शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१६९ गावांत होणार जलसंधारणाची कामे

By admin | Updated: April 14, 2016 01:33 IST

भाजपप्रणित राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याचा सन २०१६-१७ या वर्षाचा आराखडा विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे.

जलयुक्त शिवार : सन २०१६-१७ चा आराखडा मंजूरदिलीप दहेलकर गडचिरोलीभाजपप्रणित राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याचा सन २०१६-१७ या वर्षाचा आराखडा विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील १६९ गावांची निवड करण्यात आली असून या गावांच्या शेतशिवारात प्रशासनाच्या विविध विभागामार्फत जलसंधारणाची कामे मे महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तसेच सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानांतर्गत गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात १५२ गावांची निवड करण्यात आली. या गावांच्या शेतशिवारांमध्ये विविध प्रशासकीय यंत्रणेकडून कोट्यवधी रूपयांची जलसंधारणाची अनेक कामे झाली आहेत.सन २०१६-१७ च्या मंजूर आराखड्यानुसार निवड करण्यात आलेल्या १६९ गावांमध्ये जलसंधारणाची एकूण ६ हजार ६६९ कामे होणार आहेत.बाराही तालुक्यात कृषी, पंचायत समिती, जिल्हा परिषद लघु सिंचन, जलसंधारण, जलसंपदा व वनविभागाच्या वतीने जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. पावसाचे पाणी गावाच्या शेतशिवारात अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, यासह अनेक हेतुसाठी सदर योजना गडचिरोली जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ चा जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला विभागीय आयुक्तांनी मंजुरी प्रदान केली आहे. या आराखड्यात अस्तित्वात/मंजूर असलेल्या योजनेंतर्गतची कामे, नव्याने हाती घ्यावयाची कामे तसेच अस्तित्वातील जलस्त्रोताची दुरूस्ती व बळकटीकरण करणे आदी तीन प्रकारची कामे घेण्यात आली आहे. ११८ कोटी ९५ लाख लागणारजलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ वर्षातील मंजूर आराखड्यानुसार निवड करण्यात आलेल्या १६९ गावात जलसंधारणाची एकूण ६ हजार ६६९ कामे होणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला एकूण ११८ कोटी ९५ लाख ९८ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. यापैकी कृषी, पंचायत समिती, जि.प. लघुसिंचन, जलसंधारण विभाग, जलसंपदा व वन विभागाकडे काही निधी उपलब्ध आहेत. तर उर्वरित आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.