शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

बत्ती गूल होताच ४९ लाख वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:32 IST

वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता.

ठळक मुद्देवसुलीचा धसका : दोन दिवसात २ हजार २६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वीज पुरवठा खंडित होताच काही नागरिकांनी वीज बिल भरण्यास सुरूवात केली आहे. २१ व २२ नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे २ हजार ६२६ नागरिकांचा वीज पुरवठा खंडित केला होता. त्यापैकी सुमारे २ हजार २०९ नागरिकांनी तत्काळ वीज बिलाचा भरणा केला आहे. दोन दिवसांत सुमारे ४९ लाख ९२ हजार रूपयांची वसुली झाली आहे. नाक दाबल्यानंतर तोंड आपोआप उघडते, याची प्रचिती वीज कंपनीला येत असल्याने वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्याची शक्यता आहे. ४७१ ग्राहकांनी मात्र अजूनपर्यंत वीज बिल भरले नसल्याने त्यांचा वीज पुरवठा खंडीतच आहे.विजेचे बिल महिन्याला पाठविले जात असले तरी १०० टक्के वसुली कधीच होत नसल्याने दिवसेंदिवस वीज विभाग अडचणीत आला आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर कारवाई करून वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश वीज विभागाने दिले आहेत. त्यानुसार महावितरणचे गडचिरोली अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के यांनी ५०० रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी खंडीत करण्याचे निर्देश दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम २१ नोव्हेंबरपासून हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली अधीक्षक अभियंता कार्यालयांतर्गत गडचिरोली, ब्रह्मपुरी व आलापल्ली या तीन विभागांचा समावेश होतो. या तिन्ही विभागांमध्ये वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गडचिरोली विभागात एकूण १ लाख १४ हजार २९२, आलापल्ली विभागात ८२ हजार २९० वीज ग्राहक आहेत. महिन्याला वीज बिल भरणे सक्तीचे असले तरी काही नागरिक दोन ते तीन महिने उलटूनही वीज बिल भरत नाही. अशा थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. २१ ते २२ नोव्हेंबर या दोन कालावधीत जिल्ह्यातील २ हजार ६२६ थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. काही नागरिकांनी वीज खंडीत होताच बिल भरले. त्यांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ज्यांनी वीज बिल भरले नाही अशांचा मात्र वीज पुरवठा अजूनही खंडितच आहे.वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई महावितरणला करावी लागत आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्यास संबंधित व्यक्तीची समाजात बदनामी होते. काही दिवस वीज पुरवठा खंडीतच राहिल्यास अंधारात रात्र काढून शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. थकीत वीज बिल भरण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे नियमित वीज बिल भरावे.- अशोक म्हस्के, अधीक्षक अभियंता, महावितरण गडचिरोली३६२ कर्मचारी मोहिमेवरवीज पुरवठा खंडित करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ३६२ कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली डिव्हिजनमधील २१० कर्मचारी व आलापल्ली डिव्हिजनमधील १५२ कर्मचाºयांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी डिव्हिजनमध्येही १२३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. वीज बिल भरण्याची तारीख संपूनही वीज बिल न भरलेल्या नागरिकांची माहिती घेऊन वीज पुरवठा खंडित केला जात आहे. वीज विभागाच्या या मोहिमेमुळे थकबाकीदार ग्राहकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला वीज भरण्याचा सल्ला सुध्दा काही लाईनमन थकबाकीदारांना देत आहेत.सहा कोटींच्या वसुलीचे आव्हानगडचिरोली व आलापल्ली विभागातील २७ हजार ७५८ नागरिकांकडे ५ कोटी ७८ लाख रूपयांचे वीज बिल थकले आहे. तेवढी रक्कम वसुली करणे वीज विभागासमोरील मोठे आव्हान आहे. थकबाकीचे प्रमाण कमी करण्यासाठीच वीज विभागाने वीज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली आहे.गडचिरोली उपविभागात ९९ लाख, आरमोरीत २५ लाख, देसाईगंज ५१ लाख, कुरखेडा ३६ लाख, धानोरा ३० लाख, कोरची १० लाख, आलापल्ली ११७ लाख, चामोर्शी ७३ लाख, एटापल्ली ४४ लाख, सिरोंचा ४४ लाख, मुलचेरा १५ लाख व भामरागड उपविभागात ३४ लाख रूपये थकीत आहेत.