शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

१४ गावांचा सिंचन प्रश्न सुटणार

By admin | Updated: September 24, 2014 23:34 IST

रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता.

गावकऱ्यांनी दिली चावी परत : पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे आश्वासनघोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त १४ गावातील नागरिकांनी मंगळवारी दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. यासंदर्भात बुधवारी चापलवाडा येथे ग्रामपंचायत सभागृहात सभा झाली. या सभेत १४ गावाच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी दिना कालव्याच्या कुलूपाची चावी अभियंत्याकडे सोपविली.बुधवारी चापलवाडा येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीला पाटबंधारे प्रकल्प अन्वेशन विभाग चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता बारापात्रे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी १४ गावातील शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. जि. प. सदस्य सोनटक्के यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून १४ गावाच्या शेतीला दिना प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पोहोचते किंवा नाही, याची शहानिशा करण्याची मागणी केली. यावर यासंदर्भात सर्व्हेक्षण करून याबाबतची माहिती १४ गावातील शेतकऱ्यांना देण्याची कबुली अभियंता सिंचाई उपविभाग चामोर्शी यांनी स्वीकारली. तसेच सर्व्हेक्षण पूर्ण करून डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.सर्व्हेक्षणाअंती दिना प्रकल्पाचे पाणी १४ गावाच्या शेतीला खरीप हंगामाला देण्याचे मान्य करण्यात आले. बैठकीला उपविभागीय अभियंता बांदे उपस्थित होते. तसेच सुरेश मोहुर्ले, गिरमा मोहंदा, रेवनाथ ठाकूर, गोपिनाथ बांकवार, गुरूदास पालकवार, सुधाकर मेकलवार, वसंत आत्राम, विलास ठाकूर, नानाजी पदा, केशव खोब्रागडे, नितेश कोहपरे, विलास चौधरी, चैतू हिचामी, काशिनाथ वैरागडे, विजय वाकडे, संजय वाकडे, केशव पोटावी आदी १४ गावातील शेतकरी उपस्थित होते. यापूर्वीही दोन ते तिनदा १४ गावातील शेतकऱ्यांनी आलटून पालटून दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. (वार्ताहर)