शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

२०८ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:39 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्दे१२६९ गावे दुष्काळसदृश नाहीत : अहेरी, भामरागड तालुक्यांनाच मिळणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.यावर्षीची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. परंतू काही तालुक्यांची माहिती येणे बाकी असल्यामुळे जिल्ह्याची पैसेवारी जाहीर करण्यास थोडा वेळ लागला. जिल्ह्यातील एकूण १६८८ गावांपैकी खरीप पिकांची गावे १५३९ आहेत. त्यापैकी पीक नसलेली गावे ६२ आहेत.एकूण लागवडीखाली असलेल्या १ लाख ८८ हजार ५४८.७५ हेक्टर क्षेत्रापैकी यावर्षी १ लाख ७२ हजार ५०८.७९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली होती.विशेष म्हणजे राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसूल मंडळात जिल्ह्यातील गावांचा समावेश नाही. शासनाकडून मागाहून त्या २०८ गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिरोंचा तालुक्यात सर्वात चांगली स्थितीअंतिम पैसेवारीनुसार यावर्षी अहेरी तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ११८ गावांमधील पैसेवारी ४६ पैसे आली आहे. भामरागड तालुक्यातील ९० गावांची पैसेवारी ५० च्या आत तर १६ गावांची ५० पेक्षा जास्त आहे. सिरोंचा तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक, म्हणजे ६८ पैसे आली आहे.