शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

२९ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

डिसेंबरअखेर शासनाने कर्जमुक्तीबाबत शासन निर्णय काढल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीबाबत जिल्ह्यात कामे सुरू झाली आहेत. दि.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान घेतलेले कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज मिळून रू.२ लाखापर्यंत रक्कम थकित असेल तेच शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । मे २०२० पूर्वी मिळणार लाभ; बँकेतील कर्जखात्यावरून तयार करणार लाभार्थींची यादी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यातील २९ हजार शेतकरी पात्र असून त्यांचे १३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँकांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचनाही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.डिसेंबरअखेर शासनाने कर्जमुक्तीबाबत शासन निर्णय काढल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीबाबत जिल्ह्यात कामे सुरू झाली आहेत. दि.१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या दरम्यान घेतलेले कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेल्या कर्जाची मुद्दल व व्याज मिळून रू.२ लाखापर्यंत रक्कम थकित असेल तेच शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत. अशा पात्र शेतक-यांची यादी तयार करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँका तसेच सेवा सहकारी सोसायट्या कामाला लागल्या आहेत. खासगी बँकांकडून पीक कर्ज घेणाऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.शेतकºयांना आधीच्या कर्जाफी योजनेप्रमाणे आॅनलाईन अर्ज करण्याची गरज नाही. बँकेने सादर केलेल्या कर्जाच्या रकमेवर व आधारशी जोडलेल्या आकडेवारीवर लाभार्थी निश्चित होतील. बँकांनी जाहीर केलेल्या पात्र याद्या तहसीलदार, बीडीओ, बँक शाखा कार्यालयांवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत, चावडीवर त्या लावल्या जातील. पात्र असूनही त्या यादीत आपले नाव नाही, असे कोणत्या शेतकऱ्याला वाटत असेल किंवा अपात्र शेतकºयाचे नाव यादीत आले असेल तर त्याबाबत तहसीलदारांकडे तशी तक्रार करता येईल.ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक कर्ज खात्याशी लिंक केले आहे त्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी कर्ज घेतलेल्या बँकेकडे आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स व मोबाईल क्र मांक सादर करून खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. विशेष म्हणजे नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे मासिक वेतन किंवा निवृत्तीवेतन मासिक २५ हजारपेक्षा जास्त असेल असे कर्जदार या योजनेच्या लाभासाठी अपात्र राहणार आहेत. पत्रकार परिषदेला सीईओ विजय राठोड व नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी उपस्थित होते.पत्रपरिषदेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँका, जिल्हा उपनिबंधक तसेच संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेऊन या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तातडीने नियोजन केले.आधार लिंक व प्रमाणीकरण करणे आवश्यककर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थीचे कर्ज खाते आधार कार्डसोबत लिंक करणे आवश्यक आहे. सध्या २९ हजार पात्र लाभार्थींपैकी २६ हजार खाती आधारशी जोडलेली आहेत. याशिवाय पात्रता यादीतील प्रत्येक लाभार्थ्याला आधार प्रमाणिकरणही करावे लागणार आहे. त्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन ते खाते त्याच लाभार्थ्याचे आहे किंवा नाही याची खात्री केली जाईल. हे प्रमाणिकरण झालेल्यांची नावे अंतिमत: पात्र समजले जातील. सध्या १७० ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. त्या ठिकाणच्या लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी इंटरनेट सुविधा असणाºया जवळच्या दुसºया केंद्रावर सोय केली जाणार आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज