शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'मग्रारोहयो'तील २३ घोटाळेबाज पाठीशी; दोषी आढळूनही कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:36 IST

विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये भामरागड, अहेरी व मुलचेरा या तीन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद सीईओंनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर चौकशी समितीने कामांची पाहणी करून २३ जणांवर ठपका ठेवला. मात्र, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे घोटाळेबाजांना नक्की कोण पाठीशी घालतंय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या कामांना जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुरी देतात. मात्र, या दोघांच्या संमतीशिवाय उपरोक्त तीन तालुक्यांत कोट्यवधींची कामे करण्यात आली. भामरागड तालुक्यात जिल्हास्तरावरून केवळ २० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी हाेती, पण गटविकास अधिकाऱ्यांनी ५ कोटी ६१ लाख रुपयांची कामे करून बिले मंजूर केली. मूलचेरा येथे २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर होता, तिथे ३ कोटी ४० लाखांची कामे करून निधीची विल्हेवाट लावल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

अहेरी तालुक्यातही असाच कित्ता घडला. सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये तक्रार केली. त्यानंतर जि. प. सीईओ कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रवींद्र कणसे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने चौकशी केली यात तिन्ही तालुक्यांतील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, तांत्रिक अधिकारी असे एकूण २३ जण दोषी आढळले. याचा अहवाल सीइओंना सादर केला, पण कारवाई न झाल्याने कडवे यांनी यासंदर्भात जि.प. सीईओ कुमार आशीर्वाद यांना संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व चौकशी समिती अध्यक्ष रवींद्र कणसे यांना संपर्क केला असता त्यांनीही भ्रमणध्वनी घेतला नाही.

थेट मंत्रालयातून मंजुरी

मग्रारोहयोची कामे जिल्हा यंत्रणेशिवाय होत नाहीत, पण भामरागड, अहेरी व मुलचेरा तालुक्यात झालेल्या कामांची मंजुरी थेट मंत्रालयातून आणली, बिलेही मंजूर करून घेतली. प्रत्यक्षात कमी किमतीची कामे जिल्हा यंत्रणेने मंजूर केली होती, परंतु कोट्यवधींची कामे करून निधी जिरवला, शिवाय ही कामे दर्जाहीन करून गैरव्यवहार केला, असा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

आधी चौकशीला, आता कारवाईला विलंब

जिल्हा परिषदेची यंत्रणा सुस्त आहे. तक्रार करूनही आधी चौकशीला दिरंगाई केली. चौकशीत २३ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले. त्यामुळे गांभीर्य ओळखून तत्काळ निलंबन, फौजदारी कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. एक अधिकाऱ्याने एक महिना फाईल स्वत:कडेच ठेवली, ती सीईओंपर्यंत जाऊन दिली नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केला आहे. कारवाईसाठी २७ मार्चपासून जि.प. समोर उपोषण सुरू आहे. आकाश मटामी, धनंजय डोईजड, नीळकंठ संदीकर, विकास भानारकर, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम आदी उपस्थित होते. कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीGadchiroliगडचिरोली