शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

१६ सिंचन विहिरीतून इनवेल बोअर गायब

By admin | Updated: May 31, 2016 01:28 IST

येथून जवळच असलेल्या शंकरनगर येथील १६ शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीवर इनवेल बोअर न मारता

जोगीसाखरा : येथून जवळच असलेल्या शंकरनगर येथील १६ शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीवर इनवेल बोअर न मारता ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित यंत्रणेने इनवेल बोअरसह बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून संपूर्ण रक्कम काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शंकरनगर येथे उघडकीस आला आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या ग्रामसभेत लाभार्थी शेतकऱ्यांनी सरपंच व ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला.शंकरनगर ग्रामपंचायतीअंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १६ सिंचन विहिरींना इनवेल बोअरसह मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र या १६ सिंचन विहिरीवर इनवेल बोअर मारण्यापूर्वीच सदर काम पूर्ण झाल्याचे ग्रा. पं. प्रशासनाच्या वतीने दाखविण्यात आले. विहीर बांधकाम होताच लगेच बोअर मारून दिला असता तर १६ शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली असती, परिणामी त्यांच्या हातातून पीक गेले नसते. स्वार्थापोटी ग्रा. पं. पदाधिकारी शेतकऱ्यांच्या वाट्याचा निधी आपल्या घशात घातला असल्याचे यावरून दिसून येत आहे. सुपचंद्र मुजुमदार या शेतकऱ्याची सिंचन विहीर ३३ फूट खोल खोदायची होती. २२ फूट खोल खोदकाम करून विहीर तयार करण्यात आली. १० फूट खोली शिल्लक असताना ३३ फूटाच्या खोलीसह सिंचन विहीर व इनवेल बोअरची एमबी तयार करण्यात आली. शंकरनगर ग्रा. पं. अंतर्गत सिंचन विहिरीचे काम स्वत: ग्रा. पं. सदस्य करीत आहेत. शेतकऱ्याने स्वत: या विहिरीचे बांधकाम करण्याचे हमीपत्र लिहून दिले तरी शेतकऱ्यांचे फारसे चालत नाही. देवदास ढाली या शेतकऱ्याने स्वत: विहिरीचे बांधकाम केले. त्यामुळे सन २०१४-१५ या वर्षात केवळ दोन मस्टर काढण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्याला विहीर बांधकाम करण्याची मुभा नाही. त्यामुळे पदाधिकारी स्वत: कंत्राटदार बनले आहेत. विहीर बांधकामाचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रति शेतकऱ्यांकडून २० हजार रूपये घेतले जात आहे. अर्थातच शेतकऱ्यांच्याच पैशातून विहिरीचे बांधकाम सुरू करण्याचा प्रकार येथे होत आहे. येथील सरपंचांनी सिंचन विहीर नियोजनात घेण्यातपूर्वीच एका शेतकऱ्याकडून चार हजार रूपये वसुल केल्याचे उघडकीस आले. अद्यापही त्या शेतकऱ्याची सिंचन विहीर मंजूर झाली नाही. तसेच सरपंचांनी त्या शेतकऱ्याला पैसेही परत केले नाही. उलट सरपंचाने संबंधित शेतकऱ्याकडून आपण पैसेच घेतले नाही, असे म्हणून ग्रामसभेत आरोप नाकारला. एका सिंचन विहिरीवर ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांना १ लाख रूपयांचा शुद्ध नफा होत आहे. इनवेल बोअरचे गायब केलेले पैसे परत करू अथवा बोअर मारून देऊ, असे ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच सुजीत मिस्त्री यांनी ग्रामसभेत सांगितले. मात्र प्रति बोअर १३ हजार ५०० रूपये उचल केल्यानंतर पुन्हा कोणत्या निधीतून बोअर मारून देणार, हा प्रश्न संबंधित शेतकरी लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे. सिंचन सुविधा असताना देखील पीक हातातून गेले आणि आता बोअर मारण्यासाठी पैसे आणायचे कुठून या विंवचनेत येथील शेतकरी सापडले आहेत. (वार्ताहर)४महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सिंचन विहिरीमधून इनवेल बोअर गायब करणाऱ्या संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर रोहयो कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी लाभार्थी रेखा फरकदार, उषा मंडल, कदम सरकार, क्रिष्णा मंडल, कालिपद सरकार, गौर मलिक, चितरंजन साना, तारापद मंडल, धीरेन दास, सुभद्रा बिश्वास यांनी ग्रामसभेत केली. दरम्यान इनवेल बोअर गायब केल्यामुळे एका महिला लाभार्थीचे अश्रू ग्रामसभेत अनावर झाले.ग्रीन जून २०१५ अंतर्गत मग्रा रोहयोचे पडघम, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, बीडीओ यांनी शंकरपूरनगर येथील चार सिंचन विहिरींची चौकशी केली. त्यावेळी पाणी पातळी चांगली होती. या विहिरीवर बोअर मारून देणे त्यांना कदाचित उचित वाटले नसेल, अथवा त्यांनी कोणत्या आधारे २७ विहिरींची सीसी केली, हे मला माहीत नाही. २७ सिंचन विहिरींपैकी १० विहिरींवर बोअर मारून देण्यात आले आहे. १७ विहिरी बोअर मारण्यापासून शिल्लक आहेत. मात्र बोअर न करताच सीसी का करण्यात आला, हा प्रश्न आमच्या पुढे देखील निर्माण झाला आहे. असे असले तरी दिवाळीनंतर लगेच बोअर मारण्याची कार्यवाही सुरू करू तसेच सिंचन सुविधा उपलब्ध करू.- सुजीत मिस्त्री, सरपंच, ग्रामपंचायत शंकरनगर