शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड; लाकूडतोड्यांनो सावधान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:42 IST

परवानगी आवश्यक : नियमाचे उल्लंघन केल्यास खिशाला पडणार भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पर्यावरणाच्या रक्षणात तसेच वातावरणातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात वृक्षांची महत्त्वाची भूमिका आहे. तरीसुद्धा नियमबाह्यपणे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसते; परंतु आता या प्रकाराला चाप बसणार असून विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. 

झाड तोडायचे असल्यास त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा खिशाला भुर्दंड बसल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागात सरपणासाठी, तर शहरी भागात वस्ती, रहदारीसाठी अडथळा येत असेल तर झाडे तोडली जातात.

न.प. क्षेत्रात घेतली जाते परवानगीनगर परिषद क्षेत्रातील नागरिक विविध प्रकारची बांधकामे करताना झाडांचा अडथळा येत असेल तर त्याची परवानगीस्थानिक प्रशासनाकडून घेतात. विशेष म्हणजे, येथे एक समिती असते.

वर्षभरात कारवाई नाहीविनापरवानगी झाड तोडल्याची जिल्ह्यात एकही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, जंगलाचा जिल्हा असल्याने येथील लोकांचे जीवनमान जंगलावर अवलंबून आहे.

अधिनियमात दुरुस्तीपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडले आणि ते वाहून नेण्यासाठी वाहने, नौका वापरल्यास ते सरकारजमा करण्यात येतील. तसेच झाड तोडण्यासाठी वापरलेली हत्यारेसुद्धा जमा केली जाणार आहेत. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ४ मध्ये करून यासंदर्भातील अध्यादेश आणलेला आहे.

झाड तोडण्यासाठी कोठे परवानगी घ्याल?झाड तोडण्यासाठी ग्रामीण भागात वन विभाग, महसूल विभाग यांच्या स्थानिक कार्यालयामार्फत वरिष्ठांकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला जातो.

आधी होता केवळ एक हजाराचा दंडविना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी केवळ १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद होती. आता रीतसर परवानगी घेऊनच झाड तोडावे लागेल.

सरकारी कामासाठी तोडली जातात झाडेसरकारी कामासाठी झाडांची तोड केली जाते. अनेकदा कंत्राटदार परवानगीसुद्धा घेत नाहीत. त्यामुळे वनसंपदेची हानी तर होतेच शिवाय शासकीय संपत्तीचेही नुकसान होते. रस्ते बांधकाम, रुंदीकरणात झाडांची कत्तल होते.

आधी परवानगी, नंतर कार्यवाहीपरवानगी न घेता झाड तोडणे हा प्रकार कारवाईस पात्र ठरणार आहे. त्यामुळे झाड तोडताना अनेकदा विचार करावा लागेल

"जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व घनदाट जंगल होते. आता वृक्षतोडीमुळे हे जंगल विरळ झालेले आहे. पर्यावरणाचे रक्षण सर्वांनी करावे." - विद्या सुरेश चौधरी, पर्यावरणप्रेमी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली