शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१६६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:39 IST

महसूल विभागाने २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामाची अतिम पैसेवारी जाहीर केली असून एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे.

ठळक मुद्दे१४७९ गावांची तपासणी : धानोरा, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्यात स्थिती चांगली?

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महसूल विभागाने २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामाची अतिम पैसेवारी जाहीर केली असून एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. या गावांना दुष्काळग्रस्त घोषीत करून शासनाच्या नियमानुसार सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. पावसाळ्याच्या सुरूवातीला पाऊस पडला. शेतकºयांनी धानाची पºहे टाकली. त्यानंतर मात्र पावसाने १५ ते २० दिवस उसंत घेतली. या कालावधीत कडक ऊन पडत असल्याने काही शेतकºयांचे धानाचे पºहे सुकले. त्यानंतर आलेल्या पावसामुळे काही शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केली. त्यानंतरही पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. परिणामी सिंचनाअभावी धानपीक करपले.धानाचे पीक गर्भात असतानाच बहुतांश तालुक्यामध्ये मावा, तुडतुडा रोगाने धानपीक उद्ध्वस्त केले. काही शेतकऱ्यांनी तर धानपीक कापले सुध्दा नाही. त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. ज्यांचे धानपीक रोग कोरड्या दुष्काळाच्या चपाट्यातून बाहेर निघले. त्यांनाही पूर्ण उत्पादन झाले नाही. बहुतांश शेतकºयांना ५० टक्केच उत्पादन झाले आहे.महसूल व कृषी विभागाने केलेल्या पाहणीनंतर पैसेवारी जाहीर केली जाते. जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीपाचे उत्पादन घेतले जाते. ६० गावांमध्ये खरीपाचे उत्पादनच घेतले जात नाही. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७२ हजार ५०९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. तर १ हजार ३१३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे.उत्पादन ५० टक्केपेक्षा कमी असतानाही पैसेवारी अधिककमी पावसामुळे पडलेला दुष्काळ त्यानंतर तुडतुडा व मावा रोगाने धानपिकावर केलेले आक्रमण यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा उत्पादन कमी झाले आहे. मावा व तुडतुडा रोगाच्या प्रकोपाने धान करपल्याने काही शेतकऱ्यांनी धानपीक कापला सुध्दा नाही. अशाही परिस्थितीत सुमारे १ हजार ३१३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कार्यालयात बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने प्रत्यक्ष नुकसान त्यांच्या लक्षात येत नाही. परिणामी पीक परिस्थिती चांगली असल्याचा अहवाल सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते.देसाईगंज, आरमोरी तालुक्यातील पूर्ण गावांना लाभमहसूल विभागाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीत देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील पूर्ण गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. देसाईगंज तालुक्यात एकूण ३८ गावे आहेत. या संपूर्ण गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. आरमोरी तालुक्यातील संपूर्ण ९७ गावांची पैसेवारी ४६ पैसे दाखविण्यात आली आहे. उर्वरित गडचिरोली तालुक्यातील नऊ गावे, मुलचेरा तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील १० व सिरोंचा तालुक्यातील फक्त दोन गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे.दुष्काळग्रस्त गावांना मिळणाऱ्या सुविधाज्या १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. अशा गावांना दुष्काळग्रस्त घोषीत केले जाणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रूपये व बागायती शेतीसाठी १३ हजार ५०० रूपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर या गावांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात, वीज बिलात ३३ टक्के सूट, जमीन महसूलात सवलत दिली जाणार आहे. इतर गावे मात्र या लाभापासून वंचित राहणार आहेत.