शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

१५ विमा प्रकरणे मंजूर

By admin | Updated: March 20, 2017 01:21 IST

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून

१२ प्रकरणांमध्ये आढळल्या त्रुट्या : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिलीप दहेलकर   गडचिरोली राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून सन २०१५-१६ मध्ये एकूण ५१ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तर १२ प्रकरणे त्रुट्यांमुळे प्रलंबित आहेत. भाजप प्रणित राज्य सरकारने शेतकरी हिताचे धोरण स्वीकारले असून शेतकरी कुटुंबीयांसाठी अनेक नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजना आखल्या आहेत. शेतकऱ्याचा अपघात होऊन जखमी वा मृत पावल्यास संबंधित लाभार्थ्यास नुकसान भरपाई म्हणून रोख रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने शासनाची ही योजना असून अपघाताच्या प्रकारानुसार संबंधित लाभार्थ्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. संकटाच्या वेळी शेतकरी कुटुंबाला आधार मिळावा या हेतुने राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गडचिरोली जिल्ह्यात केली जात आहे. सदर योजनेच्या लाभासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येते. १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत अपघात होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे एकूण ५१ प्रस्ताव या योजनेंतर्गत नुकसान भरपाईच्या लाभासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची कृषी अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यानंतर १५ प्रकरणे मंजूर करण्यात आले. तर तीन प्रकरणे नामंजूर करण्यात आले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुट्या आढळून आलेले १२ प्रकरणे संबंधित शेतकरी कुटुुंबांकडे प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकरी कुटुंब या प्रस्तावांमध्ये त्रुट्यांची पूर्तता करून कृषी कार्यालयाला हे प्रस्ताव नव्याने सादर करतील. त्यानंतर सदर प्रस्तावाची पडताळणी करून ते मंजूर करण्यात येणार आहे. ५१ पैकी उर्वरित २० प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे मंजुरीस्तव प्रलंबित आहे. या प्रस्तावासंदर्भात कृषी विभागाकडून संबंधित विमा कंपनीकडे संपर्क केला जात आहे. उर्वरित प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. आता राज्य शासनाच्या कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मुदत १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ अशी ठेवली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे व तशी संबंधित शेतकऱ्यांकडे संपूर्ण कागदपत्रे आहेत. अशा १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ चालू आर्थिक वर्षात मिळणार आहे. या योजनेमुळे अपघातग्रस्त शेतकऱ्याला दिलासा मिळतो. विम्यापासून असा मिळतो लाभ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास संबंधित लाभार्थ्यास एक लाख रूपये नुकसान भरपाई या योजनेंतर्गत दिली जाते. विमा संरक्षणासाठी समाविष्ट अपघात रस्ता/रेल्वे अपघात मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, खुन, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे अथवा चाव्यामुळे होणारे अपघाती मृत्यू तसेच इतर अपघाती घटनांमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळते.