शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाची माहिती : आधुनिक तंत्रज्ञान वापरताना येतात मर्यादा;अनेकांनी सोडली शेती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीचे तुकडे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्यास्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या सुमारे ४५ टक्के शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे. शेतजमीन कमी असल्याने याठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे संबंधित शेतकऱ्याला कठिण झाले आहे.देशाच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून त्या जमिनीवर शेती करण्याला सुरूवात झाली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र वाढले. त्याचबरोबर लोकसंख्यासुद्धा वाढल्याने शेतीचे तुकडे पडण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८३३ शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ५७ हजार ३४२ शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास कमी मनुष्यबळात अधिक व दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते. मात्र शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान महाग राहत असल्याने अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ते खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी शेतीचा विकास रखडला आहे. अल्प शेतीतून वर्षभराची गूजरान होईल, एवढे उत्पन्नसुद्धा मिळत नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतीचे होत असलेले तुकडीकरण ही गंभीर समस्या बनत चालली आहे.शेतीकडे पाठ फिरविलेले शेतकरी दुसºया शेतकºयाला शेतजमीन कसण्यासाठी देतात. एक ते दोन वर्षाचा करार राहत असल्याने दुसरा शेतकरीसुद्धा या शेतीत नवीन तंत्रज्ञान बसवू शकत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी धान शेतीकडेच विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येते.३६ हजार शेतकऱ्यांकडे २५ टक्के शेतजमीनदोन व त्यापेक्षा अधिक हेक्टर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात ३६ हजार २५ एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या हे प्रमाण २५ टक्के एवढे आहे. हे शेतकरी काही प्रमाणात आपल्या शेतीत अत्याधुनिक सुविधा निर्माण करीत आहेत. तसेच वर्षभराची गूजरान शेतीच्या माध्यमातून होत असल्याने ते शेतीकडे विशेष लक्ष देत आहेत.गटशेतीवर शासनाचा भरअल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला शेतीचे आधुनिक महागडे तंत्रज्ञान खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच एका शेतकºयाला लाखो रूपयांचे तंत्रज्ञान अनुदानावर देणे शासनालाही परवडत नाही. त्यामुळे शासनाने गट शेतीवर भर दिला आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे गट तयार केले जात आहे. या शेतकरी गटाला शासनाकडून विविध प्रकारच्या सुविधा व तंत्रज्ञान दिले जात आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गटातील शेतकरी करतात. त्यामुळे शेतीचा विकास होण्यास मदत होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती