शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरसाठी २१५ रूपये तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:57 IST

एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देशिवशाहीचेही तिकीट महागले : १८ टक्के भाडेवाढीचा एसटी प्रवाशांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एसटीने तिकिटाच्या दरात १८ टक्के वाढ लागू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. जलद बसची गडचिरोली-नागपूरचे तिकीट यापूर्वी १८४ रूपये होते. आता २१५ रूपये जादा मोजावे लागणार आहेत.सातत्याने वाढत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी आर्थिक अडचणीत आली होती. त्याचबरोबर नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढही देण्यात आली. वाढत्या महागाईसोबत आर्थिक ताळमेळ जुडविण्यासाठी एसटीला भाडेवाढ करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार शुक्रवारी १८ टक्के भाडेवाढ जाहीर करण्यात आली. ही भाडेवाढ लागू सुध्दा करण्यात आली आहे. गडचिरोली आगारातून सर्वाधिक बसेस नागपूरसाठी सुटतात. यापूर्वी नागपूरचे प्रवास भाडे १८४ रूपये होते. भाडेवाढीनंतर ते आता २१५ रूपये करण्यात आले आहे. नवीन भाडेवाढीनुसार अहेरी-चंद्रपूरचे तिकीट १५५ रूपये, अहेरी-गोंडपिपरीमार्गे नागपूरचे तिकीट ३५० रूपये, अहेरी-गडचिरोली ८५ रूपये व अहेरी-यवतमाळ ३३८ रूपये करण्यात आली आहे.गडचिरोली आगारातून नागपूरसाठी शिवशाही बसेस सोडल्या जातात. शिवशाही बसेसच्याही भाड्यात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गडचिरोली-नागपूरचे शिवशाहीचे तिकीट २७३ रूपये होते. ते आता ३२० रूपये करण्यात आले आहे. गडचिरोली आगारातून शिवशाही बससेवा उन्हाळ्यात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शिवशाहीला काही प्रमाणात प्रवाशी मिळत होते. तरीही खासगी बसच्या तुलनेत भाडे अधिक आहे, अशी तक्रार होती. आता पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे वातानुकूलित वाहनाची प्रवाशांना पाहिजे तेवढी आवश्यकता नाही. अशातच भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे शिवशाहीला प्रवाशी मिळविताना चांगलीच अडचण जाणार आहे.एसटीनेही भाडेवाढ करीत महागाईत आणखी भर टाकली आहे. दुर्गम भागातील नागरिक, विद्यार्थी यांनाही भाडेवाढीचा फटका बसणार आहे.चिल्लरचा प्रश्न मिटविलायापूर्वी एसटीचे तिकीट अगदी किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे होते. त्यामुळे एक ते दोन रूपयांच्या चिल्लरचा तुटवडा निर्माण होत होता. प्रवाशी वाहकाच्या हातात सरळ ५० किंवा १०० ची नोट ठोकून तिकीटाचा हिशोब वगळता पैसे परत मागत होते. वाहकाकडे चिल्लर राहत नसल्याने बºयाच वेळा वादही होत होते. कित्येक वेळा चिल्लरसाठी एसटी बसथांब्यावर काही वेळ थांबवावी लागत होती. नवीन भाडेवाढीत चिल्लरचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाच रूपयांच्या पटीने भाववाढ करण्यात आली आहे. यानंतरची तिकीट १५, २०, २५ रूपये अशा स्वरूपात राहणार आहे. पाचच्या पटीतील पैसे वाहक सहज उपलब्ध करून देऊ शकेल. त्यामुळे चिल्लरसाठी होणारे वाद संपुष्टात येतील, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ