शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : आधुनिक तंत्रज्ञान वापरताना येतात मर्यादा;अनेकांनी सोडली शेती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्यास्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे. शेतजमीन कमी असल्याने याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे संबंधित शेतकऱ्याला कठिण झाले आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास कमी मनुष्यबळात अधिक व दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते. मात्र शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान महाग राहत असल्याने अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ते खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीचा विकास रखडला आहे. अल्प शेतीतून वर्षभराची गूजरान होईल, एवढे उत्पन्नसुद्धा मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचे होत असलेले तुकडीकरण ही गंभीर समस्या बनत चालली आहे.शेतीकडे पाठ फिरविलेले शेतकरी दुसºया शेतकºयाला शेतजमीन कसण्यासाठी देतात. एक ते दोन वर्षाचा करार राहत असल्याने दुसरा शेतकरीसुद्धा या शेतीत नवीन तंत्रज्ञान बसवू शकत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीकडेच विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येते.३६ हजार शेतकऱ्यांकडे २५ टक्के शेतजमीनदोन व त्यापेक्षा अधिक हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात ३६ हजार २५ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या हे प्रमाण २५ टक्के एवढे आहे. हे शेतकरी काही प्रमाणात आपल्या शेतीत अत्याधुनिक सुविधा निर्माण करीत आहेत. तसेच वर्षभराची गूजरान शेतीच्या माध्यमातून होत असल्याने ते शेतीकडे विशेष लक्ष देत आहेत.गटशेतीवर शासनाचा भरअल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला शेतीचे आधुनिक महागडे तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच एका शेतकºयाला लाखो रूपयांचे तंत्रज्ञान अनुदानावर देणे शासनालाही परवडत नाही. त्यामुळे शासनाने गट शेतीवर भर दिला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार केले जात आहे. या शेतकरी गटाला शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा व तंत्रज्ञान दिले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गटातील शेतकरी करतात. त्यामुळे शेतीचा विकास होण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती