शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

४५ टक्के शेतकरी अत्यल्प भूधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:07 PM

लोकसंख्या वाढीबरोबरच जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतजमिनीची प्रती शेतकरी धारण क्षमता कमी होत चालली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले ४५ टक्के शेतकरी आहेत.

ठळक मुद्देतुकडे वाढले : २५ टक्के शेतकऱ्यांकडे निम्मी शेतजमीन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसंख्या वाढीबरोबरच जमिनीचे तुकडे वाढत चालले आहेत. त्यामुळे शेतजमिनीची प्रती शेतकरी धारण क्षमता कमी होत चालली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेले ४५ टक्के शेतकरी आहेत.कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख ३४ हजार ८५५ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ७३० हेक्टर शेत जमीन धारण केली आहे. त्यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ५७ हजार ३४२ एवढी आहे. या शेतकऱ्यांनी केवळ ३० हजार ५९३ हेक्टर शेतजमीन धान केले आहे. ४१ हजार ४८८ शेतकºयांकडे एक ते दोन हेक्टर दरम्यान जमीन आहे. या शेतकऱ्यांचे धारण क्षेत्र ५८ हजार ७७३ एवढे आहे. तर दोन हेक्टरपेक्षा अधिक शेतजमीन असलेले ३६ हजार २५ शेतकरी आहेत. ज्या शेतकºयांनी सुमारे १ लाख ३३ हजार ३६० हेक्टर शेतजमीन धारण केली आहे.एक हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असल्यास यामध्ये कुटुंबाचा प्रपंच भागविणे शक्य होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक युवक शेतीला रामराम ठोकून शहरात रोजगार शोधत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केवळ खरीपाच्या हंगामात केली जाते. धानाच्या शेतीत फारसा फायदा मिळत नाही. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने इतर पिके सुध्दा घेणे शक्य होत नाही.यांत्रिक शेती अवघडयांत्रिक पध्दतीने शेती करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच तो शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. अल्पभूधारक शेतकरी यांत्रिक पध्दतीने शेती करू शकत नाही.केवळ मनुष्यबळाच्या भरवशावर शेती केल्याने शेतीचा खर्च वाढतो व उत्पादनही कमी होते. त्यामुळे आता शासन सामुहिक शेतीवर भर देत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सामुहिक शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे.