शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

२,८२४ शेततळे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:30 IST

एका पाण्याने धानपीक मरू नये, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. मागील तीन वर्षात ८ हजार १६४ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ५ हजार ३४० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहेत. तर २ हजार ८२४ शेततळे अजुनही अपूर्ण आहेत.

ठळक मुद्दे८,१६४ अर्जांना मंजुरी: कृषी विभागामार्फत सूचना देऊनही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका पाण्याने धानपीक मरू नये, यासाठी शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. मागील तीन वर्षात ८ हजार १६४ लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी ५ हजार ३४० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले आहेत. तर २ हजार ८२४ शेततळे अजुनही अपूर्ण आहेत.गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. या पिकाला अगदी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतच सिंचनाची गरज भासते. मात्र सिंचनाची साधने अत्यंत मर्यादीत आहेत. तलाव, बोड्यांच्या माध्यमातून सिंचन केले जाते. तलाव, बोड्या आटल्यानंतर मात्र धान करपतेवेळी बघितल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर कोणताच पर्याय राहत नाही. अटीतटीच्या वेळी शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने शेततळे ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे मंजूर करून दिले जात आहेत. २०१६ ते २०१८-१९ या तीन वर्षाच्या कालावधीत कृषी विभागाने ८ हजार १६४ शेततळ्यांना कार्यारंभ आदेश दिले. तीन वर्षांच्या कालावधीत केवळ ५ हजार ३४० शेततळे पूर्ण झाले आहेत. २ हजार ८२3४ शेततळ्यांचे काम शिल्लक आहे. वेळेत काम पूर्ण करावे, याबाबत कृषी विभागातून वेळोवेळी शेतकऱ्यांना सुचिवले जात असले तरी शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेततळ्यांचे काम अपूर्णच राहिले आहे.शेततळ्यांबरोबरच आता शेतकरी बोडी दुरूस्तीची मागणी कृषी विभागाकडे करीत आहेत. शेततळ्यापेक्षा बोडी महत्त्वाची आहे.४२८ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेतशेततळा खोदणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुदान मिळण्यासाठी सर्वप्रथम शेततळा खोदणे आवश्यक आहे. शेततळा खोदल्याशिवाय अनुदानाची रक्कम कृषी विभाग संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करत नाही. शेतकऱ्यांनी स्वत:ची गरज लक्षात घेऊन पैसे उसणेवारी करून शेततळ्याचे काम पूर्ण केले. मात्र वर्ष उलटूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. अनुदासाठी वेळोवेळी कृषी विभागाच्या येरझारा घालाव्या लागत आहेत.शेततळे ठरताहेत कुचकामीसिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, या उद्देशाने शासनाने शेततळ्यांना मंजुरी दिली. शासन १०० टक्के अनुदान देत असल्याने शेतकऱ्यांनीही विचार न करता, शेततळे खोदून घेतले. मात्र पावसाळ्यात ज्यावेळी पाण्याची गरज राहत नाही, त्यावेळी शेततळा भरून राहतो. पाऊस जाताच मात्र शेततळा कोरडा पडत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळे ज्यावेळी धानाला पाण्याची गरज राहते, त्यावेळी शेततळ्याचे पाणी राहत नाही. शेततळ्यासाठी शेतीची जवळपास पाव एकर जागा गुंतते. यामध्ये उत्पादन घेणे शक्य होत नाही. हा अनुभव शेतकऱ्यांना यायला लागला असल्याने शेतकरी शेततळे खोदण्याकडे पाठ फिरवित आहेत.

टॅग्स :agricultureशेती