शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

यावर्षी २१४० जणांना हिवतापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:45 IST

राज्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे वाटप झाले. यावर्षीही १ लाख ६ हजार ३० मच्छरदाण्यांचे वाटप झाले असून अजूनही ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत.

ठळक मुद्देरुग्णांचे प्रमाण घटले : ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात सर्वाधिक हिवतापाचे रुग्ण आढळत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात गेल्यावर्षीपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छरदाण्यांचे वाटप झाले. यावर्षीही १ लाख ६ हजार ३० मच्छरदाण्यांचे वाटप झाले असून अजूनही ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक आहेत. मात्र तीन वर्षात पुरेशा प्रमाणात मच्छरदाण्या वाटप झाल्याने यावर्षी हिवतापाचे प्रमाण घटले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी लोकांना हिवतापाची लागण झाल्याची नोंद हिवताप नियंत्रण विभागाने घेतली आहे.७६ टक्के जंगलाचे क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात डासांचे प्रमाण जास्त असते. जंगलालगतच्या गावांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिवताप, डेंग्यूासारख्या डासजन्य आजारांचे रुग्ण आढळतात. वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने अनेक जण दगावतात. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून मलेरियाचा उद्रेक होणाऱ्या गावांमध्ये नागरिकांना मोफत मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात ४ लाखांपेक्षा अधिक मच्छरदाण्यांचे वाटप जिल्ह्यात झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून डासजन्य आजारांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. मच्छरदाण्या वाटण्याची केंद्र व राज्य सरकारकडून मच्छरदाण्यांचा पुरवठा केला जात असला तरी काही प्रमाणात स्थानिक स्तरावरही मच्छरदाण्यांची खरेदी झाली. ७९ हजार मच्छरदाण्या शिल्लक असल्यामुळे यातील काही मच्छरदाण्यांची खरेदी अनावश्यक ठरली आहे.१६६१ गावांत डासनाशकाची फवारणीडासांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाभरात डासनाशक औषधाची फवारणी केली जाते. यात १३ जून ते ५ सप्टेंबरदरम्यान राबविलेल्या पहिल्या टप्प्यात ४७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३७६ उपकेंद्रांतर्गत येणाºया १६६१ गावांमध्ये डासनाशक फवारण्यात आले. दुसºया टप्प्यात १७ सप्टेंबरपासून आतापर्यंत ७२६ गावांमध्ये फवारणी आटोपली आहे. आदिवासीबहुल गावांमध्ये लोक दिवसा घरी सापडत नसल्यामुळे सायंकाळी जाऊन फवारणी करावी लागत आहे. डासनाशक पचवण्याची डासांची क्षमता दरवर्षी वाढत असल्यामुळे दर तीन वर्षांनी औषध बदलविले जाते. सध्या लॅम्बडा (सायलोथ्रीन) या औषधाची फवारणी केली जात आहे.अर्ध्यावर आले हिवतापाचे प्रमाणयावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यात ४ लाख ६२ हजार १९६ रुग्णांचे रक्तनमुणे तपासण्यात आले. त्यापैकी २१४० जणांना हिवतापाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी याच कालावधीत ४११९ जणांना मलेरियाने ग्रासले होते आणि ४ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी घटलेले हिवतापाचे प्रमाण हे मच्छरदाण्यांचा वापर आणि योग्य फवारणीचा परिणाम असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Healthआरोग्य