शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड; लाकूडतोड्यांनो सावधान ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:42 IST

परवानगी आवश्यक : नियमाचे उल्लंघन केल्यास खिशाला पडणार भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पर्यावरणाच्या रक्षणात तसेच वातावरणातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यात वृक्षांची महत्त्वाची भूमिका आहे. तरीसुद्धा नियमबाह्यपणे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसते; परंतु आता या प्रकाराला चाप बसणार असून विना परवानगी झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. 

झाड तोडायचे असल्यास त्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा खिशाला भुर्दंड बसल्याशिवाय राहणार नाही. ग्रामीण भागात सरपणासाठी, तर शहरी भागात वस्ती, रहदारीसाठी अडथळा येत असेल तर झाडे तोडली जातात.

न.प. क्षेत्रात घेतली जाते परवानगीनगर परिषद क्षेत्रातील नागरिक विविध प्रकारची बांधकामे करताना झाडांचा अडथळा येत असेल तर त्याची परवानगीस्थानिक प्रशासनाकडून घेतात. विशेष म्हणजे, येथे एक समिती असते.

वर्षभरात कारवाई नाहीविनापरवानगी झाड तोडल्याची जिल्ह्यात एकही कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, जंगलाचा जिल्हा असल्याने येथील लोकांचे जीवनमान जंगलावर अवलंबून आहे.

अधिनियमात दुरुस्तीपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडले आणि ते वाहून नेण्यासाठी वाहने, नौका वापरल्यास ते सरकारजमा करण्यात येतील. तसेच झाड तोडण्यासाठी वापरलेली हत्यारेसुद्धा जमा केली जाणार आहेत. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ मधील कलम ४ मध्ये करून यासंदर्भातील अध्यादेश आणलेला आहे.

झाड तोडण्यासाठी कोठे परवानगी घ्याल?झाड तोडण्यासाठी ग्रामीण भागात वन विभाग, महसूल विभाग यांच्या स्थानिक कार्यालयामार्फत वरिष्ठांकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला जातो.

आधी होता केवळ एक हजाराचा दंडविना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यापूर्वी केवळ १ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद होती. आता रीतसर परवानगी घेऊनच झाड तोडावे लागेल.

सरकारी कामासाठी तोडली जातात झाडेसरकारी कामासाठी झाडांची तोड केली जाते. अनेकदा कंत्राटदार परवानगीसुद्धा घेत नाहीत. त्यामुळे वनसंपदेची हानी तर होतेच शिवाय शासकीय संपत्तीचेही नुकसान होते. रस्ते बांधकाम, रुंदीकरणात झाडांची कत्तल होते.

आधी परवानगी, नंतर कार्यवाहीपरवानगी न घेता झाड तोडणे हा प्रकार कारवाईस पात्र ठरणार आहे. त्यामुळे झाड तोडताना अनेकदा विचार करावा लागेल

"जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व घनदाट जंगल होते. आता वृक्षतोडीमुळे हे जंगल विरळ झालेले आहे. पर्यावरणाचे रक्षण सर्वांनी करावे." - विद्या सुरेश चौधरी, पर्यावरणप्रेमी 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली