शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

१६६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:39 IST

महसूल विभागाने २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामाची अतिम पैसेवारी जाहीर केली असून एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे.

ठळक मुद्दे१४७९ गावांची तपासणी : धानोरा, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्यात स्थिती चांगली?

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : महसूल विभागाने २०१७-१८ या वर्षातील खरीप हंगामाची अतिम पैसेवारी जाहीर केली असून एकूण १ हजार ६८८ गावांपैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. या गावांना दुष्काळग्रस्त घोषीत करून शासनाच्या नियमानुसार सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण खरीप क्षेत्राच्या सुमारे ८० टक्के क्षेत्रावर धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. धान पिकाला मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज भासते. पावसाळ्याच्या सुरूवातीला पाऊस पडला. शेतकºयांनी धानाची पºहे टाकली. त्यानंतर मात्र पावसाने १५ ते २० दिवस उसंत घेतली. या कालावधीत कडक ऊन पडत असल्याने काही शेतकºयांचे धानाचे पºहे सुकले. त्यानंतर आलेल्या पावसामुळे काही शेतकºयांनी धान पिकाची रोवणी केली. त्यानंतरही पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. परिणामी सिंचनाअभावी धानपीक करपले.धानाचे पीक गर्भात असतानाच बहुतांश तालुक्यामध्ये मावा, तुडतुडा रोगाने धानपीक उद्ध्वस्त केले. काही शेतकऱ्यांनी तर धानपीक कापले सुध्दा नाही. त्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. ज्यांचे धानपीक रोग कोरड्या दुष्काळाच्या चपाट्यातून बाहेर निघले. त्यांनाही पूर्ण उत्पादन झाले नाही. बहुतांश शेतकºयांना ५० टक्केच उत्पादन झाले आहे.महसूल व कृषी विभागाने केलेल्या पाहणीनंतर पैसेवारी जाहीर केली जाते. जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. त्यापैकी १ हजार ५३९ गावांमध्ये खरीपाचे उत्पादन घेतले जाते. ६० गावांमध्ये खरीपाचे उत्पादनच घेतले जात नाही. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७२ हजार ५०९ हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. तर १ हजार ३१३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले आहे.उत्पादन ५० टक्केपेक्षा कमी असतानाही पैसेवारी अधिककमी पावसामुळे पडलेला दुष्काळ त्यानंतर तुडतुडा व मावा रोगाने धानपिकावर केलेले आक्रमण यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना ५० टक्केपेक्षा उत्पादन कमी झाले आहे. मावा व तुडतुडा रोगाच्या प्रकोपाने धान करपल्याने काही शेतकऱ्यांनी धानपीक कापला सुध्दा नाही. अशाही परिस्थितीत सुमारे १ हजार ३१३ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कार्यालयात बसूनच कागदी घोडे नाचवत असल्याने प्रत्यक्ष नुकसान त्यांच्या लक्षात येत नाही. परिणामी पीक परिस्थिती चांगली असल्याचा अहवाल सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते.देसाईगंज, आरमोरी तालुक्यातील पूर्ण गावांना लाभमहसूल विभागाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीत देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील पूर्ण गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. देसाईगंज तालुक्यात एकूण ३८ गावे आहेत. या संपूर्ण गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. आरमोरी तालुक्यातील संपूर्ण ९७ गावांची पैसेवारी ४६ पैसे दाखविण्यात आली आहे. उर्वरित गडचिरोली तालुक्यातील नऊ गावे, मुलचेरा तालुक्यातील १०, कोरची तालुक्यातील १० व सिरोंचा तालुक्यातील फक्त दोन गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे.दुष्काळग्रस्त गावांना मिळणाऱ्या सुविधाज्या १६६ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. अशा गावांना दुष्काळग्रस्त घोषीत केले जाणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांना कोरडवाहूसाठी प्रती हेक्टर ६ हजार ८०० रूपये व बागायती शेतीसाठी १३ हजार ५०० रूपये मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर या गावांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात, वीज बिलात ३३ टक्के सूट, जमीन महसूलात सवलत दिली जाणार आहे. इतर गावे मात्र या लाभापासून वंचित राहणार आहेत.