकासाठी तर ४१ लाख ३६ हजार कापूस पिकाच्या नुकसानीसाठी आहेत. मात्र राज्य शासनाने मे महिन्यात पहिला हप्ता म्हणून केवळ ९ कोटी २० लाख रुपये पाठविले. ही रक्कम तत्काळ तालुकास्तरावर तहसीलदारांकडे वळती करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.पात्र शेतकऱ्यांना एकाचवेळी सर्व रक्कम देण्याऐवजी तीन टप्प्यात ती रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ११ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख रुपयेच शासनाकडून प्राप्त झाले. ती रक्कम वाटप केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने तातडीने ती रक्कम वाटप करण्यास सुरूवात केली. आजच्या स्थितीत ९ कोटी १९ लाख ९८ हजार ५३४ रुपये शेतकऱ्यांना वाटप झाले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील रकमेची प्रतीक्षा प्रशासकीय यंत्रणेसह शेतकऱ्यांना लागली आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत, कीटकनाशकासाठी पैशाची गरज आहे. अशा स्थितीत राज्य शासनाकडून लवकर मदतीची रक्कम मिळाल्यास त्याचा योग्य उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकरी बियाणे, खत, मजुरी यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. सर्वच शेतकऱ्यांना आता पैशाची गरज आहे. पण शेतकऱ्यांना मदतीची रक्कम एकाचवेळी मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.मागणी जास्त आणि मदतीची रक्कम कमी अशी स्थिती असल्यामुळे कोणाला आधी मदत द्यायची आणि कोणाला थांबवून ठेवायचे, असाही प्रश्न प्रशासनापुढे असतो. त्याबाबतचा निर्णय तहसीलदार आपल्या स्तरावर घेत आहेत. धान रोवणीपूर्वी मदत द्यावी अशी मागणी होत आहे.शेतकरी सावकारांच्या दारीअनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामासाठी कृषी कर्ज घेण्यासाठी त्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. पण तिथेही कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारी जावी लागत आहे. कर्जमाफीसाठी पाठपुराव्याची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस