शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

24 डी.एड्. कॉलेजला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर (१९६०) गाव तिथे शाळा हे धाेरण शासनाने अवलंबले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची भरती झाली. हे शिक्षक १९९५ पासून सेवानिवृत्त हाेण्यास सुरूवात झाले. त्यांची जागा भरण्यासाठी  दरवर्षी नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती हाेत हाेती. त्या कालावधीत डीएड् काॅलेजची संख्या कमी हाेती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी सुध्दा कमी हाेते. परिणामी डीएड्चे प्रशिक्षण पूर्ण हाेताच अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळत हाेती.

ठळक मुद्देअनेक वर्षांपासून शिक्षकभरती बंद; इतर अभ्यासक्रमांकडे वाढला कल

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : एकेकाळी नाेकरीची हमखास हमी देणारा अभ्यासक्रम म्हणून डीएड् पदविकेची ओळख हाेती. मात्र मागील १० वर्षांमध्ये शिक्षक भरती रखडल्याने डीएड्चे प्रशिक्षण घेऊनही नाेकरी न मिळालेले हजारो युवक उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय करत आहेत. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली आहे. प्रशिक्षणार्थी विद्यार्थीच मिळत नसल्याने जिल्ह्यातील एकूण २५ डीएड् काॅलेजपैकी सुमारे २४ डीएड् काॅलेज बंद पडले आहेत. केवळ मुरखळा येथील एकमेव डीएड् काॅलेज सुरू आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर (१९६०) गाव तिथे शाळा हे धाेरण शासनाने अवलंबले. त्यावेळी माेठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांची भरती झाली. हे शिक्षक १९९५ पासून सेवानिवृत्त हाेण्यास सुरूवात झाले. त्यांची जागा भरण्यासाठी  दरवर्षी नवीन प्राथमिक शिक्षकांची भरती हाेत हाेती. त्या कालावधीत डीएड् काॅलेजची संख्या कमी हाेती. त्यामुळे प्रशिक्षणार्थी सुध्दा कमी हाेते. परिणामी डीएड्चे प्रशिक्षण पूर्ण हाेताच अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळत हाेती. परिणामी डीएड करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. जे विद्यार्थी स्पर्धेत टिकू शकत नव्हते असे विद्यार्थी डीएड् काॅलेजच्या व्यवस्थापन काेट्यातून  प्रवेश घेत हाेते. यासाठी १० वर्षांच्या पूर्वी दाेन ते अडीच लाख रुपये डाेनेशन म्हणून संस्थाचालकाला देत हाेते. २००५ मध्ये सर्वात माेठी भरती झाली. त्यानंतर मात्र प्राथमिक शिक्षकांच्या जागा निघणे कमी कमी हाेत गेले. मात्र या कालावधीत डीएड काॅलेजची संख्या व प्रशिक्षणार्थ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली हाेती. डीएड् करूनही नाेकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी युवकांनी डीएडच्या प्रशिक्षणाकडे पुन्हा पाठ फिरविली. दाेन वर्ष डीएड् करण्यापेक्षा इतर अभ्यासक्रम करण्यावर भर दिला. परिणामी डीएड् काॅलेजला विद्यार्थी मिळत नसल्याने हे काॅलेज बंद करावे लागले. गडचिराेली जिल्ह्यात एक शासकीय डीएड् काॅलेज व २४ विनाअनुदानित काॅलेज हाेते. सद्य:स्थितीत शासकीय डीएड् काॅलेजसह सुमारे २३ विनाअनुदानित काॅलेज बंद पडले आहेत. केवळ गडचिराेली जवळील मुरखळा येथील साईनाथ अद्यापक विद्यालय सुरू आहे. या अद्यापक विद्यालयात काही विद्यार्थ्यांनी प्रवेश सुध्दा घेतला आहे. डीएड् काॅलेज बंद पडल्याने या ठिकाणी काम करणारे शेकडाे प्राध्यापक बेराेजगार झाले आहेत.

टीईटीची मुदत संपली२०१३ मध्ये टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घेण्यात आली हाेती. नाेकरीसाठी ही परीक्षा पात्र असणे आवश्यक हाेते. या परीक्षेत लाखाे विद्यार्थी पात्र ठरले. भरती निघून नाेकरी लागेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र भरती निघाली नाही. सात  वर्षानंतर आता मुदतही संपली आहे.

मिळेल त्या क्षेत्रात कामप्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळणे कठीण आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर युवकांनी मिळेल ताे राेजगार व नाेकरी करण्यास सुरूवात केली. काही प्रशिक्षणार्थी आपला पारंपारीक व्यवसाय करीत आहेत. अनेक क्षेत्रात डीएड, बीएड, बीपीएड झालेले प्रशिक्षणार्थी काम करताना अजुनही दिसून येतात.

प्राथमिक शिक्षकाची नाेकरी मिळेल या अपेक्षेने बारावीनंतर डीएड्चे प्रशिक्षण केले. प्रशिक्षण पूर्ण हाेऊन आता जवळपास आठ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र नाेकरी मिळाली नाही. त्यामुळे मला पारंपरिक पर्यायी व्यवसाय सुरू करावा लागला.- त्रिदेव जांभुळे, बेरोजगार तरुण

टॅग्स :Educationशिक्षण