शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अबब... ५१९ गावे अजूनही कव्हरेजच्या बाहेरच, झाडावर चढले तरी येथून फाेन लागत नाही

By दिगांबर जवादे | Updated: September 24, 2023 15:55 IST

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. यातील निम्म्याहून गावे जंगलांनी वेढलेली आहेत.

गडचिराेली : जगाच्या धावपळीची गती लक्षात घेतली तर माेबाइल ही आता चैनीची वस्तू नाही तर आवश्यक वस्तू बनली आहे. इंटरनेट व माेबाइलचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक गावात माेबाइल कव्हरेज पाेहाेचविण्याचे शासनाचे आदेश आहेत. विस्तारत चाललेल्या माेबाइल बाजारपेठेचा फायदा उचलण्यासाठी बीएसएनएल साेबतच खासगी कंपन्याही ग्रामीण भागात टाॅवर उभारत आहेत. मात्र, गडचिराेली जिल्हा याला अपवाद आहे. बीएसएनएलने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ५१९ गावांमध्ये अजूनही माेबाइलचे कव्हरेज पाेहाेचलेले नाही. या गावांमध्ये झाडावर चढले तरी फाेन लागत नाही.

गडचिराेली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८९ गावे आहेत. यातील निम्म्याहून गावे जंगलांनी वेढलेली आहेत. जिल्ह्यात दूरसंचार सेवेची सुरुवात बीएसएनएलने केली. ग्रामीण भागात टाॅवर उभारले. गरज लक्षात घेऊन टाॅवरची संख्या वाढवली. त्यामुळे अजूनही ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांकडे बीएसएनएलचेच सिम असल्याचे दिसून येते. फायद्याचे गणित मांडत नंतर खासगी कंपन्यांनीही ग्रामीण भागात टाॅवर उभारण्यास सुरुवात केली. मात्र, छत्तीगसड राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांपर्यंत अजूनही कव्हरेज पाेहाेचले नसल्याची शाेकांतिका आहे.बाॅक्स

२२० टाॅवरचे काम कधी पूर्ण हाेणार-जिल्ह्यात बीएसएनएलचे एकूण २१७ टाॅवर काम करीत आहेत. मात्र, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन पुन्हा बीएसएनएलने २२० टाॅवर प्रस्तावित केले आहेत. त्यांचे काम सुरू आहे. ते काम कधी पूर्ण हाेणार याची प्रतीक्षा आहे.

- खासगी कंपन्यांच्या टाॅवरची संख्या वाढत आहे. मात्र, जेथे फायद्याचे गणित आहे, त्याच ठिकाणी खासगी कंपन्या टाॅवर उभारतात. दुर्गम किंवा नक्षलग्रस्त भागात टाॅवर उभारत नाही. प्रामुख्याने तालुकास्थळी व शहरी भागातच माेबाइल टाॅवर उभारतात.बाॅक्स

देसाईगंज तालुक्यात प्रत्येक गावी कव्हरेजदेसाईगंज तालुक्यातील प्रत्येक गावात माेबाइलचे कव्हरेज पाेहाेचले आहे. खासगी कंपन्यांच्या टाॅवरची संख्याही अधिक आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सर्वच गावात कव्हरेज पाेहाेचलेला देसाईगंज हा एकमेव तालुका आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली