शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

१६ हजार मेट्रिक टन खत शिल्लक

By admin | Updated: September 3, 2016 01:25 IST

धान गर्भात येताच शेतकरी वर्गाकडून युरीया तसेच इतर मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.

कृषी विभागाचे नियोजन : धान पिकासाठी युरियासह इतर खतांची मागणी वाढणारगडचिरोली : धान गर्भात येताच शेतकरी वर्गाकडून युरीया तसेच इतर मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दरवर्षीप्रमाणे खताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने अगोदरच तयारी करून ठेवली असून युरीयासह १५ हजार मेट्रिक ९९२ मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे.जुलै महिन्यात धानपिकाच्या रोवणीची कामे पूर्ण होतात. रोवणीच्या कामादरम्यान खत टाकले जाते. त्यानंतर धान गर्भात आल्यानंतर खत देणे आवश्यक आहे. त्यामुळे आॅगस्ट सप्टेंबर महिन्यात युरीयासह इतर मिश्रखतांची मागणी वाढते. विशेष करून युरीया खत टाकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. या कालावधीत शेतकऱ्यांकडून प्रचंड मागणी वाढत असल्याने युरिया खताचा तुटवडा निर्माण होतो. २०१६-१७ साठी २४ हजार २०० मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन मंजूर करण्यात आले. त्यापैकी १४ हजार ९८८ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले. ११ हजार ६५० मेट्रिक टन खताची प्रत्यक्ष विक्री झाली व मागील हंगामातील १ हजार ३४३ मेट्रिक टन खत शिल्लक होते. त्यामुळे शिल्लकी साठा आता ४ हजार ६८२ मेट्रिक टनवर पोहोचला आहे. यावर्षी अगदी सुरूवातीलाच दमदार पाऊस झाल्याने तलाव तुडूंब भरले व त्यानंतरही अधूनमधून पाऊस येत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत धानपीक चांगले असल्याने शेतकरी आनंदी आहे. थोडे जास्त खत टाकल्यास उत्पादनात वाढ होईल. या अपेक्षेने शेतकरी वर्ग या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत खताची जास्त खरेदी करणार आहे. ही बाब लक्षात घेऊन आणखी खत मागविले आहे. त्यामुळे किमान यावर्षी खताचा तुटवडा निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)एक हजार मेट्रिक टन युरिया खताची पडणार भरसद्य:स्थितीत जिल्हाभरात युरिया खताचा ४ हजार ६८२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तरीही पुढील १५ दिवसात युरिया खताची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने एक हजार मेट्रिक टन युरिया खताची मागणी केली आहे. सदर खत पुढील आठवड्यात उपलब्ध होण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा खत उपलब्ध झाल्यास युरियाचा जिल्हाभरातील साठा साडेपाच हजार मेट्रिक टनावर पोहोचणार आहे. योग्य नियोजनाची गरजयुरिया खताची मागणी एकावेळेस वाढत असल्याचा दरवर्षीचा अनुभव आहे. याचा फायदा कृषी केंद्र चालक उचलतात. खताचा कृत्रिम निर्माण करून शेतकऱ्यांकडून अधिकची रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न कृषी केंद्र चालकांकडून केला जातो. खत उपलब्ध असतानाही जाणूनबुजून शेतकऱ्यांची लूट होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने योग्य नियोजन करून प्रत्येक कृषी केंद्र चालकाकडे किती खत साठा उपलब्ध आहे, याची अद्यावत माहिती मागविणे गरजेचे आहे व संबंधित कृषी केंद्र चालकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे.