शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पुजाऱ्याच्या उपचारामुळे १६ दिवसांचे बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

एटापल्ली शहरापासून एक किमी अंतरावर टोला येथे ५० ते ६० घरांची वस्ती आहे. येथील रहिवासी सुनील पुंगाटी यांच्या पत्नीची प्रसूती एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात झाली. यावेळी मुलगा जन्माला आला. जन्मताच सदर नवजात बाळाला कावीळचे लक्षण दिसून आल्याने डॉक्टरांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्देएटापल्ली टोला येथील घटना : अंधश्रद्धेने घेतला बाळाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : अहेरी उपविभागाच्या आदिवासीबहुल भागात प्रशासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाची चमू लोकांच्या सेवेसाठी पोहोचत असली तरी या भागातील अशिक्षित आदिवासी नागरिकांच्या डोक्यातून अंधश्रद्धा जाताना दिसत नाही. अशाच एका घटनेत डॉक्टरऐवजी नवजात बालकावर पुजाºयाने उपचार केल्याने त्या बाळाला आपला जीव गमवावा लागला. जन्मत:च कावीळ झालेल्या बाळावर त्याच्या आईवडिलांनी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले नाही. पुजाºयाकडून सुरू असलेल्या उपचाराच्या भरवशावर राहिल्याने ३० डिसेंबर रोजी १६ दिवसांचे ते नवजात बाळ दगावले. ही घटना एटापल्ली टोला येथे उघडकीस आली आहे.एटापल्ली शहरापासून एक किमी अंतरावर टोला येथे ५० ते ६० घरांची वस्ती आहे. येथील रहिवासी सुनील पुंगाटी यांच्या पत्नीची प्रसूती एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात झाली. यावेळी मुलगा जन्माला आला. जन्मताच सदर नवजात बाळाला कावीळचे लक्षण दिसून आल्याने डॉक्टरांनी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्याचा सल्ला दिला. परंतु कुटुंबियांनी सदर बाळावर रुग्णालयात उपचार न करता स्वत:च्या घरी पुजारांकडून उपचार सुरू केले. दरम्यान ३० डिसेंबर रोजी मंगळवारला तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका सदर बाळाच्या घरी लसीकरणासाठी गेल्या त्यावेळी त्याची प्रकृती ठिक नसल्याचे दिसून आले. उपचाराबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारले असता पुजाऱ्यांकडून बाळावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. पुंगाटी कुटुंबियांची समजूत काढत त्या बाळाला रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला. परंतु कुटुंबियांनी बाळाला रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश वाहने यांना दिली. डॉ.वाहने यांनी स्वत: पुंगाटी यांच्या घरी जाऊन कुटुंबियांना समजावल्याचे सांगितले जाते. सुरूवातीला बाळाला रुग्णालयात नेण्यास कुटुंबियांनी नकार दिला. मात्र डॉ.वाहने यांनी या बाळाला मंगळवारी दुपारी १२.३० वाजता ग्रामीण रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान सायंकाळी ४.१० वाजता बाळाचा मृत्यू झाला.पुंगाटी यांच्या बाळाला कावीळ व इतर आजार होते. त्यामुळे सदर बाळाला पुढील उपचारासाठी आम्ही अहेरीला रेफर केले. परंतु नातेवाईक अहेरीला नेण्यास तयार नसल्याचे सांगितले व तसे लिहून दिले, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नटवरलाल शृंगारे यांनी दिली.वडील म्हणतात, दवाखान्यात आणल्याने मृत्यूदवाखान्यात उपचारासाठी आणल्यानेच बाळाचा मृत्यू झाला, असा गैरसमज वडिलांनी केला असून तसे वडील सुनील पुंगाटी यांनी दवाखान्यात बोलून दाखविले. एटापल्ली तालुक्याच्या दुर्गम व लांब अंतरावरील गावात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. दुर्गम भागात जनजागृतीचा अभाव आहे. मात्र एटापल्ली शहरापासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या टोला येथे ही घटना घडल्याने काही कुटुंब आरोग्याप्रती जागरूक नसल्याचे स्पष्ट होत आहे. अशिक्षित आदिवासी लोकांमध्ये अज्ञान व अंधश्रद्धा कायम असल्याने अशा घटना शहरानजीकही घडत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूhospitalहॉस्पिटल