शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

४३ पुलांमुळे तुटणार संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:20 IST

अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही.

ठळक मुद्देपर्यायी मार्गच नाही : २५४ गावातील ७४ हजार नागरिकांना बसणार पावसाचा फटका

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अपुरे रस्ते आणि ठेंगण्या पुलांमुळे संपर्क तुटण्याचा फटका यावर्षीही अनेक गावांना बसणार आहे. जिल्हाभरात नदी-नाल्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे ५४ पूल आहेत. मात्र त्यातील ४३ पूल पाण्याखाली गेल्यास पुढील गावांत जाण्यासाठी पर्यायी मार्गच नाही. याशिवाय काही ठिकाणी नद्या आणि नाल्यांवरच पूलच नाही. परिणामी पावसाळ्यात २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे.दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांची, पुलांची कामे करताना प्रशासनाला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. नक्षली त्रासामुळे ही कामे घेण्यासाठी कंत्राटदारही पुढे येत नाहीत. त्यामुळे अनेक रस्ते, पूल मंजूर होऊनही त्यांचे बांधकाम होऊ शकलेले नाही. याचा फटका त्या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून बसत आहे. यावर्षीही २५४ गावांमधील ७४ हजार ४९२ नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार असल्यामुळे त्या गावांत चार महिन्यांचा रेशन पुरवठा, औषधीसाठा पोहोचविण्यात आला आहे.पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या ६ तालुक्यांमधील गावांमध्ये सर्वाधिक ७६ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल ६० गावे अहेरी तर ५३ गावे भामरागड तालुक्यातील आहेत. या गावांमध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप केल्या जाणारे तीन ते चार महिन्यांचे साहित्य पोहोचविण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर.चांदुरकर यांनी सांगितले. त्यात गहू, तांदूळ आणि साखरेचाही समावेश आहे. या संपर्क तुटणाºया गावांमध्ये १२९ स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे काही गावातील नागरिकांना दुसºया गावातील स्वस्त धान्य दुकानांशी जोडण्यात आले आहे.नागरी जीवनमानावर परिणाम करणाºया जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये गाढवी नदी, कठाणी नदी, कोटरी नदी, पोहार नदी, दिना नदी, इंद्रावती नदी, वटीगंगा नदी, खोब्रागडी नदी, प्राणहिता नदी, तेलनालू नदी, बांडीया नदी या नद्यांसोबत अनेक नाल्यांचा समावेश आहे.संपर्क तुटणाºया गावांमध्ये पावसाच्या दिवसात उद्भवणाºया संभावित आजारांचा अंदाज घेऊन त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये औषधीचा साठाही पोहोचविण्यात आला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर