शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
4
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
5
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
6
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
7
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
8
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
9
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
10
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
11
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
12
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
13
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
14
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
15
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
16
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
17
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
18
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
19
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
20
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट

३६७ गावांना दुष्काळी मदत

By admin | Updated: January 18, 2016 01:27 IST

२०१५ च्या खरीप हंगामातील धान पिकाचे अपुऱ्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.

पहिल्या टप्प्यात : १३ कोटी ९२ लाख रूपये तहसीलदारांकडे वर्गदिलीप दहेलकर गडचिरोली२०१५ च्या खरीप हंगामातील धान पिकाचे अपुऱ्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबरमध्ये घोषित केलेल्या नजर अंदाज आकडेवारीत ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आढळून आलेल्या सहा तालुक्यातील केवळ ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ९२ लाख रूपये पहिल्या टप्प्यात तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटी मंजूर केले आहेत. यापैकी शासनाने जिल्हा प्रशासनाला पहिल्या टप्प्यात १४ कोटी ३६ लाखांचा निधी गडचिरोली जिल्ह्यासाठी दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदर निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १३ मे २०१५ च्या परिपत्रकानुसार ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांना सदर दुष्काळी मदत देण्यात येणार आहे. गडचिरोली तालुक्यात एकूण १२७ गावे आहेत. या तालुक्यातील सर्वच १२७ गावे नजर अंदाज पैसेवारीनुसार दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यातील १८ हजार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गडचिरोलीच्या तहसील कार्यालयाकडे ६ कोटी २१ लाख रूपये वर्ग केले आहेत. धानोरा तालुक्याला ६ कोटी ३० लाख रूपये वर्ग करण्यात आले असून सदर रक्कम २१६ गावातील बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. मुलचेरा तालुक्यात १२ गावातील ४५० बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४० लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील सहा गावातील जवळपास ३०० बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २३ लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील चार गावातील शेतकऱ्यांसाठी नऊ लाख तर कुरखेडा तालुक्यातील दोन गावातील शेतकऱ्यांसाठी नऊ लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. मात्र शासनाने पहिल्या टप्प्यात अत्यल्प निधी दिल्यामुळे केवळ ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. सध्या तरी १ हजार ३२१ गावे दुष्काळी मदतीपासून दूर असल्याचे दिसून येत आहे.