शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

३६७ गावांना दुष्काळी मदत

By admin | Updated: January 18, 2016 01:27 IST

२०१५ च्या खरीप हंगामातील धान पिकाचे अपुऱ्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.

पहिल्या टप्प्यात : १३ कोटी ९२ लाख रूपये तहसीलदारांकडे वर्गदिलीप दहेलकर गडचिरोली२०१५ च्या खरीप हंगामातील धान पिकाचे अपुऱ्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबरमध्ये घोषित केलेल्या नजर अंदाज आकडेवारीत ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आढळून आलेल्या सहा तालुक्यातील केवळ ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ९२ लाख रूपये पहिल्या टप्प्यात तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटी मंजूर केले आहेत. यापैकी शासनाने जिल्हा प्रशासनाला पहिल्या टप्प्यात १४ कोटी ३६ लाखांचा निधी गडचिरोली जिल्ह्यासाठी दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदर निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १३ मे २०१५ च्या परिपत्रकानुसार ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांना सदर दुष्काळी मदत देण्यात येणार आहे. गडचिरोली तालुक्यात एकूण १२७ गावे आहेत. या तालुक्यातील सर्वच १२७ गावे नजर अंदाज पैसेवारीनुसार दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यातील १८ हजार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गडचिरोलीच्या तहसील कार्यालयाकडे ६ कोटी २१ लाख रूपये वर्ग केले आहेत. धानोरा तालुक्याला ६ कोटी ३० लाख रूपये वर्ग करण्यात आले असून सदर रक्कम २१६ गावातील बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. मुलचेरा तालुक्यात १२ गावातील ४५० बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४० लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यातील सहा गावातील जवळपास ३०० बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २३ लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील चार गावातील शेतकऱ्यांसाठी नऊ लाख तर कुरखेडा तालुक्यातील दोन गावातील शेतकऱ्यांसाठी नऊ लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. मात्र शासनाने पहिल्या टप्प्यात अत्यल्प निधी दिल्यामुळे केवळ ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. सध्या तरी १ हजार ३२१ गावे दुष्काळी मदतीपासून दूर असल्याचे दिसून येत आहे.