शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

१७८ वैयक्तिक दावे मंजूर

By admin | Updated: July 27, 2014 23:44 IST

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील भूधारक नागरिकांकडून वैयक्तिक

वितरित होणार : एटापल्ली तालुक्यातील ५४ गावांचा समावेशएटापल्ली : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील भूधारक नागरिकांकडून वैयक्तिक दाव्याचे प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने ५४ गावातील तब्बल १७८ वैयक्तिक दावे मंजूर केले आहे. या दाव्याचे वितरण सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत कार्यक्रमात करण्यात येणार आहे.मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक दाव्यांमध्ये एटापल्ली तालुक्यातील गेदा येथील १८, दालदा येथील ३, दिंडवी १, उमगट्टा १, सिनभट्टी २, मुगनेर १, वडसाकला ५, कसनसूर २, वेनासर १, कोताकोंडा १, कोथरी ४, गडेरी ४, पुन्नर १, वाघेझरी १, उडेरा ३, आलदंडी २, तुमरगुंडा (खु.) १, तुमरगुंडा (बु.) १, वासामुंडी १, जवेली २, तोडसा १, आलेगा १, पेठा २, ताटीगुड्डम २, येमली २, मंगुळा १, सेवारी १, हालेवारा २, मवली १, दोडहुर ३, मरकल २, बुर्गी १, वटेली १, गोरगुटा ४, जांभिया १, जाजावंडी १, मोडस्के १, गुर्रेवाडा ५, हाचबोडी ३, तागुड्डा १, कोईदवशी ३, घोटसूर १, कारका (बु.) १, भूमकान ७, ताटपल्ली २, चंदनवेली १, एकनसून १, टेका १, कोहका १, रोपी १, भगदंडी १, चोखेवाडा ४, कोटमी १, पेडी १, जीवनगट्टा १, कमके २, उमरगट्टा १, एकरा (बु.) ३८, झुरी १, मुसमराम गुडा १ व एटावाही या गावातील ३ दाव्यांचा समावेश आहे. राजस्व व इतर विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती प्राप्त करून नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी केले आहे.अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम २००६, नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या तरतुदीनुसार एटापल्ली तालुक्यातील वैयक्तिक दावे प्रशासनाकडे प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे वैयक्तिक दाव्याचे प्रस्ताव प्रशासनाने भूधारकांकडून मागविले होते. अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी देवेंद्रसिंह यांनी उचित कार्यवाही करून जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या सहकार्याने एटापल्ली तालुक्यातील ५४ गावातील तब्बल १७८ वैयक्तिक दावे निकाली काढले आहे. यामुळे या भूधारकांना दिलासा मिळाला आहे. वैयक्तिक दावे निकाली काढल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचा तसेच कृषी योजनांचा लाभ घेता येणार आहे. प्रशासनाप्रती नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)