शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२९१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे२५६९ सदस्यांची होणार निवड : एप्रिल ते जूनदरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रा.पं.मध्ये आचारसंहिता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतींपैकी २९१, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २५६९ ग्रामपंचायत सदस्य आणि २९१ सरपंचांची निवड करण्यासाठी येत्या २९ मार्च रोजी मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी सोमवारी राज्यभरातील जूनपर्यंत मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे सोमवारपासून संपूर्ण जिल्हाभरात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी सांगितले. ३० मार्च रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ही आचारसंहिता शिथिल होणार आहे.निवडणूक होणार असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक ७५ ग्रामपंचायती चामोर्शी तालुक्यातील, ६१ ग्रामपंचायती धानोरा तालुक्यातील तर ५१ ग्रामपंचायती गडचिरोली तालुक्यातील आहेत. त्यातून अनुक्रमे ५४१, २७८ आणि ३१७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. भामरागड तालुक्यात एकाही ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार नाही.विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सदस्य आणि सरपंचांच्या जागा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. परंतू जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातच उतरत नाहीत. दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या दबावामुळे निवडणूक लढण्यास कोणी तयार नसते. यावेळी या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारांना उभे करून रिक्त असलेल्या आणि होणाऱ्या जागा भरण्यात प्रशासनाला किती यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमनिवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. दि.६ ते १३ मार्च यादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्रे सादर करता येतील. दि.१६ ला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. दि.१८ ला दुपारी ३ वाजेपर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. त्यांतर रिंगणात कायम असलेल्या सदस्यांसाठी दि.२९ मार्च रोजी मतदान होईल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि.३० ला मतमोजणी होणार आहे.यावेळी इच्छुकांची संख्या वाढणार?जातीच्या प्रमाणपत्रांअभावी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहात होते. मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हा प्रशासनाने अनेक ठिकाणी शिबिरे घेऊन जात प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत