शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

बेरोजगारांसाठी ४१ दुकान गाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 23:50 IST

एटापल्ली पंचायत समितीने अभिनव उपक्रम राबवित कार्यालय परिसरात सुमारे ४१ दुकानांचे गाळे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या गाळ्यांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच बेरोजगार युवकांनाही दुकान टाकण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र बाजारपेठ होणार तयार : एटापल्ली पंचायत समितीचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीने अभिनव उपक्रम राबवित कार्यालय परिसरात सुमारे ४१ दुकानांचे गाळे बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या गाळ्यांच्या माध्यमातून पंचायत समितीला उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच बेरोजगार युवकांनाही दुकान टाकण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.कसनसूर मार्गालगतची जागा एटापल्ली पंचायत समितीची आहे. मात्र या ठिकाणी काही दुकानदारांनी अतिक्रमण करून मोठमोठी दुकाने लावली होती. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत चालला होता. मार्गालगतच अतिक्रमण असल्याने वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली होती. एटापल्लीचे विद्यमान गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी पुढाकार घेत या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. अतिक्रमण हटविताना स्थानिक दुकानदार व राजकीय व्यक्तींचा फार मोठा विरोध झाला. मात्र गज्जलवार यांनी या विरोधाला न जुमानता अतिक्रमण काढले. अतिक्रमण काढल्यानंतर ती जागा मोकळी असती तर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होण्याचा धोका होता. त्यामुळे पंचायत समितीने तत्काळ बांधकामाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात सुमारे ४१ गाळ्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. सदर बांधकाम आता पाच फुटापर्यंत पोहोचले आहे.स्थानिक बेरोजगार युवकांना अत्यंत कमी भाडे तत्त्वावर सदर गाळे दुकान लावण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सुमारे ४१ दुकानांचे गाळे असल्याने एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होणार आहे. ४१ गाळ्यांमधील दुकानांमध्ये सर्वच वस्तू मिळणार असल्याने ग्राहक व नागरिक इतरत्र न भटकता पंचायत समिती परिसरातील बाजारपेठेत येतील. त्यामुळे गाळ्यांमधील दुकानांमधील विक्री वाढून याचा फायदा दुकानदारांना होणार आहे. तसेच या गाळ्यांमध्ये दुकानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत.कमी भाड्यात दुकानगाळे उपलब्ध होणार असल्याने काही बेरोजगार युवक आतापासूनच पंचायत समितीशी संपर्क साधत आहेत. बांधकाम झाल्याबरोबर गाळे उपलब्ध होणार आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुकजिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी एटापल्ली पंचायत समितीला नुकतीच भेट दिली. यावेळी दुकानगाळ्यांचीही पाहणी केली. एकाच रांगेत असलेले दुकानगाळे पाहून जिल्हाधिकारी अवाक् झाले. पंचायत समितीच्या बांधकामाची प्रशंसा केली. इतरही पंचायत समितीने अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.पंचायत समितीला शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे पंचायत समितीचे महत्त्व कमी होत चालले आहे. मात्र एटापल्ली पंचायत समितीने स्वत:चे दुकानगाळे बांधून शासनाला उत्पन्नाचे साधन मिळवून दिले आहे. एटापल्ली पंचायत समितीच्या वतीने पेट्रोलपंप सुद्धा चालविला जातो. पेट्रोलपंप चालविणारी एटापल्ली पंचायत समिती ही राज्यातील एकमेव पंचायत समिती आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती