शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड; लाकूडतोड्यांनो सावधान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:42 IST

परवानगी आवश्यक : नियमाचे उल्लंघन केल्यास खिशाला पडणार भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पर्यावरणाच्या रक्षणात तसेच वातावरणातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात वृक्षांची महत्त्वाची भूमिका आहे. तरीसुद्धा नियमबाह्यपणे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसते; परंतु आता या प्रकाराला चाप बसणार असून विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. 

झाड तोडायचे असल्यास त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा खिशाला भुर्दंड बसल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागात सरपणासाठी, तर शहरी भागात वस्ती, रहदारीसाठी अडथळा येत असेल तर झाडे तोडली जातात.

न.प. क्षेत्रात घेतली जाते परवानगीनगर परिषद क्षेत्रातील नागरिक विविध प्रकारची बांधकामे करताना झाडांचा अडथळा येत असेल तर त्याची परवानगीस्थानिक प्रशासनाकडून घेतात. विशेष म्हणजे, येथे एक समिती असते.

वर्षभरात कारवाई नाहीविनापरवानगी झाड तोडल्याची जिल्ह्यात एकही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, जंगलाचा जिल्हा असल्याने येथील लोकांचे जीवनमान जंगलावर अवलंबून आहे.

अधिनियमात दुरुस्तीपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडले आणि ते वाहून नेण्यासाठी वाहने, नौका वापरल्यास ते सरकारजमा करण्यात येतील. तसेच झाड तोडण्यासाठी वापरलेली हत्यारेसुद्धा जमा केली जाणार आहेत. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ४ मध्ये करून यासंदर्भातील अध्यादेश आणलेला आहे.

झाड तोडण्यासाठी कोठे परवानगी घ्याल?झाड तोडण्यासाठी ग्रामीण भागात वन विभाग, महसूल विभाग यांच्या स्थानिक कार्यालयामार्फत वरिष्ठांकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला जातो.

आधी होता केवळ एक हजाराचा दंडविना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी केवळ १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद होती. आता रीतसर परवानगी घेऊनच झाड तोडावे लागेल.

सरकारी कामासाठी तोडली जातात झाडेसरकारी कामासाठी झाडांची तोड केली जाते. अनेकदा कंत्राटदार परवानगीसुद्धा घेत नाहीत. त्यामुळे वनसंपदेची हानी तर होतेच शिवाय शासकीय संपत्तीचेही नुकसान होते. रस्ते बांधकाम, रुंदीकरणात झाडांची कत्तल होते.

आधी परवानगी, नंतर कार्यवाहीपरवानगी न घेता झाड तोडणे हा प्रकार कारवाईस पात्र ठरणार आहे. त्यामुळे झाड तोडताना अनेकदा विचार करावा लागेल

"जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व घनदाट जंगल होते. आता वृक्षतोडीमुळे हे जंगल विरळ झालेले आहे. पर्यावरणाचे रक्षण सर्वांनी करावे." - विद्या सुरेश चौधरी, पर्यावरणप्रेमी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली