शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

गडचिरोलीच्या तलावात ३५ क्विंटल माश्यांचा मृत्यू

By admin | Updated: July 2, 2015 02:07 IST

येथील तलावातील दूषित पाण्यामुळे ३० ते ३५ क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे.

गडचिरोली : येथील तलावातील दूषित पाण्यामुळे ३० ते ३५ क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे संबंधित मत्स्य सहकारी संस्थेचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.गडचिरोली येथील फुटक्या देवळाच्या दक्षिणेस मोठा तलाव असून, गोकुळनगरापर्यंत या तलावाचा विस्तार आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित या तलावाचा समावेश होतो. काही मत्स्य सहकारी संस्था मासेमारीसाठी हा तलाव पाटबंधारे विभागाकडून लीजवर घेत असतात. यंदा हा तलाव वाल्मिकी मच्छिमार सहकारी संस्थेकडे आहे. या संस्थेने तलावात मागच्या वर्षी सोडलेले मत्स्यबीज मोठे झाले असून, माशांची विक्री केली जात आहे. परंतु मंगळवारपासून शेकडो मासे पाण्यावर तरंगताना आढळून येत आहेत. याशिवाय कित्येक क्विंटल मासे तळाशी आहेत. दूषित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या तलावातील गाळ उपसलेला नाही. शिवाय मलमूत्र आणि पानवनस्पतीच्या कुजण्यामुळेही तलावाचे पाणी दूषित झाले आहे. परिणामी शेकडो माशांचा मृत्यू झाला. रोहू, कतला, म्रिगल, सिप्रिनस, ग्रासकार्प असे अनेक प्रजातींचे मासे या तलावात सोडले होते. अनेक मासे तीन ते चार किलो वजनाचे होते. परंतु दूषित पाण्यामुळे ते मृत्यूमुखी पडल्याने वाल्मिकी मच्छिमार सहकारी संस्थेला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.विशेष म्हणजे, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामामुळे तसेच काही नागरिकांनी तलावाशेजारी अतिक्रमण करुन घरे बांधल्याने या तलावातील पाणी बाहेर जाण्यास मार्गच उरलेला नाही. परिणामी पाणी दूषित झाले.