शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

१४७ दुकानदारांची खत विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:08 PM

खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देपॉस मशीनचा परिणाम : जिल्हाभरात ३५३ दुकानदार करीत आहेत खताची विक्री

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खतविक्रीसाठी पॉस (पॉर्इंट आॅफ सेल) मशीन सक्तीची केल्याने यावर्षी नोंदणीकृत १४७ दुकानदारांनी खतविक्रीकडे पाठ फिरविली आहे.केंद्र शासन रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात अनुदान देते. यापूर्वी कंपनीने खतविक्रीचे बिल सादर केल्यानंतर संबंधित कंपनीला अनुदानाचा लाभ दिला जात होता. याचा गैरफायदा खत कंपन्या उचलत होत्या. आगाऊ विक्री दाखवून अनुदान लाटले जात होते. या प्रकारावर आळा घालण्यासाठी मागील वर्षीपासून शासनाने खतविक्रीसाठी पॉस मशीन सक्तीची केली आहे. पॉस मशीनमध्ये संबंधित शेतकऱ्याचा आधारकार्ड क्रमांक टाकला जातो व त्याचे थम्बही घेतले जाते. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय खतावरील अनुदान संबंधित कंपनीला मिळत नाही. त्यामुळे खतविक्रीसाठी केंद्र शासनाबरोबरच कंपन्यांनीही पॉस मशीनची सक्ती केली आहे.यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे नोंदणी केल्यानंतर खत विक्रीचा परवाना मिळत होता. या परवान्यावर खतविक्री केली जात होती. जिल्हाभरात ५०० खते विक्रेत्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी मागील वर्षी ३१४ व यावर्षी ३९ खतविक्रेत्यांनी पॉस मशीन खरेदी केली आहे. याचा अर्थ एवढेच दुकानदार खताची विक्री करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. १४७ दुकानदारांनी खतविक्रीचा व्यवसाय बंद केला असण्याची शक्यता आहे.पॉस मशीनचा वापर करण्यासाठी इंटरनेट सुविधा असणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये अजूनही इंटरनेटसेवा पोहोचली नाही. त्यामुळे पॉस मशीन काम करीत नसल्याने दुकानदारांना खतविक्रीच्या व्यवसायावर पाणी फेरावे लागले आहे. गावकऱ्यांनाही आता तालुकास्थळावरून खताची खरेदी करावी लागत आहे. पॉस मशीनमधूनच खताचे बिलही निघत असल्याने दुकानदार अधिकचे पैसे संबंधित शेतकऱ्याकडून घेऊ शकत नाही. परिणामी यापूर्वी शेतकऱ्यांची होणारी फसवणूकही थांबली असल्याने शेतकऱ्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहे.युरियाच्या बॅगचे वजन यावर्षीपासून ४५ किलोयुरियाची बॅग जरी शेतकऱ्यांना २७० रूपयांना मिळत असली तरी शासन या बॅगवर कंपनीला ४०० ते ५०० रूपयांचे अनुदान देते. कमी किमतीत खत मिळत असल्याने शेतकरी सर्वाधिक युरियाचा वापर करतात. युरिया हे रासायनिक खत आहे. रासायनिक खताचे जमीन व मानवी आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होण्याचा सर्वाधिक धोका राहतो. त्यामुळे रासायनिक खताचा वापर कमी होण्याच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकाऱ्यांना प्रती एकरी दोन ते तीन बॅग टाकण्याची सवय झाली आहे. बॅगचे वजन कमी केल्यास खताचा वापरही कमी होईल, अशी आशा शासनाला आहे. त्यामुळे शासनाने यावर्षीपासून युरियाच्या बॅगचे वजन ५० किलो ऐवजी ४५ किलो केले आहे.रासायनिक खताचा वापर टाळून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळविण्यासाठी शासनामार्फत शेतकºयांना मार्गदर्शन व अनुदानही दिले जात आहे.