शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

३७ शेतकरी कुटुंबांना मदतीपासून डावलले

By admin | Updated: December 17, 2015 01:35 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान शेती सातत्याने तोट्यात येत असल्याने पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे सत्र अजुनही सुरूच आहे.

गडचिरोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान शेती सातत्याने तोट्यात येत असल्याने पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे सत्र अजुनही सुरूच आहे. २००१ पासून मागील १५ वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी केवळ ३५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा लाभ राज्य सरकारकडून देण्यात आला. ३७ शेतकऱ्याचे कुटुंब या मदतीपासून वंचित राहिले आहेत. वारंवार प्रशासनाकडे मदतीसाठी अर्ज, विनंत्या केल्यानंतरही त्यांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे हे शेतकरी कुटुंब आता वाऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या वन कायद्यामुळे एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. नद्या असूनही नद्यांच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी होत नाही. धान हे प्रमुख पीक असून निसर्गाच्या भरवशावर खरीप हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. परंतु मागील पाच-सात वर्षांत पावसाचा लहरीपणा व धानाला उत्पादन खर्चाएवढा न मिळणारा भाव यामुळे धान शेती तोट्यात आहे. २००१ पासून गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चामोर्शी तालुक्यातील घारगावमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून एक लाख रूपयाची मदत दिली जाते. मदतीसाठी शेतकऱ्याची आत्महत्या पात्र ठरविण्याकरिता जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीने गडचिरोली जिल्ह्यात केवळ ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्याच पात्र ठरवून त्यांना आर्थिक मदत दिली आहे. उर्वरित शेतकरी हे कर्जबाजारीपणा, नापिकी व व्यसन यामुळे मरण पावलेले नाहीत. काही शेतकरी हे आजाराने व व्यसनाधीनतेमुळे मरण पावले, असा ठप्पा शासनाच्या समितीने त्यांच्यावर मारल्याने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळालेली नाही. अनेकदा राज्याचे मंत्री, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, आमदार, खासदार यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले. परंतु अजुनपर्यंत यांच्या मदतीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुुंब वाऱ्यावर आहे. बँकांकडून त्यांनी कर्ज घेतले नसले तरी बचतगट व गावातील सावकार, श्रीमंत लोक यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतले होते, अशी माहिती चौकशीत पुढे आली असतानाही यांना मात्र आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कुटुंबांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)