शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

१९८६ पासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही

By admin | Updated: September 21, 2016 02:27 IST

अहेरी तालुक्यातील वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्प विभागातील रोजंदारी मजुरांची भविष्य निर्वाह निधीची कपात

वन विकास महामंडळाकडे रोजंदारीवर केले काम : तब्बल ३० वर्षांपासून रखडला प्रश्नआलापल्ली : अहेरी तालुक्यातील वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्प विभागातील रोजंदारी मजुरांची भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम देण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक वन व्यवस्थापक टी. जी. तायडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की, वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्पात १९८६ पासून बांबू कटाई, फाटे कटाई व रोजंदारीवर काम करीत असताना महामंडळाने १२ टक्के दराने भविष्य निर्वाह निधी कापला. त्याची साधी पावती मजुरांना दिलेली नाही. रोजंदारी रजिस्टरवर अंगठे लावण्यात येत होते. याची चौकशी करून ३० वर्षांपासून प्रलंबित असलेली रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे मुस्ताक हकीम, चंद्रकांत बेझलवार, राजू सलुजा, अज्जु पठाण, सलीम शेख, युवक काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बालाजी गावडे, बिरजू गावडे, बंडू सिडाम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वनहक्काबाबतच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाहीअहेरी तालुक्यात आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या केंद्र व राज्य योजना संनियंत्रण समितीचे जनसेवक मुस्ताक बब्बू हकीम यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथील वनहक्काचे प्रकरण २००८ मध्ये सादर करण्यात आले होते. ते गहाळ झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही आदिवासी शेतकऱ्यांना पट्टे मिळाले नाही. तर येलचील (कलेम) येथील आदिवासी शेतकऱ्यांना २०१२ मध्ये वनहक्काचे पट्टे मिळाले. परंतु चार वर्ष होऊनही त्यांच्या सातबाऱ्यावर नोंद घेण्यात आली नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही न्याय मिळालेला नाही. अहेरी तालुक्यातील नवेगाव, तानबोडी, शिवलिंगपूर येथील गैरआदिवासी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या वनहक्क समितीकडे प्रस्ताव दिला. परंतु तो अजुनही निकाली निघालेला नाही. अहेरी तालुक्यात निराधार लोकांची रक्कम सहकारी बँकांनी हडपल्याची तक्रार तहसीलदारांकडे देण्यात आली होती. परंतु बँकेवर अजुनही कारवाई झालेली नाही. अहेरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद क्षेत्रापैकी केवळ एकाच क्षेत्रातील नागरिकांना संपूर्ण योजनांचा लाभ दिला जात आहे, असा आरोपही हकीम यांनी केला आहे.