शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

मोफत प्रवेशासाठी ३११ विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 01:28 IST

बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळा व कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता पहिलीत एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो.

ठळक मुद्देआॅनलाईन लॉटरी पद्धतीने काढली सोडत : आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाची तिसरी फेरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बालकाचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील खासगी विनाअनुदानित शाळा व कॉन्व्हेंटमध्ये इयत्ता पहिलीत एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. या शासकीय योजनेची अंमलबजावणी जि. प. शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या वतीने सुरू करण्यात आली असून प्रवेशपात्र विद्यार्थी निवडीसाठी तिसऱ्या फेरीची मंगळवारी जि. प. सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यालयात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यानुसार इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी ३११ विद्यार्थ्यांची तिसºया टप्प्यात निवड करण्यात आली आहे.सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात सदर योजना आॅनलाईन पद्धतीने राबविली जात असून या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण ८३ शाळांमध्ये इयत्ता पहिलीत एकूण ८९७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.सदर योजनेंतर्गत पाल्यांचा प्रवेश करून घेण्यासाठी सुरूवातीला ५ मार्च २०१८ पर्यंत पालकांना आॅनलाईनरित्या प्रवेश अर्ज सादर करावयाची मुदत होती. त्यानंतर ही मुदत वाढविण्यात आली.२५ टक्के मोफत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या शाळांची यादी व त्या- त्या शाळेतील २५ टक्के मोफत प्रवेश क्षमता पाहण्यासाठी शासनाच्या वेबसाईटवर भेट द्यावी, असे आवाहन केले होते. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका स्तरावरील गटसाधन केंद्रामध्ये मदत केंद्र सुरू करण्यात आले. सदर योजनेंतर्गत वंचित गटातील एससी, एसटी व दिव्यांग मुलांना तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळतो. शासनाच्या निकषात बसणाऱ्या पालकांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकण्याची संधी या योजनेतून शासन उपलब्ध करून देत आहे. सदर योजनेंतर्गत गेल्या चार-पाच वर्षांपासून दुर्बल व वंचित घटकातील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.मंगळवारी तिसऱ्या फेरीची सोडत चिमुकल्या बालकांच्या हस्ते काढण्यात आले. यावेळी प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथ.) पी.एच.उरकुडे, योजनेचे जिल्हा समन्वयक भाऊराव हुकरे, सहायक प्रकल्प अधिकारी राजू आकेवार, संगणक प्रोग्रामर प्रफुल मेश्राम आदी उपस्थित होते. मेश्राम यांनी सोडतीची संपुर्ण प्रक्रिया पार पाडली.यंदा २५० वर जागा रिक्त राहणारआरटीई २५ टक्के मोफत प्रवेश योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८३ शाळांमध्ये २५ टक्के जागा रिक्त ठेवण्यात आल्या. २५ टक्क्यानुसार एकूण ८९७ जागा भरावयाच्या आहेत. यापूर्वी पहिली व दुसरी फेरीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर ३४५ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश केला. त्यानंतर रिक्त जागांसाठी तिसऱ्या फेरीची सोडत काढण्यात आली. यामध्ये ३११ विद्यार्थ्यांची निवड झाली. एकूण तीन फेऱ्या मिळून ६५६ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. सदर विद्यार्थी शाळांमध्ये आता प्रवेश घेणार आहेत. आणखी २५० वर जागा रिक्त राहणार आहेत. अनेक पालकांचा कल सीबीएससी माध्यमांच्या शाळांकडे आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डची शाळा मिळाली आहे. त्यामुळे असे विद्यार्थी सदर शाळेत प्रवेश घेतील, याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाच्या जागा रिक्त राहणार आहेत.