शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

२०८ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:39 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्दे१२६९ गावे दुष्काळसदृश नाहीत : अहेरी, भामरागड तालुक्यांनाच मिळणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामातील पीकांची अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ६२ पैसे आली आहे. मात्र अहेरी आणि भामरागड तालुक्यांमधील २०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्यामुळे त्या गावांना दुष्काळसदृश स्थितीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित १२६९ गावांमधील पीकांचा उतारा मात्र चांगला असल्याचे जाहीर करण्यात आले.यावर्षीची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबरपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. परंतू काही तालुक्यांची माहिती येणे बाकी असल्यामुळे जिल्ह्याची पैसेवारी जाहीर करण्यास थोडा वेळ लागला. जिल्ह्यातील एकूण १६८८ गावांपैकी खरीप पिकांची गावे १५३९ आहेत. त्यापैकी पीक नसलेली गावे ६२ आहेत.एकूण लागवडीखाली असलेल्या १ लाख ८८ हजार ५४८.७५ हेक्टर क्षेत्रापैकी यावर्षी १ लाख ७२ हजार ५०८.७९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली होती.विशेष म्हणजे राज्य शासनाने दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके व २६८ महसूल मंडळात जिल्ह्यातील गावांचा समावेश नाही. शासनाकडून मागाहून त्या २०८ गावांचा दुष्काळाच्या यादीत समावेश केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिरोंचा तालुक्यात सर्वात चांगली स्थितीअंतिम पैसेवारीनुसार यावर्षी अहेरी तालुक्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ११८ गावांमधील पैसेवारी ४६ पैसे आली आहे. भामरागड तालुक्यातील ९० गावांची पैसेवारी ५० च्या आत तर १६ गावांची ५० पेक्षा जास्त आहे. सिरोंचा तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक, म्हणजे ६८ पैसे आली आहे.