शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

१६९ गावांत होणार जलसंधारणाची कामे

By admin | Updated: April 14, 2016 01:33 IST

भाजपप्रणित राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याचा सन २०१६-१७ या वर्षाचा आराखडा विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे.

जलयुक्त शिवार : सन २०१६-१७ चा आराखडा मंजूरदिलीप दहेलकर गडचिरोलीभाजपप्रणित राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याचा सन २०१६-१७ या वर्षाचा आराखडा विभागीय आयुक्तांनी मंजूर केला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील १६९ गावांची निवड करण्यात आली असून या गावांच्या शेतशिवारात प्रशासनाच्या विविध विभागामार्फत जलसंधारणाची कामे मे महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यासह राज्यभरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तसेच सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षीपासून जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानांतर्गत गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात १५२ गावांची निवड करण्यात आली. या गावांच्या शेतशिवारांमध्ये विविध प्रशासकीय यंत्रणेकडून कोट्यवधी रूपयांची जलसंधारणाची अनेक कामे झाली आहेत.सन २०१६-१७ च्या मंजूर आराखड्यानुसार निवड करण्यात आलेल्या १६९ गावांमध्ये जलसंधारणाची एकूण ६ हजार ६६९ कामे होणार आहेत.बाराही तालुक्यात कृषी, पंचायत समिती, जिल्हा परिषद लघु सिंचन, जलसंधारण, जलसंपदा व वनविभागाच्या वतीने जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार आहे. पावसाचे पाणी गावाच्या शेतशिवारात अडविणे, भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे, यासह अनेक हेतुसाठी सदर योजना गडचिरोली जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ चा जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला विभागीय आयुक्तांनी मंजुरी प्रदान केली आहे. या आराखड्यात अस्तित्वात/मंजूर असलेल्या योजनेंतर्गतची कामे, नव्याने हाती घ्यावयाची कामे तसेच अस्तित्वातील जलस्त्रोताची दुरूस्ती व बळकटीकरण करणे आदी तीन प्रकारची कामे घेण्यात आली आहे. ११८ कोटी ९५ लाख लागणारजलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ वर्षातील मंजूर आराखड्यानुसार निवड करण्यात आलेल्या १६९ गावात जलसंधारणाची एकूण ६ हजार ६६९ कामे होणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला एकूण ११८ कोटी ९५ लाख ९८ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. यापैकी कृषी, पंचायत समिती, जि.प. लघुसिंचन, जलसंधारण विभाग, जलसंपदा व वन विभागाकडे काही निधी उपलब्ध आहेत. तर उर्वरित आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.