शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

१५ विमा प्रकरणे मंजूर

By admin | Updated: March 20, 2017 01:21 IST

राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून

१२ प्रकरणांमध्ये आढळल्या त्रुट्या : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिलीप दहेलकर   गडचिरोली राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यातून सन २०१५-१६ मध्ये एकूण ५१ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तर १२ प्रकरणे त्रुट्यांमुळे प्रलंबित आहेत. भाजप प्रणित राज्य सरकारने शेतकरी हिताचे धोरण स्वीकारले असून शेतकरी कुटुंबीयांसाठी अनेक नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजना आखल्या आहेत. शेतकऱ्याचा अपघात होऊन जखमी वा मृत पावल्यास संबंधित लाभार्थ्यास नुकसान भरपाई म्हणून रोख रूपये देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने शासनाची ही योजना असून अपघाताच्या प्रकारानुसार संबंधित लाभार्थ्यास शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. संकटाच्या वेळी शेतकरी कुटुंबाला आधार मिळावा या हेतुने राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गडचिरोली जिल्ह्यात केली जात आहे. सदर योजनेच्या लाभासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येते. १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ या कालावधीत अपघात होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे एकूण ५१ प्रस्ताव या योजनेंतर्गत नुकसान भरपाईच्या लाभासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची कृषी अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यानंतर १५ प्रकरणे मंजूर करण्यात आले. तर तीन प्रकरणे नामंजूर करण्यात आले. अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुट्या आढळून आलेले १२ प्रकरणे संबंधित शेतकरी कुटुुंबांकडे प्रलंबित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकरी कुटुंब या प्रस्तावांमध्ये त्रुट्यांची पूर्तता करून कृषी कार्यालयाला हे प्रस्ताव नव्याने सादर करतील. त्यानंतर सदर प्रस्तावाची पडताळणी करून ते मंजूर करण्यात येणार आहे. ५१ पैकी उर्वरित २० प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे मंजुरीस्तव प्रलंबित आहे. या प्रस्तावासंदर्भात कृषी विभागाकडून संबंधित विमा कंपनीकडे संपर्क केला जात आहे. उर्वरित प्रलंबित प्रस्ताव तत्काळ निकाली काढण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. आता राज्य शासनाच्या कृषी विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची मुदत १ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ अशी ठेवली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे व तशी संबंधित शेतकऱ्यांकडे संपूर्ण कागदपत्रे आहेत. अशा १० ते ७५ वयोगटातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ चालू आर्थिक वर्षात मिळणार आहे. या योजनेमुळे अपघातग्रस्त शेतकऱ्याला दिलासा मिळतो. विम्यापासून असा मिळतो लाभ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत संबंधित शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना नुकसान भरपाई म्हणून दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपये, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रूपयाचा लाभ दिला जातो. अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास संबंधित लाभार्थ्यास एक लाख रूपये नुकसान भरपाई या योजनेंतर्गत दिली जाते. विमा संरक्षणासाठी समाविष्ट अपघात रस्ता/रेल्वे अपघात मृत्यू, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, खुन, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे अथवा चाव्यामुळे होणारे अपघाती मृत्यू तसेच इतर अपघाती घटनांमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळते.