शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

24 डी.एड्. कॉलेजला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर (१९६०) गाव तिथे शाळा हे धाेरण शासनाने अवलंबले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची भरती झाली. हे शिक्षक १९९५ पासून सेवानिवृत्त हाेण्यास सुरूवात झाले. त्यांची जागा भरण्यासाठी  दरवर्षी नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती हाेत हाेती. त्या कालावधीत डीएड् काॅलेजची संख्या कमी हाेती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी सुध्दा कमी हाेते. परिणामी डीएड्चे प्रशिक्षण पूर्ण हाेताच अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळत हाेती.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून शिक्षकभरती बंद; इतर अभ्यासक्रमांकडे वाढला कल

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एकेकाळी नाेकरीची हमखास हमी देणारा अभ्यासक्रम म्हणून डीएड् पदविकेची ओळख हाेती. मात्र मागील १० वर्षांमध्ये शिक्षक भरती रखडल्याने डीएड्चे प्रशिक्षण घेऊनही नाेकरी न मिळालेले हजारो युवक उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय करत आहेत. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थीच मिळत नसल्याने जिल्ह्यातील एकूण २५ डीएड् काॅलेजपैकी सुमारे २४ डीएड् काॅलेज बंद पडले आहेत. केवळ मुरखळा येथील एकमेव डीएड् काॅलेज सुरू आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर (१९६०) गाव तिथे शाळा हे धाेरण शासनाने अवलंबले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची भरती झाली. हे शिक्षक १९९५ पासून सेवानिवृत्त हाेण्यास सुरूवात झाले. त्यांची जागा भरण्यासाठी  दरवर्षी नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती हाेत हाेती. त्या कालावधीत डीएड् काॅलेजची संख्या कमी हाेती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी सुध्दा कमी हाेते. परिणामी डीएड्चे प्रशिक्षण पूर्ण हाेताच अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळत हाेती. परिणामी डीएड करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. जे विद्यार्थी स्पर्धेत टिकू शकत नव्हते असे विद्यार्थी डीएड् काॅलेजच्या व्यवस्थापन काेट्यातून  प्रवेश घेत हाेते. यासाठी १० वर्षांच्या पूर्वी दाेन ते अडीच लाख रुपये डाेनेशन म्हणून संस्थाचालकाला देत हाेते. २००५ मध्ये सर्वात माेठी भरती झाली. त्यानंतर मात्र प्राथमिक शिक्षकांच्या जागा निघणे कमी कमी हाेत गेले. मात्र या कालावधीत डीएड काॅलेजची संख्या व प्रशिक्षणार्थ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली हाेती. डीएड् करूनही नाेकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी युवकांनी डीएडच्या प्रशिक्षणाकडे पुन्हा पाठ फिरविली. दाेन वर्ष डीएड् करण्यापेक्षा इतर अभ्यासक्रम करण्यावर भर दिला. परिणामी डीएड् काॅलेजला विद्यार्थी मिळत नसल्याने हे काॅलेज बंद करावे लागले. गडचिराेली जिल्ह्यात एक शासकीय डीएड् काॅलेज व २४ विनाअनुदानित काॅलेज हाेते. सद्य:स्थितीत शासकीय डीएड् काॅलेजसह सुमारे २३ विनाअनुदानित काॅलेज बंद पडले आहेत. केवळ गडचिराेली जवळील मुरखळा येथील साईनाथ अद्यापक विद्यालय सुरू आहे. या अद्यापक विद्यालयात काही विद्यार्थ्यांनी प्रवेश सुध्दा घेतला आहे. डीएड् काॅलेज बंद पडल्याने या ठिकाणी काम करणारे शेकडाे प्राध्यापक बेराेजगार झाले आहेत.

टीईटीची मुदत संपली२०१३ मध्ये टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घेण्यात आली हाेती. नाेकरीसाठी ही परीक्षा पात्र असणे आवश्यक हाेते. या परीक्षेत लाखाे विद्यार्थी पात्र ठरले. भरती निघून नाेकरी लागेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र भरती निघाली नाही. सात  वर्षानंतर आता मुदतही संपली आहे.

मिळेल त्या क्षेत्रात कामप्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळणे कठीण आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर युवकांनी मिळेल ताे राेजगार व नाेकरी करण्यास सुरूवात केली. काही प्रशिक्षणार्थी आपला पारंपारीक व्यवसाय करीत आहेत. अनेक क्षेत्रात डीएड, बीएड, बीपीएड झालेले प्रशिक्षणार्थी काम करताना अजुनही दिसून येतात.

प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळेल या अपेक्षेने बारावीनंतर डीएड्चे प्रशिक्षण केले. प्रशिक्षण पूर्ण हाेऊन आता जवळपास आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र नाेकरी मिळाली नाही. त्यामुळे मला पारंपरिक पर्यायी व्यवसाय सुरू करावा लागला.- त्रिदेव जांभुळे, बेरोजगार तरुण

टॅग्स :Educationशिक्षण