शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

४३ पुलांमुळे तुटणार संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:20 IST

अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही.

ठळक मुद्देपर्यायी मार्गच नाही : २५४ गावातील ७४ हजार नागरिकांना बसणार पावसाचा फटका

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. याशिवाय काही ठिकाणी नद्या आणि नाल्यांवरच पूलच नाही. परिणामी पावसाळ्यात २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांची, पुलांची कामे करताना प्रशासनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. नक्षली त्रासामुळे ही कामे घेण्यासाठी कंत्राटदारही पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेक रस्ते, पूल मंजूर होऊनही त्यांचे बांधकाम होऊ शकलेले नाही. याचा फटका त्या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून बसत आहे. यावर्षीही २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार असल्यामुळे त्या गावांत चार महिन्यांचा रेशन पुरवठा, औषधीसाठा पोहोचविण्यात आला आहे.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या ६ तालुक्यांमधील गावांमध्ये सर्वाधिक ७६ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल ६० गावे अहेरी तर ५३ गावे भामरागड तालुक्यातील आहेत. या गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप केल्या जाणारे तीन ते चार महिन्यांचे साहित्य पोहोचविण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर.चांदुरकर यांनी सांगितले. त्यात गहू, तांदूळ आणि साखरेचाही समावेश आहे. या संपर्क तुटणाºया गावांमध्ये १२९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे काही गावातील नागरिकांना दुसºया गावातील स्वस्त धान्य दुकानांशी जोडण्यात आले आहे.नागरी जीवनमानावर परिणाम करणाºया जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये गाढवी नदी, कठाणी नदी, कोटरी नदी, पोहार नदी, दिना नदी, इंद्रावती नदी, वटीगंगा नदी, खोब्रागडी नदी, प्राणहिता नदी, तेलनालू नदी, बांडीया नदी या नद्यांसोबत अनेक नाल्यांचा समावेश आहे.संपर्क तुटणाºया गावांमध्ये पावसाच्या दिवसात उद्भवणाºया संभावित आजारांचा अंदाज घेऊन त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये औषधीचा साठाही पोहोचविण्यात आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर