शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'मग्रारोहयो'तील २३ घोटाळेबाज पाठीशी; दोषी आढळूनही कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 15:36 IST

विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधींची उधळपट्टी

गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये भामरागड, अहेरी व मुलचेरा या तीन तालुक्यांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद सीईओंनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर चौकशी समितीने कामांची पाहणी करून २३ जणांवर ठपका ठेवला. मात्र, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नाही. त्यामुळे घोटाळेबाजांना नक्की कोण पाठीशी घालतंय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या कामांना जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुरी देतात. मात्र, या दोघांच्या संमतीशिवाय उपरोक्त तीन तालुक्यांत कोट्यवधींची कामे करण्यात आली. भामरागड तालुक्यात जिल्हास्तरावरून केवळ २० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी हाेती, पण गटविकास अधिकाऱ्यांनी ५ कोटी ६१ लाख रुपयांची कामे करून बिले मंजूर केली. मूलचेरा येथे २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर होता, तिथे ३ कोटी ४० लाखांची कामे करून निधीची विल्हेवाट लावल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

अहेरी तालुक्यातही असाच कित्ता घडला. सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये तक्रार केली. त्यानंतर जि. प. सीईओ कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रवींद्र कणसे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने चौकशी केली यात तिन्ही तालुक्यांतील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, तांत्रिक अधिकारी असे एकूण २३ जण दोषी आढळले. याचा अहवाल सीइओंना सादर केला, पण कारवाई न झाल्याने कडवे यांनी यासंदर्भात जि.प. सीईओ कुमार आशीर्वाद यांना संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व चौकशी समिती अध्यक्ष रवींद्र कणसे यांना संपर्क केला असता त्यांनीही भ्रमणध्वनी घेतला नाही.

थेट मंत्रालयातून मंजुरी

मग्रारोहयोची कामे जिल्हा यंत्रणेशिवाय होत नाहीत, पण भामरागड, अहेरी व मुलचेरा तालुक्यात झालेल्या कामांची मंजुरी थेट मंत्रालयातून आणली, बिलेही मंजूर करून घेतली. प्रत्यक्षात कमी किमतीची कामे जिल्हा यंत्रणेने मंजूर केली होती, परंतु कोट्यवधींची कामे करून निधी जिरवला, शिवाय ही कामे दर्जाहीन करून गैरव्यवहार केला, असा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे.

आधी चौकशीला, आता कारवाईला विलंब

जिल्हा परिषदेची यंत्रणा सुस्त आहे. तक्रार करूनही आधी चौकशीला दिरंगाई केली. चौकशीत २३ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले. त्यामुळे गांभीर्य ओळखून तत्काळ निलंबन, फौजदारी कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. एक अधिकाऱ्याने एक महिना फाईल स्वत:कडेच ठेवली, ती सीईओंपर्यंत जाऊन दिली नाही, असा दावा सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केला आहे. कारवाईसाठी २७ मार्चपासून जि.प. समोर उपोषण सुरू आहे. आकाश मटामी, धनंजय डोईजड, नीळकंठ संदीकर, विकास भानारकर, रवींद्र सेलोटे, चंद्रशेखर सिडाम आदी उपस्थित होते. कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीGadchiroliगडचिरोली