शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

२९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे२५६९ सदस्यांची होणार निवड : एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.मध्ये आचारसंहिता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतींपैकी २९१, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५६९ ग्रामपंचायत सदस्य आणि २९१ सरपंचांची निवड करण्यासाठी येत्या २९ मार्च रोजी मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले. ३० मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ही आचारसंहिता शिथिल होणार आहे.निवडणूक होणार असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक ७५ ग्रामपंचायती चामोर्शी तालुक्यातील, ६१ ग्रामपंचायती धानोरा तालुक्यातील तर ५१ ग्रामपंचायती गडचिरोली तालुक्यातील आहेत. त्यातून अनुक्रमे ५४१, २७८ आणि ३१७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. भामरागड तालुक्यात एकाही ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार नाही.विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आणि सरपंचांच्या जागा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातच उतरत नाहीत. दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या दबावामुळे निवडणूक लढण्यास कोणी तयार नसते. यावेळी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारांना उभे करून रिक्त असलेल्या आणि होणाऱ्या जागा भरण्यात प्रशासनाला किती यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमनिवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. दि.६ ते १३ मार्च यादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. दि.१६ ला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. दि.१८ ला दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. त्यांतर रिंगणात कायम असलेल्या सदस्यांसाठी दि.२९ मार्च रोजी मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि.३० ला मतमोजणी होणार आहे.यावेळी इच्छुकांची संख्या वाढणार?जातीच्या प्रमाणपत्रांअभावी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहात होते. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन जात प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत