शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

विषबाधेने १५ शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:05 IST

तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिचोली येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन शेतकऱ्यांच्या घरानजीकच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या ११ शेळी व चार बकरे असे एकूण १५ पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.

ठळक मुद्देचिचोली येथील घटना : दोन पशुपालक शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुका मुख्यालयापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चिचोली येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास दोन शेतकऱ्यांच्या घरानजीकच्या गोठ्यात बांधून ठेवलेल्या ११ शेळी व चार बकरे असे एकूण १५ पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली.चिचोली येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या जंगलात चारायला नेल्या होत्या. सायंकाळी घरी गोठ्यात बांधून ठेवल्या. रात्री ८ वाजतापासून शेळ्यांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. हा प्रकार पाहून सदर शेतकºयांनी गोठ्यात धाव घेऊन पाहिले असता, शेळ्या आरडाओरड करून दोन्ही पायावर उभ्या होऊन खाली कोसळून तडफडून मृत्यूमुखी पडत असल्याचे दिसून आले. सदर प्रकार रात्री २ वाजेपर्यंत सुरू होता. या घटनेमुळे गिरीधर गावतुरे यांच्या मालकीचे दोन बोकड सहा शेळ्या तर हरीदास जेंगठे यांच्या मालकीचे दोन बोकड, नऊ शेळ्या अशी एकूण १५ जनावरे तडफडून मृत्यूमुखी पडली. या घटनेची माहिती २० जून रोजी धानोरा पं.स.च्या पशु विभागाला देण्यात आली. तेथील पशु संवर्धन अधिकारी डॉ. डी. एम. गोल्हेर यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावातील चार शेतकºयांच्या ३३ आजारी शेळ्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांनी औषधोपचार केला. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेळी व बकरी पालनाचा व्यवसाय करतात. अनेक शेतकरी खरीप हंगामात शेळ्या विकून प्राप्त झालेल्या पैशातून शेतीपयोगी अवजारे व कृषी निविष्ठा खरेदी करीत असतात. परंतु चिचोली येथे सदर घटना घडल्याने दोन शेतकऱ्यांवर ऐन खरीप हंगामात आर्थिक संकट कोसळले आहे. प्रशासन व शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गावतुरे व जेंगठे यांनी केली आहे. सदर १५ जनावरांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची माहिती पं.स.चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी.एम. गोल्हेर यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Farmerशेतकरी