शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

२६४ गावांचा संपर्क तुटणार

By admin | Updated: June 25, 2017 01:24 IST

पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा अद्याप थांगपत्ता नाही. मात्र पावसाळ्यातील दरवर्षीची संभाव्य

 अतिवृष्टीनंतरची स्थिती : पूरग्रस्त गावांमध्ये आधीच अन्नधान्य साठ्याची सोय लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : पावसाळा सुरू झाला असला तरी पावसाचा अद्याप थांगपत्ता नाही. मात्र पावसाळ्यातील दरवर्षीची संभाव्य परिस्थिती पाहता आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने आतापासून योग्य तरतूद केली आहे. जिल्ह्यात संवेदनशील क्षेत्रातील २६४ गावांचा संपर्क अतिवृष्टीनंतर तुटतो. त्या ठिकाणी शासनाच्या स्वस्त धान्य योजनेअंतर्गत धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी १७०० मीमी पाऊस पडते. गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. त्याचबरोबर नद्यांची संख्या सुद्धा अधिक आहे. नदीच्या काठावर अनेक गावे वसलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान पूरपरिस्थितीचा सामना या गावांना करावा लागतो. अनेक गावांना जाण्यासाठी अजूनही रस्ते नाही. त्याचबरोबर नदी, नाल्यावर उंच पूल बांधण्यात आले नाही. परिणामी पावसाळ्यात सुमारे चार महिने या गावांचा संपर्क तुटतो. या गावात राशनचे धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. हा अनुभव येथील जिल्हा प्रशासनाला असल्याने चार महिन्यांपूर्वीचे धान्य अगोदरच पोहोचता करून दिले जाते. विशेषकरून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा, कोरची, अहेरी या तालुक्यांमधील नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त भागातील गावांचा संपर्क तुटण्याची समस्या भेडसावते. भामरागडसमोरच्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान संपूर्ण भामरागड तालुक्याचाच संपर्क तुटतो. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपत्ती व्यवस्थापनाला पावसाळ्याच्या दिवसात विशेष जागृत राहून खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपत्ती व्यवस्थापन विभागाने योग्य नियोजन करून उपाययोजना केल्या आहेत. २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथरोगांना नियंत्रित करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर औषधीसाठा व साथ नियंत्रणसामग्रीची कीट उपलब्ध करण्यात आली आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत दिवसाचे २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. गेल्यावर्षीच्या बाधित क्षेत्रासाठी अद्याप मदत नाही गेल्यावर्षी (२०१६) जिल्ह्यातील २४७३ हेक्टर कृषी क्षेत्राला अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला होता. परंतू अद्याप शासनाकडून त्यासाठी कोणतीही मदत प्राप्त झालेली नाही. बाधित क्षेत्रात गडचिरोली तालुक्यातील १३.६५ हेक्टर, आरमोरी तालुक्यातील ६१.५८ हेक्टर, देसाईगंज तालुक्यातील १५.९३ हेक्टर, कुरखेडा तालुक्यातील ३९८.०१ हेक्टर, चामोर्शी तालुक्यातील १९४४.३३ हेक्टर, मुलचेरा तालुक्यातील ३७.६८ हेक्टर आणि एटापल्ली तालुक्यातील ३.८५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. शासनाकडून मदत मिळावी यासाठी आपद्ग्रस्तांनी अनेकवेळा अधिकारी व शासनाला निवेदन दिले आहे. मात्र वर्ष उलटूनही मदतीची प्रतीक्षा कायम आहे.