शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रबीसाठी ५१ लाखांचे कर्ज वाटपरबीसाठी ५१ लाखांचे कर्ज वाटप

By admin | Updated: November 21, 2015 01:49 IST

रबी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून या हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी सुमारे ५१ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे.

७९ शेतकऱ्यांनी घेतला लाभ :धान कापणीनंतर रबीच्या पेरणीला येणार वेगगडचिरोली : रबी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून या हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी सुमारे ५१ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पेरणीला वेग येणार असल्याने कर्ज वितरणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात खरीपासह रबी पिकाचेही उत्पादन घेतले जाते. सौरपंप, डिझेल इंजिन, उपसा सिंचन योजना, विहीर यामुळे सिंचनाच्या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या असल्याने दिवसेंदिवस रबी हंगामाचे क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यातही वाढत चालले आहे. चालू रबी हंगामात २३ हजार ४०० हेक्टरवर रबी पिकांची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून त्यानुसार खत, कीटकनाशके व बियाण्यांचे नियोजन केले आहे.रबी हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सूर्यफूल, गहू, ज्वारी, संकरीत मका, हरभरा, लाखोळी, मूग, जवस, तीळ, करडई, भूईमूग, वाटाणा यांच्यासह भाजीपाला, टरबूज यांचेही उत्पादन घेतले जाते. या सर्व पिकांसाठी जमिनीची मशागत करण्यापासून बियाणे खरेदी करणे, कीटकनाशके, खतांचा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर हजारो रूपये मजुरीवर खर्च करावे लागतात. त्यामुळे कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरत नाही. शेतकऱ्याला पीक कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे रहावे लागू नये, यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले आहे. रबी हंगामासाठी १७ कोटी २७ लाखांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सर्वच बँकांना दिले आहे. आॅक्टोबर महिन्यापासूनच रबी हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली. ज्या शेतकऱ्यांची जमीन पावसाळ्यात पडीत होती, अशा शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यातच पिकांची पेरणी केली. तर ज्या शेतात धानानंतर रबीची पेरणी केली जाणार आहे, त्यांची पेरणी डिसेंबर महिन्यात होणार आहे. रबी पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाभरातील ७९ शेतकऱ्यांनी ५१ लाखांचे कर्ज घेतले आहे. यामध्ये दोनच बँकांनी कर्ज वितरण केले आहे. यामध्ये सेंट्रल बँक आॅफ इंडियाने एका शेतकऱ्याला एक लाखांचे कर्ज तर स्टेट बँक आॅफ इंडियाने ७८ शेतकऱ्यांना ५० लाखांचे कर्ज वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३ टक्केच साध्य झाले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातही काही शेतकरी कर्जाची मागणी करतात. त्यामुळे डिसेंबर अखेर कर्ज वितरणात वाढ होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मागणी वाढणारगडचिरोली जिल्ह्यात सर्वसाधारणपणे धान पिकाच्या शेतातच धानपीक निघल्यानंतर रबी हंगामाची पेरणी केली जाते. धान कापणीला सध्या सुरूवात झाली आहे. धान कापणी झाल्याबरोबर रबी हंगामाची मशागत सुरू होते. जवळपास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाणे, कीटकनाशके, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासणार असून त्यासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सध्य:स्थितीत ५१ लाखांचेच कर्ज वितरण झाले असले तरी हा आकडा दोन कोटी पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरिपात ६१ टक्के उद्दिष्ट साध्यगडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात विविध पिकांची पेरणी करण्यात येते. यामध्ये धानाचा वाटा सुमारे ८० टक्के एवढा आहे. धानपिकाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शासनाने जिल्हाभरातील बँकांना १८२ कोटी ८० लाख रूपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज वितरण झाले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ६१ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. कोआॅपरेटिव्ह बँकेने ५२ कोटी ६४ लाख, ग्रामीण बँकांनी १३ कोटी ८९ लाख व संपूर्ण राष्ट्रीयकृत बँकांनी ४५ कोटी ७२ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे.