शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२०८ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:39 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्दे१२६९ गावे दुष्काळसदृश नाहीत : अहेरी, भामरागड तालुक्यांनाच मिळणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.यावर्षीची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. परंतू काही तालुक्यांची माहिती येणे बाकी असल्यामुळे जिल्ह्याची पैसेवारी जाहीर करण्यास थोडा वेळ लागला. जिल्ह्यातील एकूण १६८८ गावांपैकी खरीप पिकांची गावे १५३९ आहेत. त्यापैकी पीक नसलेली गावे ६२ आहेत.एकूण लागवडीखाली असलेल्या १ लाख ८८ हजार ५४८.७५ हेक्टर क्षेत्रापैकी यावर्षी १ लाख ७२ हजार ५०८.७९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली होती.विशेष म्हणजे राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसूल मंडळात जिल्ह्यातील गावांचा समावेश नाही. शासनाकडून मागाहून त्या २०८ गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिरोंचा तालुक्यात सर्वात चांगली स्थितीअंतिम पैसेवारीनुसार यावर्षी अहेरी तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ११८ गावांमधील पैसेवारी ४६ पैसे आली आहे. भामरागड तालुक्यातील ९० गावांची पैसेवारी ५० च्या आत तर १६ गावांची ५० पेक्षा जास्त आहे. सिरोंचा तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक, म्हणजे ६८ पैसे आली आहे.