शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

१९८६ पासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली नाही

By admin | Updated: September 21, 2016 02:27 IST

अहेरी तालुक्यातील वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्प विभागातील रोजंदारी मजुरांची भविष्य निर्वाह निधीची कपात

वन विकास महामंडळाकडे रोजंदारीवर केले काम : तब्बल ३० वर्षांपासून रखडला प्रश्नआलापल्ली : अहेरी तालुक्यातील वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्प विभागातील रोजंदारी मजुरांची भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम देण्यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक वन व्यवस्थापक टी. जी. तायडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.या निवेदनात म्हटले आहे की, वन विकास महामंडळातील मार्र्कंडा वन प्रकल्पात १९८६ पासून बांबू कटाई, फाटे कटाई व रोजंदारीवर काम करीत असताना महामंडळाने १२ टक्के दराने भविष्य निर्वाह निधी कापला. त्याची साधी पावती मजुरांना दिलेली नाही. रोजंदारी रजिस्टरवर अंगठे लावण्यात येत होते. याची चौकशी करून ३० वर्षांपासून प्रलंबित असलेली रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे मुस्ताक हकीम, चंद्रकांत बेझलवार, राजू सलुजा, अज्जु पठाण, सलीम शेख, युवक काँग्रेसचे अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बालाजी गावडे, बिरजू गावडे, बंडू सिडाम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)वनहक्काबाबतच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाहीअहेरी तालुक्यात आदिवासी व गैरआदिवासी नागरिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या केंद्र व राज्य योजना संनियंत्रण समितीचे जनसेवक मुस्ताक बब्बू हकीम यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथील वनहक्काचे प्रकरण २००८ मध्ये सादर करण्यात आले होते. ते गहाळ झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही आदिवासी शेतकऱ्यांना पट्टे मिळाले नाही. तर येलचील (कलेम) येथील आदिवासी शेतकऱ्यांना २०१२ मध्ये वनहक्काचे पट्टे मिळाले. परंतु चार वर्ष होऊनही त्यांच्या सातबाऱ्यावर नोंद घेण्यात आली नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही न्याय मिळालेला नाही. अहेरी तालुक्यातील नवेगाव, तानबोडी, शिवलिंगपूर येथील गैरआदिवासी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या वनहक्क समितीकडे प्रस्ताव दिला. परंतु तो अजुनही निकाली निघालेला नाही. अहेरी तालुक्यात निराधार लोकांची रक्कम सहकारी बँकांनी हडपल्याची तक्रार तहसीलदारांकडे देण्यात आली होती. परंतु बँकेवर अजुनही कारवाई झालेली नाही. अहेरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद क्षेत्रापैकी केवळ एकाच क्षेत्रातील नागरिकांना संपूर्ण योजनांचा लाभ दिला जात आहे, असा आरोपही हकीम यांनी केला आहे.