शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

गडचिरोलीत आतापर्यंत १९ अधिकारी शहीद; नक्षलविरोधी अभियानात १९२ पोलीस कर्मचारी ठरले नक्षली हिंसेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 17:10 IST

नक्षलविरोधी अभियान राबविताना रविवारी (दि.१७) एका तरुण पोलीस उपनिरीक्षकासह एका जवानाला वीरमरण आले. आठ वर्षाच्या कालावधीनंतर नक्षलविरोधी अभियानात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला. यासोबतच नक्षली हिंसेत बळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या १९ तर जवानांची संख्या १९२ वर पोहोचली आहे.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविताना रविवारी (दि.१७) एका तरुण पोलीस उपनिरीक्षकासह एका जवानाला वीरमरण आले. आठ वर्षाच्या कालावधीनंतर नक्षलविरोधी अभियानात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला. यासोबतच नक्षली हिंसेत बळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या १९ तर जवानांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. आत्मसमर्पण आणि चकमकीत मरण पावणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढल्याच्या वैफल्यातून हे हिंसक कृत्य घडवून त्यांनी आणल्याचे दिसून येते.आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ३ उपनिरीक्षकांसह १० पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. त्याआधी ४ऑक्टोबर २०१० रोजी अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे नक्षल्यांनी आधी भूसुरूंग स्फोट घडवून नंतर गोळीबार केला होता. त्यात सीआरपीएफचे १ निरीक्षक, जिल्हा पोलीस दलाचे २ उपनिरीक्षक आणि एक जवान शहीद झाले होते. तत्पूर्वी ८ ऑक्टोबर २००९ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरीजवळ नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात जिल्हा पोलीस दलाच्या एका उपनिरीक्षकासह १६ कर्मचाऱ्यांना शहीद व्हावे लागले होते.

आजच्या बंदला आदिवासींचा फलकातून विरोध२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टीच्या जंगलात झालेल्या चकमकीत कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का पोलिसांच्या गोळीने ठार झाली होती. त्याचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी पोस्टर, बॅनर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. परंतू आदिवासी विकास सेवा समितीने अनेक ठिकाणी नक्षलविरोधी पोस्टर लावून बंदचे आवाहन धुडकावले आहे.

बदल्याची रणनितीदोन वर्षापूर्वी गडचिरोली पोलीस दलाने दोन दिवसात ४० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचा बदला म्हणून गेल्यावर्षी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी जांभुळखेडाजवळ भूसुरूंग स्फोट घडविला. त्यात १५ जवानांना शहीद व्हावे लागले. काही दिवसांपूर्वीच जहाल नक्षली सृजनक्का हिचा पोलिसांच्या गोळीने वेध घेतला. त्याचा बदला म्हणून नक्षल्यांनी रविवारी पोलीस दलावर हल्ला करून दोघांचा बळी घेतला.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी