शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

३७१ जैवविविधता समित्या स्थापन

By admin | Updated: May 24, 2014 23:37 IST

मागास आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गावकर्‍यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर ३७१ जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहे.

गडचिरोली : मागास आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गावकर्‍यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत तसेच गावपातळीवर ३७१ जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करून जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

स्थापन करण्यात आलेल्या ग्रामपंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समित्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील २५ समित्यांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यात ४, देसाईगंज तालुक्यात ७, कुरखेडा तालुक्यात १, कोरची तालुक्यात ८, धानोरा तालुक्यात १५, चामोर्शी तालुक्यात १६, मुलचेरा तालुक्यात २, अहेरी तालुक्यात १२, एटापल्ली तालुक्यात ३१ व भामरागड तालुक्यात १ जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. सिरोंचा तालुक्यात मात्र एकही समिती स्थापन करण्यात आली नाही.

गावपातळीवरील जैवविविधता समिती स्थापन करण्याच्या कामात एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी मोठा पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या तालुक्यात सर्वाधिक १0२ समित्या स्थापन करण्यात आले आहे. गडचिरोली तालुक्यात १३, आरमोरी ७, देसाईगंज ११, कुरखेडा ३, कोरची १९, धानोरा ४३, चामोर्शी ६, मुलचेरा ८, अहेरी ३१, भामरागड तालुक्यात ६ गावपातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत व गावपातळीवर सर्वाधिक १३३ समित्या स्थापन करून एटापल्ली या अतिदुर्गम तालुक्यातील नागरिकांनी जैवविविधतेचे महत्व पटवून दिले आहे.

राज्य शासनाने जैवविविधतेचे संवर्धन व्हावे यासाठी जैवविविधता कायदा पारित केला आहे. मात्र असे असतांनासुद्धा विदर्भातील अन्य तालुक्यांनी जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात उदासीनता दाखविली आहे. नागरिकांच्या सध्याच्या उपजिविकेच्या शाश्‍वतीसाठी आणि उपजिविकेच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी जैवविविधता व्यवस्थापनाची अतिशय गरज आहे. गडचिरोलीसारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात अनेक प्रकारची जैवविविधता आढळून येते. जिल्ह्यात ७८ टक्के वन, अनेक पशु, प्राणी, नदी, नाले, खनिज संपत्ती तसेच नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत. वनामध्ये अनेक प्रकारची वनौषधी आहे. जिल्ह्यात विविध प्रकारचे मासेही आहेत. या सर्व प्रकारच्या जैवविविधतेचे संवर्धन होण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्या मोलाचे कार्य करणार आहेत. यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)