शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : आधुनिक तंत्रज्ञान वापरताना येतात मर्यादा;अनेकांनी सोडली शेती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्यास्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे. शेतजमीन कमी असल्याने याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे संबंधित शेतकऱ्याला कठिण झाले आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास कमी मनुष्यबळात अधिक व दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते. मात्र शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान महाग राहत असल्याने अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ते खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीचा विकास रखडला आहे. अल्प शेतीतून वर्षभराची गूजरान होईल, एवढे उत्पन्नसुद्धा मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचे होत असलेले तुकडीकरण ही गंभीर समस्या बनत चालली आहे.शेतीकडे पाठ फिरविलेले शेतकरी दुसºया शेतकºयाला शेतजमीन कसण्यासाठी देतात. एक ते दोन वर्षाचा करार राहत असल्याने दुसरा शेतकरीसुद्धा या शेतीत नवीन तंत्रज्ञान बसवू शकत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीकडेच विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येते.३६ हजार शेतकऱ्यांकडे २५ टक्के शेतजमीनदोन व त्यापेक्षा अधिक हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात ३६ हजार २५ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या हे प्रमाण २५ टक्के एवढे आहे. हे शेतकरी काही प्रमाणात आपल्या शेतीत अत्याधुनिक सुविधा निर्माण करीत आहेत. तसेच वर्षभराची गूजरान शेतीच्या माध्यमातून होत असल्याने ते शेतीकडे विशेष लक्ष देत आहेत.गटशेतीवर शासनाचा भरअल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला शेतीचे आधुनिक महागडे तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच एका शेतकºयाला लाखो रूपयांचे तंत्रज्ञान अनुदानावर देणे शासनालाही परवडत नाही. त्यामुळे शासनाने गट शेतीवर भर दिला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार केले जात आहे. या शेतकरी गटाला शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा व तंत्रज्ञान दिले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गटातील शेतकरी करतात. त्यामुळे शेतीचा विकास होण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती