शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

३७ शेतकरी कुटुंबांना मदतीपासून डावलले

By admin | Updated: December 17, 2015 01:35 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान शेती सातत्याने तोट्यात येत असल्याने पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे सत्र अजुनही सुरूच आहे.

गडचिरोली : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान शेती सातत्याने तोट्यात येत असल्याने पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे सत्र अजुनही सुरूच आहे. २००१ पासून मागील १५ वर्षात गडचिरोली जिल्ह्यात ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी केवळ ३५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा लाभ राज्य सरकारकडून देण्यात आला. ३७ शेतकऱ्याचे कुटुंब या मदतीपासून वंचित राहिले आहेत. वारंवार प्रशासनाकडे मदतीसाठी अर्ज, विनंत्या केल्यानंतरही त्यांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे हे शेतकरी कुटुंब आता वाऱ्यावर आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १९८० च्या वन कायद्यामुळे एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. नद्या असूनही नद्यांच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचनासाठी होत नाही. धान हे प्रमुख पीक असून निसर्गाच्या भरवशावर खरीप हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. परंतु मागील पाच-सात वर्षांत पावसाचा लहरीपणा व धानाला उत्पादन खर्चाएवढा न मिळणारा भाव यामुळे धान शेती तोट्यात आहे. २००१ पासून गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चामोर्शी तालुक्यातील घारगावमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून एक लाख रूपयाची मदत दिली जाते. मदतीसाठी शेतकऱ्याची आत्महत्या पात्र ठरविण्याकरिता जिल्हास्तरावर एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीने गडचिरोली जिल्ह्यात केवळ ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्याच पात्र ठरवून त्यांना आर्थिक मदत दिली आहे. उर्वरित शेतकरी हे कर्जबाजारीपणा, नापिकी व व्यसन यामुळे मरण पावलेले नाहीत. काही शेतकरी हे आजाराने व व्यसनाधीनतेमुळे मरण पावले, असा ठप्पा शासनाच्या समितीने त्यांच्यावर मारल्याने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळालेली नाही. अनेकदा राज्याचे मंत्री, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, आमदार, खासदार यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून निवेदन देण्यात आले. परंतु अजुनपर्यंत यांच्या मदतीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुुंब वाऱ्यावर आहे. बँकांकडून त्यांनी कर्ज घेतले नसले तरी बचतगट व गावातील सावकार, श्रीमंत लोक यांच्याकडून त्यांनी कर्ज घेतले होते, अशी माहिती चौकशीत पुढे आली असतानाही यांना मात्र आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे या कुटुंबांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)