शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

१५ विमा प्रकरणे मंजूर

By admin | Updated: March 20, 2017 01:21 IST

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून

१२ प्रकरणांमध्ये आढळल्या त्रुट्या : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिलीप दहेलकर   गडचिरोली राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून सन २०१५-१६ मध्ये एकूण ५१ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तर १२ प्रकरणे त्रुट्यांमुळे प्रलंबित आहेत. भाजप प्रणित राज्य सरकारने शेतकरी हिताचे धोरण स्वीकारले असून शेतकरी कुटुंबीयांसाठी अनेक नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजना आखल्या आहेत. शेतकऱ्याचा अपघात होऊन जखमी वा मृत पावल्यास संबंधित लाभार्थ्यास नुकसान भरपाई म्हणून रोख रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने शासनाची ही योजना असून अपघाताच्या प्रकारानुसार संबंधित लाभार्थ्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. संकटाच्या वेळी शेतकरी कुटुंबाला आधार मिळावा या हेतुने राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गडचिरोली जिल्ह्यात केली जात आहे. सदर योजनेच्या लाभासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येते. १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत अपघात होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे एकूण ५१ प्रस्ताव या योजनेंतर्गत नुकसान भरपाईच्या लाभासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची कृषी अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यानंतर १५ प्रकरणे मंजूर करण्यात आले. तर तीन प्रकरणे नामंजूर करण्यात आले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुट्या आढळून आलेले १२ प्रकरणे संबंधित शेतकरी कुटुुंबांकडे प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकरी कुटुंब या प्रस्तावांमध्ये त्रुट्यांची पूर्तता करून कृषी कार्यालयाला हे प्रस्ताव नव्याने सादर करतील. त्यानंतर सदर प्रस्तावाची पडताळणी करून ते मंजूर करण्यात येणार आहे. ५१ पैकी उर्वरित २० प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे मंजुरीस्तव प्रलंबित आहे. या प्रस्तावासंदर्भात कृषी विभागाकडून संबंधित विमा कंपनीकडे संपर्क केला जात आहे. उर्वरित प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. आता राज्य शासनाच्या कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मुदत १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ अशी ठेवली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे व तशी संबंधित शेतकऱ्यांकडे संपूर्ण कागदपत्रे आहेत. अशा १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ चालू आर्थिक वर्षात मिळणार आहे. या योजनेमुळे अपघातग्रस्त शेतकऱ्याला दिलासा मिळतो. विम्यापासून असा मिळतो लाभ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास संबंधित लाभार्थ्यास एक लाख रूपये नुकसान भरपाई या योजनेंतर्गत दिली जाते. विमा संरक्षणासाठी समाविष्ट अपघात रस्ता/रेल्वे अपघात मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, खुन, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे अथवा चाव्यामुळे होणारे अपघाती मृत्यू तसेच इतर अपघाती घटनांमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळते.