शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

१७८ वैयक्तिक दावे मंजूर

By admin | Updated: July 27, 2014 23:44 IST

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील भूधारक नागरिकांकडून वैयक्तिक

वितरित होणार : एटापल्ली तालुक्यातील ५४ गावांचा समावेशएटापल्ली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील भूधारक नागरिकांकडून वैयक्तिक दाव्याचे प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने ५४ गावातील तब्बल १७८ वैयक्तिक दावे मंजूर केले आहे. या दाव्याचे वितरण सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत कार्यक्रमात करण्यात येणार आहे.मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक दाव्यांमध्ये एटापल्ली तालुक्यातील गेदा येथील १८, दालदा येथील ३, दिंडवी १, उमगट्टा १, सिनभट्टी २, मुगनेर १, वडसाकला ५, कसनसूर २, वेनासर १, कोताकोंडा १, कोथरी ४, गडेरी ४, पुन्नर १, वाघेझरी १, उडेरा ३, आलदंडी २, तुमरगुंडा (खु.) १, तुमरगुंडा (बु.) १, वासामुंडी १, जवेली २, तोडसा १, आलेगा १, पेठा २, ताटीगुड्डम २, येमली २, मंगुळा १, सेवारी १, हालेवारा २, मवली १, दोडहुर ३, मरकल २, बुर्गी १, वटेली १, गोरगुटा ४, जांभिया १, जाजावंडी १, मोडस्के १, गुर्रेवाडा ५, हाचबोडी ३, तागुड्डा १, कोईदवशी ३, घोटसूर १, कारका (बु.) १, भूमकान ७, ताटपल्ली २, चंदनवेली १, एकनसून १, टेका १, कोहका १, रोपी १, भगदंडी १, चोखेवाडा ४, कोटमी १, पेडी १, जीवनगट्टा १, कमके २, उमरगट्टा १, एकरा (बु.) ३८, झुरी १, मुसमराम गुडा १ व एटावाही या गावातील ३ दाव्यांचा समावेश आहे. राजस्व व इतर विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती प्राप्त करून नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी केले आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील वैयक्तिक दावे प्रशासनाकडे प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे वैयक्तिक दाव्याचे प्रस्ताव प्रशासनाने भूधारकांकडून मागविले होते. अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांनी उचित कार्यवाही करून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या सहकार्याने एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील तब्बल १७८ वैयक्तिक दावे निकाली काढले आहे. यामुळे या भूधारकांना दिलासा मिळाला आहे. वैयक्तिक दावे निकाली काढल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा तसेच कृषी योजनांचा लाभ घेता येणार आहे. प्रशासनाप्रती नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)