शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

५२ हजार ८५२ शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:14 IST

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडा आणि बोंडअळीमुळे धान आणि कापूस पीकांचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देमावा-तुडतुडा व बोंडअळीने ग्रस्त : केवळ १६ हजार ६६३ शेतकऱ्यांना मिळाली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडा आणि बोंडअळीमुळे धान आणि कापूस पीकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने जाहीर केलेल्या मदत वाटपाच्या निकषानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल ५२ हजार ८५२ शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाने अपुरी मदत पाठविल्याने केवळ १६ हजार ६६३ शेतकऱ्यांनाच ही मदत मिळू शकली.शासनाच्या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील ६९ हजार ५१५ शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना ३४ कोटी ५४ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. त्यात ३४ कोटी १२ लाख धानपिकासाठी तर ४१ लाख ३६ हजार कापूस पिकाच्या नुकसानीसाठी आहेत. मात्र राज्य शासनाने मे महिन्यात पहिला हप्ता म्हणून केवळ ९ कोटी २० लाख रुपये पाठविले. ही रक्कम तत्काळ तालुकास्तरावर तहसीलदारांकडे वळती करून ती शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली.पात्र शेतकऱ्यांना एकाचवेळी सर्व रक्कम देण्याऐवजी तीन टप्प्यात ती रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ११ कोटी ५१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख रुपयेच शासनाकडून प्राप्त झाले. ती रक्कम वाटप केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने तातडीने ती रक्कम वाटप करण्यास सुरूवात केली. आजच्या स्थितीत ९ कोटी १९ लाख ९८ हजार ५३४ रुपये शेतकऱ्यांना वाटप झाले आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील रकमेची प्रतीक्षा प्रशासकीय यंत्रणेसह शेतकऱ्यांना लागली आहे.खरीप हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत, कीटकनाशकासाठी पैशाची गरज आहे. अशा स्थितीत राज्य शासनाकडून लवकर मदतीची रक्कम मिळाल्यास त्याचा योग्य उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकरी बियाणे, खत, मजुरी यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. सर्वच शेतकऱ्यांना आता पैशाची गरज आहे. पण शेतकऱ्यांना मदतीची रक्कम एकाचवेळी मिळणार नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.मागणी जास्त आणि मदतीची रक्कम कमी अशी स्थिती असल्यामुळे कोणाला आधी मदत द्यायची आणि कोणाला थांबवून ठेवायचे, असाही प्रश्न प्रशासनापुढे असतो. त्याबाबतचा निर्णय तहसीलदार आपल्या स्तरावर घेत आहेत. धान रोवणीपूर्वी मदत द्यावी अशी मागणी होत आहे.शेतकरी सावकारांच्या दारीअनेक शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. खरीप हंगामासाठी कृषी कर्ज घेण्यासाठी त्यांना बँकांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. पण तिथेही कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारी जावी लागत आहे. कर्जमाफीसाठी पाठपुराव्याची गरज आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस