शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

४० किमीची मर्यादा रूग्णवाहिकेसाठी अडचणीची

By admin | Updated: June 7, 2015 02:07 IST

टोल फ्री क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने दुसऱ्या जिल्ह्यातील रूग्णांची केवळ ४० किमी अंतरावरच वाहतूक करावी, असे बंधन घालण्यात आले आहे.

देसाईगंज : टोल फ्री क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने दुसऱ्या जिल्ह्यातील रूग्णांची केवळ ४० किमी अंतरावरच वाहतूक करावी, असे बंधन घालण्यात आले आहे. याचा फटका देसाईगंजमधील रूग्णांना बसत आहे. संपूर्ण राज्यातील रूग्णांना रूग्णवाहिकेची सेवा तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका राज्यभरात वितरित करण्यात आल्या आहेत. सदर रूग्णवाहिकेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र सदर रूग्णवाहिका देसाईगंज येथील ग्रामीण रूग्णालयाला देण्यात आली नाही. मात्र नजिकच्या लाखांदूर येथील रूग्णालयात सदर रूग्णवाहिका उपलब्ध आहे. यामुळे देसाईगंज येथील एखाद्या रूग्णाला दुसऱ्या ठिकाणी हलवायचे असल्यास लाखांदूर येथीलच रूग्णवाहिका बोलविल्या जाते. लाखांदूर ते देसाईगंजचे अंतर १८ किमी आहे. त्यामुळे सदर रूग्णवाहिका देसाईगंज येथे येते. रूग्णाला गडचिरोली येथे भरती करायचे असल्यास ४० किमी पेक्षा अंतर जास्त असल्याने गडचिरोली येथे रूग्णाला भरती करण्यास वाहकाकडून स्पष्ट नकार देण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांश रूग्णांना ४० किमी अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी येथीलच रूग्णालयात भरती करावे लागत आहे. याचा त्रास रूग्णांना होत असून वेळप्रसंगी रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ४० किमीची दिलेली मर्यादा रूग्णांच्या जीवावर बेतत असल्याने ही मर्यादा काढून टाकण्यात यावी, अशी मागणी रूग्णांकडून करण्यात येत आहे.कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांमध्ये टोल फ्री क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रूग्णांना लाखांदूर येथीलच रूग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र ४० किमीच्या मर्यादेमुळे या रूग्णवाहिकेच्या वापरावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुकास्तरावर अशी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)