शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

तणसाचे ढीग जळून ५० हजारांचे नुकसान

By admin | Updated: April 28, 2017 01:10 IST

तालुक्यातील चुरमुरा येथे गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचे पाच तणसाचे ढीग जळून खाक झाले.

आरमोरी : तालुक्यातील चुरमुरा येथे गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचे पाच तणसाचे ढीग जळून खाक झाले. या आगीत जवळपास तीस बंड्या तणस जळाले असून यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. चुरमुरा येथील गोंविदा गोहणे, तुळशीदास दिवटे व ज्ञानेश्वर चुधरी यांच्या मालकीचे तणसाचे ढीग गावाबाहेर ठेवण्यात आले होते. तणसाच्या ढिगाला कुंपण करून त्यात बैल सुध्दा बांधण्यात आले होते. गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोविंदा गोहणे यांच्या तणसीच्या ढिगाला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग जवळच असलेल्या तुळशीराम दिवटे, ज्ञानेश्वर चुधरी यांच्या तणसी ढिगापर्यंतही पोहोचली. धुराचे लोट बाहेर निघत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून आग विझविण्याचा प्रयत्न केला. गावात दोन ठिकाणी विवाह असल्यामुळे वऱ्हाड्यांनीही धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत केली. अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी थामदेव भोयर यांच्या मोटारपंपाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुपारी २ वाजता अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दुपारी ३ वाजता यादरम्यान आग आटोक्यात आली. या आगीत जवळपास ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. तणीस जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अतिउष्णतामानामुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. (वार्ताहर)