शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कृषी गोदामांमुळे ५ हजार टन धान्य साठवणुकीची सुविधा

By admin | Updated: October 21, 2014 22:52 IST

जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात एकुण २५ गोदामे मंजूर करण्यात आली होती. यातील २३ गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक गोदामाची साठवण क्षमता २०० टन आहे. त्यामुळे २५ गोदामांच्या

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात एकुण २५ गोदामे मंजूर करण्यात आली होती. यातील २३ गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक गोदामाची साठवण क्षमता २०० टन आहे. त्यामुळे २५ गोदामांच्या माध्यमातून ५ हजार टन अन्नधान्य साठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. साठवणुक क्षमता वाढल्याने शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा, रामगड, कढोली, आरमोरी तालुक्यातील वैरागड, देलनवाडी, वडधा, कोरची तालुक्यातील बेतकाठी, मसेली, धानोरा तालुक्यातील रांगी, चातगाव, गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा, चामोर्शी तालुक्यातील तळोधी, मक्केपल्ली, पावीमुरांडा, अड्याळ, रेगडी, एटापल्ली तालुक्यातील जारावंडी, अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा, कमलापूर व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, असरअल्ली येथील गोदामांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या गोदामांचा वापर धान्य साठवणुकीसाठी केला जात आहे. कृषी गोदामाचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरून केल्या जात आहे. गोदामाचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सरपंचासह ११ सदस्यांची समिती गठित करण्यात आली असून या समितीकडे गोदामाचे भाडे आकारणे व अन्य दर ठरविण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे अन्नधान्य साठवणुकीच्या अत्यंत कमी सोयी- सुविधा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून माल निघाल्याबरोबरच विकावा लागत होता. परिणामी कमी किंमत मिळत होती. गोदामांमुळे ही अडचण दूर होण्यास मतद होईल, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे. (नगर प्रतिनिधी)