शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

३४ टक्केच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:58 IST

जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते.

ठळक मुद्देखरिपातील पीक कर्जाची स्थिती : धान रोवणीचे काम संपले, कर्जाची मागणी मंदावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३४ टक्केच कर्ज वाटप झाले आहे. बँकांना खरीप हंगामात १९४ कोटी ६२ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी १८ हजार ८८४ शेतकºयांना ७५ कोटी ६९ लाख रूपयांच्या कर्जाचे वितरण झाले आहे.कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारात उभा होऊ नये, यासाठी राष्टÑीयकृत बँकांना शेतकºयांना पीक कर्जाचे वितरण करणे बंधनकारक केले आहे. दरवर्षी खरीप हंगामाच्या पूर्वी संबंधित बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले जाते. किमान उद्दिष्टाएवढे किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात कर्ज वितरण करणे अपेक्षित असले तरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता राष्टÑीयकृत बँका कर्जाचे वितरण करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बँकांना दिलेले उद्दिष्ट कधीच पूर्ण होत नाही. काही बँकातर एकाही शेतकºयाला कर्ज देत नसल्याची परिस्थिती आहे. अशा बँकांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी होत असली तरी कोणतीही कारवाई होत नसल्याने बँकेचे प्रशासन सरकारलाही जुमानत नसल्याचे दिसून येते.गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाचे खरीपात उत्पादन घेतले जाते. धान हे येथील प्रमुख व महत्त्वाचे पीक आहे. या पºहे टाकण्यापासून तर धानाची रोवणी, निंदन, कापणी, मळणी, यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासते. त्यामुळे शेतकरी वर्गाला कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही. बँकांकडून घेतलेले कर्ज बिनव्याजी राहत असल्याने ते कर्ज शेतकºयांना परवडणारेही आहे. या कर्जावरील व्याज शासन बँकांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे कृषी कर्जांमध्ये बँकांचा कोणताही तोटा नाही. मात्र बँकेचे प्रशासन शेतकºयांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने कर्ज वितरणाचे उद्दिष्ट कोणत्याच वर्षी गाठता येत नसल्याचे दिसून येते. बँकांना वेळोवेळी निर्देश दिल्यानंतरही बँका कर्ज वितरणास तयार होत नाही. ही अतिशय गंभीर बाब असल्याने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.कर्जमाफीचा परिणामकर्जमाफी होणार आहे याचा अंदाज शेतकºयांना जवळपास मार्च महिन्यापासून येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कर्जच भरले नाही. दरवर्षी नियमितपणे कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफीच्या अंदाजामुळे मागील वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी त्यांना नवीन कर्ज उचलता आले नाही. ३१ जुलैपर्यंत मागील वर्षी सुमारे २२ हजार ९६७ शेतकºयांना कर्जाचे वितरण केले होते. तर यावर्षी केवळ १६ हजार ९०३ शेतकºयांना कर्ज वितरण झाले आहे. दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या अधिक कर्ज वितरण सदर बँक करते. यावर्षी मात्र १५ आॅगस्टपर्यंत केवळ ७१ टक्केच कर्ज वितरण झाले आहे. धानाच्या शेतीत सर्वाधिक खर्च रोवणीसाठी येतो. त्यामुळे बहुतांश शेतकरी रोवण्याच्या पूर्वीच कर्जाचे उचल करतात. आता रोवणीची कामे संपली आहेत. त्यामुळे कर्जाची उचल होण्याची फार कमी शक्यता आहे.रोवणीची कामे आटोपलीरोवणीच्या कामासाठी सर्वाधिक खर्च येत असल्याने शेतकरी रोवणीपूर्वीच कर्ज घेतो. रोवणीची कामे आता आटोपली आहे. त्यामुळे कर्जाची मागणी मंदावणार आहे.