शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्ज वाटप

By admin | Updated: July 5, 2014 23:35 IST

चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून सुमारे १०९.८५ कोटी रूपयाचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ४५.०९ कोटीचेच

गडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून सुमारे १०९.८५ कोटी रूपयाचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ४५.०९ कोटीचेच कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकाराच्या घराचे उंबरठे झिजविण्याची पाळी आली आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी बराच खर्च येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडवल शेतकऱ्यांजवळ राहत नसल्याने कर्ज काढूनच शेती करावी लागते. पूर्वी सावकाराकडूनच कर्ज घेऊन शेतकरी पिकांची लागवड करीत होता. मात्र सावकार शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शेतकरी वर्गाला सुमारे २५ ते ३० टक्के व्याज दराने कर्जाचा पुरवठा करीत होता. त्याचबरोबर कर्जाची रक्कम वाढवून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात होती. परिणामी शेतीतून प्राप्त झालेले बहुतांश उत्पन्न सावकाराचे कर्ज फेडण्यावरच खर्च होत होते. शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना शेतकरी वर्गाला कर्ज देणे सक्तीचे केले आहे. प्रत्येक बँकेला शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्टसुध्दा देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना ५२ कोटी ७३ लाख, सहकारी बँकांना ४४ कोटी ४२ लाख, ग्रामीण बँकांना १२ कोटी ६५ लाख असे एकूण १०९ कोटी ८५ लाखाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ९ कोटी ९८ लाख, सहकारी बँका २९ कोटी ८१ लाख व ग्रामीण बँकांनी ५ कोटी ३० लाख रूपये असे एकूण ४५.०९ कोटी रूपये कर्जाचे वाटप केले आहे. प्रत्येक बँकेला कर्ज वाटप करणे सक्तीचे असले तरी राष्ट्रीयकृत बँका मात्र शेतकऱ्यांना दारातही उभे होऊ देत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. शेतकरी कर्ज निश्चित कालावधीत फेडत नाही, असा गैरसमज या बँकांचा झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ २० टक्केच कर्ज वाटप केले आहे. याबद्दल वरिष्ठस्तरावरून विचारणा झाल्यास शेतकरीवर्ग कर्जासाठी अर्ज करीत नाही, असे उलट उत्तर देण्यात येते. आधुनिक पध्दतीने यांत्रिक शेती करण्यासाठी बराच खर्च येत असल्याने शेतकऱ्याला कुठूनही कर्ज घेणे भाग असते. त्यामुळे शेतकरी वर्गाला नाईलाजास्तव सावकाराच्या दारावर उभे होऊन कर्जाची भिक मागावी लागत आहे. (नगर प्रतिनिधी)