शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार कुटुंब चुलमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:07 IST

वन विभागा मार्फत मागील तीन वर्षात सुमारे २४ हजार ३६७ कुटुंबांना सिलिंडर गॅसचे वितरण केले आहे. त्यामुळे हे कुटुंब चूलमुक्त होण्याबरोबरच त्यांच्याकडून होणारी जंगलाची तोड थांबण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देवन विभागाचा उपक्रम : तीन वर्षांत जंगलातील गावांना गॅसचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन विभागा मार्फत मागील तीन वर्षात सुमारे २४ हजार ३६७ कुटुंबांना सिलिंडर गॅसचे वितरण केले आहे. त्यामुळे हे कुटुंब चूलमुक्त होण्याबरोबरच त्यांच्याकडून होणारी जंगलाची तोड थांबण्यास मदत झाली आहे.ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब सरपणाच्या मदतीने स्वयंपाक करतात. यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड होते. वन विभागाने कितीही कायदा कठोर केला तरी चुलीवर स्वयंपाक करावाच लागत असल्याने जंगलाची तोड केली जात होती. चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे महिलांना श्वसनाचे आजार होत असले तरी आठ ते दहा हजार रूपये किमतीचे गॅस सिलिंडर कनेक्शन सदर कुटुंब खरेदी करू शकत नसल्याने त्यांना चुलीवरच स्वयंपाक करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनातर्फे उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. वन विभागाच्या मार्फत सुध्दा गॅसचे वितरण केले जाते.वन विभागाने २०१५-१६ ते २०१७-१८ या तीन वर्षांच्या कालावधीत राज्य व जिल्हा योजनेंतर्गत सुमारे २४ हजार ३६७ कुटुंबांना गॅसचे वितरण केले आहे. अनुदानावर गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याने नागरिकांचाही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याबरोबरच काही सिलिंडर मोफत भरून दिले जात आहेत.काही कुटुंब मात्र अजुनही गॅसची प्रतीक्षा करीत आहेत. अगदी सुरूवातीला केवळ जंगलात असलेल्या गावांनाच मोफत गॅस कनेक्शनचा लाभ दिला जात होता. मात्र मागील वर्षीपासून जंगलाजवळ असलेल्या गावांनाही गॅस कनेक्शनचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढून तेवढीच जंगल तोड कमी होण्यास मदत झाली आहे.जंगलतोड थांबलीनागरिक मुख्यत: स्वयंपाक करण्यासाठीच जंगलाची तोड करीत होते. वन विभागाने कुटुंबांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. त्यामुळे सरपणासाठी लाकडाचा केला जाणारा वापर थांबला असल्याने जंगलाची तोडही थांबण्यास मदत झाली आहे. अगदी गरजवंत नागरिकच जंगलात जाऊन सरपण आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यातही वाळले लाकूड आणले जात असल्याने जंगलाची हानी होत नाही. वन विभागाने जंगलयुक्त गावात वन व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या आहेत. या वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातूनच गॅसचे वितरण केले जाते. सदस्यांना जंगलात रोजगार सुध्दा उपलब्ध करून दिला जात आहे. परिणामी नागरिकांना जंगलाचे महत्त्व कळत चालले असून नागरिक स्वत:हून जंगलाच्या रक्षणासाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग