शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

३४ टक्केच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:58 IST

जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते.

ठळक मुद्देखरिपातील पीक कर्जाची स्थिती : धान रोवणीचे काम संपले, कर्जाची मागणी मंदावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १८ हजार ८८४ शेतकºयांना ७५ कोटी ६९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे.कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी राष्टÑीयकृत बँकांना शेतकºयांना पीक कर्जाचे वितरण करणे बंधनकारक केले आहे. दरवर्षी खरीप हंगामाच्या पूर्वी संबंधित बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. किमान उद्दिष्टाएवढे किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कर्ज वितरण करणे अपेक्षित असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता राष्टÑीयकृत बँका कर्जाचे वितरण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बँकांना दिलेले उद्दिष्ट कधीच पूर्ण होत नाही. काही बँकातर एकाही शेतकºयाला कर्ज देत नसल्याची परिस्थिती आहे. अशा बँकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी होत असली तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने बँकेचे प्रशासन सरकारलाही जुमानत नसल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे खरीपात उत्पादन घेतले जाते. धान हे येथील प्रमुख व महत्त्वाचे पीक आहे. या पºहे टाकण्यापासून तर धानाची रोवणी, निंदन, कापणी, मळणी, यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. बँकांकडून घेतलेले कर्ज बिनव्याजी राहत असल्याने ते कर्ज शेतकºयांना परवडणारेही आहे. या कर्जावरील व्याज शासन बँकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे कृषी कर्जांमध्ये बँकांचा कोणताही तोटा नाही. मात्र बँकेचे प्रशासन शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने कर्ज वितरणाचे उद्दिष्ट कोणत्याच वर्षी गाठता येत नसल्याचे दिसून येते. बँकांना वेळोवेळी निर्देश दिल्यानंतरही बँका कर्ज वितरणास तयार होत नाही. ही अतिशय गंभीर बाब असल्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.कर्जमाफीचा परिणामकर्जमाफी होणार आहे याचा अंदाज शेतकºयांना जवळपास मार्च महिन्यापासून येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कर्जच भरले नाही. दरवर्षी नियमितपणे कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफीच्या अंदाजामुळे मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी त्यांना नवीन कर्ज उचलता आले नाही. ३१ जुलैपर्यंत मागील वर्षी सुमारे २२ हजार ९६७ शेतकºयांना कर्जाचे वितरण केले होते. तर यावर्षी केवळ १६ हजार ९०३ शेतकºयांना कर्ज वितरण झाले आहे. दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या अधिक कर्ज वितरण सदर बँक करते. यावर्षी मात्र १५ आॅगस्टपर्यंत केवळ ७१ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. धानाच्या शेतीत सर्वाधिक खर्च रोवणीसाठी येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी रोवण्याच्या पूर्वीच कर्जाचे उचल करतात. आता रोवणीची कामे संपली आहेत. त्यामुळे कर्जाची उचल होण्याची फार कमी शक्यता आहे.रोवणीची कामे आटोपलीरोवणीच्या कामासाठी सर्वाधिक खर्च येत असल्याने शेतकरी रोवणीपूर्वीच कर्ज घेतो. रोवणीची कामे आता आटोपली आहे. त्यामुळे कर्जाची मागणी मंदावणार आहे.