शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

बत्ती गूल होताच ४९ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:32 IST

वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता.

ठळक मुद्देवसुलीचा धसका : दोन दिवसात २ हजार २६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यापैकी सुमारे २ हजार २०९ नागरिकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केला आहे. दोन दिवसांत सुमारे ४९ लाख ९२ हजार रूपयांची वसुली झाली आहे. नाक दाबल्यानंतर तोंड आपोआप उघडते, याची प्रचिती वीज कंपनीला येत असल्याने वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. ४७१ ग्राहकांनी मात्र अजूनपर्यंत वीज बिल भरले नसल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीतच आहे.विजेचे बिल महिन्याला पाठविले जात असले तरी १०० टक्के वसुली कधीच होत नसल्याने दिवसेंदिवस वीज विभाग अडचणीत आला आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाई करून वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश वीज विभागाने दिले आहेत. त्यानुसार महावितरणचे गडचिरोली अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी ५०० रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याचे निर्देश दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम २१ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली अधीक्षक अभियंता कार्यालयांतर्गत गडचिरोली, ब्रह्मपुरी व आलापल्ली या तीन विभागांचा समावेश होतो. या तिन्ही विभागांमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली विभागात एकूण १ लाख १४ हजार २९२, आलापल्ली विभागात ८२ हजार २९० वीज ग्राहक आहेत. महिन्याला वीज बिल भरणे सक्तीचे असले तरी काही नागरिक दोन ते तीन महिने उलटूनही वीज बिल भरत नाही. अशा थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. २१ ते २२ नोव्हेंबर या दोन कालावधीत जिल्ह्यातील २ हजार ६२६ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. काही नागरिकांनी वीज खंडीत होताच बिल भरले. त्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ज्यांनी वीज बिल भरले नाही अशांचा मात्र वीज पुरवठा अजूनही खंडितच आहे.वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई महावितरणला करावी लागत आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास संबंधित व्यक्तीची समाजात बदनामी होते. काही दिवस वीज पुरवठा खंडीतच राहिल्यास अंधारात रात्र काढून शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. थकीत वीज बिल भरण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरावे.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली३६२ कर्मचारी मोहिमेवरवीज पुरवठा खंडित करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ३६२ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली डिव्हिजनमधील २१० कर्मचारी व आलापल्ली डिव्हिजनमधील १५२ कर्मचाºयांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्येही १२३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. वीज बिल भरण्याची तारीख संपूनही वीज बिल न भरलेल्या नागरिकांची माहिती घेऊन वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वीज विभागाच्या या मोहिमेमुळे थकबाकीदार ग्राहकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला वीज भरण्याचा सल्ला सुध्दा काही लाईनमन थकबाकीदारांना देत आहेत.सहा कोटींच्या वसुलीचे आव्हानगडचिरोली व आलापल्ली विभागातील २७ हजार ७५८ नागरिकांकडे ५ कोटी ७८ लाख रूपयांचे वीज बिल थकले आहे. तेवढी रक्कम वसुली करणे वीज विभागासमोरील मोठे आव्हान आहे. थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठीच वीज विभागाने वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे.गडचिरोली उपविभागात ९९ लाख, आरमोरीत २५ लाख, देसाईगंज ५१ लाख, कुरखेडा ३६ लाख, धानोरा ३० लाख, कोरची १० लाख, आलापल्ली ११७ लाख, चामोर्शी ७३ लाख, एटापल्ली ४४ लाख, सिरोंचा ४४ लाख, मुलचेरा १५ लाख व भामरागड उपविभागात ३४ लाख रूपये थकीत आहेत.