शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

२० ग्रामसभा मालामाल

By admin | Updated: September 28, 2015 01:34 IST

पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ व १९ आॅगस्ट २०१४ रोजीच्या राज्यपालांच्या ....

बांबू कापणी व विक्री : ८१ लाख कोषातदिलीप दहेलकर गडचिरोलीपंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६ व १९ आॅगस्ट २०१४ रोजीच्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना बांबू कापणी, व्यवस्थापन व विक्रीचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील पेसा हद्दीतील ग्रामसभांनी बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली आहे. यातून जिल्ह्यातील २० ग्रामसभा मालामाल झाल्या असून या ग्रामसभांच्या बँक कोषात निव्वळ नफ्याचे ८१ लाख ५४ हजार ९१८ रूपये जमा झाले आहेत.२०१४-१५ या वर्षात गडचिरोली, कुरखेडा, कोरची, एटापल्ली, भामरागड, धानोरा व अहेरी या सात तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतीमधील ३६ ग्रामसभांनी वन विभागाकडे प्रस्ताव सादर करून बांबू कापणी व विक्री करण्यासंदर्भात समर्थन दर्शविले. त्यानंतर ग्रामसभांनी प्रत्यक्ष बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील जळेगाव, जमगाव, काळशी, मारदा, जल्लेर, एटापल्ली तालुक्यातील वटेर, गट्टेपल्ली, येडसगोंदी, कोरची तालुक्यातील येडजाल, टेमली, गोडरी, भामरागड तालुक्यातील कृष्णार, कोसफुंडी, कोडपे, तिरकामेटा, धानोरा तालुक्यातील काकडयेली, हिपानेर, बंधूर, मुंगनेर, येणगाव आदी २० ग्रामसभांना समावेश आहे. जळेगाव ग्रामसभेने १९ हजार ९१५, जमगाव ४७ हजार १६, काळशी ३ हजार ४०, जल्लेर २३ हजार ५०८, वटेर १३ हजार ४५०, गट्टेपल्ली १ हजार ९६१, येडसगोंदी ३८ हजार ४७८, येडजाल १४ हजार १९५, कृष्णार ६ हजार ८१९, कोसफुंडी २२ हजार ८८४, कोडपे १४ हजार १७४, तिरकामेटा ४ हजार ९९६, टेमली ११ हजार ६७८, हिपानेर २ लाख ९१ हजार ८७०, बंधूर ५३ हजार ८०३, मुंगनेर १ लाख ४९ हजार ९९१ येनगाव ग्रामसभेने ९७ हजार मोठ्या व मध्यम बांबूची विक्री केली.३ कोटी ४२ लाखांची मजुरी वितरितजिल्ह्यातील २० ग्रामसभांनी वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्यरित्या बांबूची कापणी, व्यवस्थापन व विक्री केली. या बांबू विक्रीतून हजारो मजुरांना एकूण ३ कोटी ४२ लाख ४६ हजार २४६ रूपयांची मजुरी वितरित करण्यात आली आहे. जळेगाव ग्रामसभेने ७ लाख ५८ हजार ११०, जमगाव ३७ लाख ४१ हजार १२०, काळशी १ लाख १९०, जल्लेर २० लाख ४२ हजार ३०१, वटेर ८ लाख ७४ हजार २५०, गट्टेपल्ली १ लाख २७ हजार, येडसगोंदी २६ लाख ९३ हजार, ऐडजाल ९ लाख ९३ हजार, कृष्णार ४ लाख ७७ हजार, कोसफुंडी १६ लाख १ हजार, कोडपे ग्रामसभेने ९ लाख ९२ हजारांची मजुरी मजुरांना वितरित केली.मारदा ग्रामसभेच्या बांबूची उचल नाहीगडचिरोली तालुक्यातील मारदा ग्रामपंचायतीने २०१४-१५ यावर्षात बांबूची कापणी केली. लिलाव प्रक्रिया खोळंबल्याने या ग्रामसभेच्या बांबूची उचल झाली नाही. त्यामुळे या ग्रामसभेला बांबूतून रक्कम मिळाली नाही. कोषात पैसा जमा न झालेली मारदा ही एकमेव ग्रामसभा आहे.