शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

उद्दिष्टाच्या ५० टक्केच कर्ज वाटप

By admin | Updated: July 5, 2014 23:35 IST

चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून सुमारे १०९.८५ कोटी रूपयाचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ४५.०९ कोटीचेच

गडचिरोली : चालू खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून सुमारे १०९.८५ कोटी रूपयाचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फक्त ४५.०९ कोटीचेच कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकाराच्या घराचे उंबरठे झिजविण्याची पाळी आली आहे. आधुनिक पध्दतीने शेती करण्यासाठी बराच खर्च येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडवल शेतकऱ्यांजवळ राहत नसल्याने कर्ज काढूनच शेती करावी लागते. पूर्वी सावकाराकडूनच कर्ज घेऊन शेतकरी पिकांची लागवड करीत होता. मात्र सावकार शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शेतकरी वर्गाला सुमारे २५ ते ३० टक्के व्याज दराने कर्जाचा पुरवठा करीत होता. त्याचबरोबर कर्जाची रक्कम वाढवून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात होती. परिणामी शेतीतून प्राप्त झालेले बहुतांश उत्पन्न सावकाराचे कर्ज फेडण्यावरच खर्च होत होते. शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना शेतकरी वर्गाला कर्ज देणे सक्तीचे केले आहे. प्रत्येक बँकेला शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्टसुध्दा देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना ५२ कोटी ७३ लाख, सहकारी बँकांना ४४ कोटी ४२ लाख, ग्रामीण बँकांना १२ कोटी ६५ लाख असे एकूण १०९ कोटी ८५ लाखाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ९ कोटी ९८ लाख, सहकारी बँका २९ कोटी ८१ लाख व ग्रामीण बँकांनी ५ कोटी ३० लाख रूपये असे एकूण ४५.०९ कोटी रूपये कर्जाचे वाटप केले आहे. प्रत्येक बँकेला कर्ज वाटप करणे सक्तीचे असले तरी राष्ट्रीयकृत बँका मात्र शेतकऱ्यांना दारातही उभे होऊ देत नाही, अशी भयावह परिस्थिती आहे. शेतकरी कर्ज निश्चित कालावधीत फेडत नाही, असा गैरसमज या बँकांचा झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ २० टक्केच कर्ज वाटप केले आहे. याबद्दल वरिष्ठस्तरावरून विचारणा झाल्यास शेतकरीवर्ग कर्जासाठी अर्ज करीत नाही, असे उलट उत्तर देण्यात येते. आधुनिक पध्दतीने यांत्रिक शेती करण्यासाठी बराच खर्च येत असल्याने शेतकऱ्याला कुठूनही कर्ज घेणे भाग असते. त्यामुळे शेतकरी वर्गाला नाईलाजास्तव सावकाराच्या दारावर उभे होऊन कर्जाची भिक मागावी लागत आहे. (नगर प्रतिनिधी)