शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

२६ हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज; कृषिपंपधारकांना या योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:37 IST

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना : ७.५ एचपी क्षमतेपर्यंत मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कृषिपंपधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' राज्यात अमलात आणलेली आहे. जिल्ह्यातील ७.५ एचपी (अश्वशक्ती) क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. जिल्ह्यातील २६ हजार ५०० वर कृषिपंपधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' राबविली जात आहे. यामुळे कृषिपंप ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळ, पूर यासह विविध संकटांचा सामना करावा लागतो. हे संकट झेलताना शेतकऱ्यांना कृषिपंपाचे बिल भरण्यासाठी अडचणी येतात. परिणामी बिल थकीत राहते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनातर्फे ७.५ अश्वशक्तीपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे.

हे शेतकरी आहेत पात्र...७.५ एच.पी.पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक मोफत वीज योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.चक्राकार पद्धतीने कृषिपंपांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे.

असा आहे योजनेचा कालावधीमुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ५ वर्षांसाठी राबविली जात आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. मात्र, योजना सुरू होऊन ३ वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे.

२४,५२१ शेतकऱ्यांना देयक माफीमुळे दिलासाराज्य शासनाने कृषिपंपधारकांचे वीजबिल माफ करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. यानुसार जिल्ह्यातील २४ हजार ५२१ शेतकऱ्यांचे १२० कोटी रुपयांचे वीजबिल माफ होणार आहे 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाGadchiroliगडचिरोली