शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

२८ हजार क्विंटल बियाण्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST

२०२० च्या खरीप हंगामात जवळपास २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध ठिकाणची लागवड होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. २०२० च्या खरीप हंगामात २ लाख ३०० हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. धानासाठी प्रती एकरी ४० किलो बियाणांची गरज भासते. दरवर्षी शेतकरी एका विशिष्ट प्रमाणात बियाणे बदलवितात.

ठळक मुद्देखरिपासाठी मागणी : धानपिकाच्या बियाण्यांची सर्वाधिक आवश्यकता; कृषी विभागाने केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येत्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणाऱ्या खते, बियाणे, कीटकनाशके यांचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी २७ हजार ७३१ क्विंटल बियाणांची गरज भासणार आहे. तेवढी मागणी सार्वजनिक व खासगी कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे.२०२० च्या खरीप हंगामात जवळपास २ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध ठिकाणची लागवड होईल, असा अंदाज वर्तविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक धानपिकाची लागवड केली जाते. २०२० च्या खरीप हंगामात २ लाख ३०० हेक्टर क्षेत्रावर धानपिकाची लागवड होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. धानासाठी प्रती एकरी ४० किलो बियाणांची गरज भासते. दरवर्षी शेतकरी एका विशिष्ट प्रमाणात बियाणे बदलवितात. एकदा बियाणे खरेदी केल्यानंतर सदर बियाणे जवळपास तीन वर्ष शेतकरी वापरतात. त्यानंतर पुन्हा बियाणे बदलविले जातात. सदर बियाणे खरेदी केले जातात.२०२० च्या खरीप हंगामात धानाच्या एकूण २६ हजार ७४० क्विंटल बियाणांची गरज भासेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार सार्वजनिक कंपन्यांकडे १५ हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे. तर खासगी कंपन्यांकडे ११ हजार ७४० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.धानाबरोबरच सोयाबीन, तूर, कापूस, मका, उळीद, तीळ आदी पिकांची लागवड केली जाते. खासगी व सार्वजनिक कंपन्यांकडून खरेदी करण्यात आलेले बियाणे महाग राहते. त्यामुळे बरेचसे शेतकरी कंपन्यांकडून बियाणे खरेदी करण्याऐवजी स्वत:कडचे बियाणे वापरतात. बियाणांची लागवड करण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे या बियाणांचीही उगवण क्षमता अधिक राहते. त्यामुळे बहुतांश शेतकरी घरचेच बियाणे वापरतात.तुटवडा जावणार नाहीलॉकडाऊनच्या कालावधीतही केंद्र शासनाने शेतीशेतीवर आधारित उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही बियाणांवर प्रक्रिया करून ते पॉकेटबंद करण्याचे काम सुरूच होते. त्यामुळे बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नाही. काही कंपन्यांनी तर कृषी केंद्रांमध्ये बियाणांचा पुरवठा सुरू केला आहे. खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्यापूर्वी आवश्यक तेवढे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. शेतकºयांनी अधिकची किंमत मोजू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेती