शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
Asia Cup Final : सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
3
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
4
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
5
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
6
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
7
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
8
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
9
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
10
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
11
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
12
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
13
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
14
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
15
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
16
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
17
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
18
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
19
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
20
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'

१४ गावांचा सिंचन प्रश्न सुटणार

By admin | Updated: September 24, 2014 23:34 IST

रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता.

गावकऱ्यांनी दिली चावी परत : पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे आश्वासनघोट : रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या कालव्याचे पाणी गेल्या अनेक वर्षापासून १४ गावातील शेतीला पुरविण्यात येत नव्हते. यामुळे या १४ गावातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत होता. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त १४ गावातील नागरिकांनी मंगळवारी दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. यासंदर्भात बुधवारी चापलवाडा येथे ग्रामपंचायत सभागृहात सभा झाली. या सभेत १४ गावाच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी दिना कालव्याच्या कुलूपाची चावी अभियंत्याकडे सोपविली.बुधवारी चापलवाडा येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीला पाटबंधारे प्रकल्प अन्वेशन विभाग चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता बारापात्रे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता बारापात्रे यांनी १४ गावातील शेतीला पाणी देण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. जि. प. सदस्य सोनटक्के यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून १४ गावाच्या शेतीला दिना प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पोहोचते किंवा नाही, याची शहानिशा करण्याची मागणी केली. यावर यासंदर्भात सर्व्हेक्षण करून याबाबतची माहिती १४ गावातील शेतकऱ्यांना देण्याची कबुली अभियंता सिंचाई उपविभाग चामोर्शी यांनी स्वीकारली. तसेच सर्व्हेक्षण पूर्ण करून डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत अहवाल सादर करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.सर्व्हेक्षणाअंती दिना प्रकल्पाचे पाणी १४ गावाच्या शेतीला खरीप हंगामाला देण्याचे मान्य करण्यात आले. बैठकीला उपविभागीय अभियंता बांदे उपस्थित होते. तसेच सुरेश मोहुर्ले, गिरमा मोहंदा, रेवनाथ ठाकूर, गोपिनाथ बांकवार, गुरूदास पालकवार, सुधाकर मेकलवार, वसंत आत्राम, विलास ठाकूर, नानाजी पदा, केशव खोब्रागडे, नितेश कोहपरे, विलास चौधरी, चैतू हिचामी, काशिनाथ वैरागडे, विजय वाकडे, संजय वाकडे, केशव पोटावी आदी १४ गावातील शेतकरी उपस्थित होते. यापूर्वीही दोन ते तिनदा १४ गावातील शेतकऱ्यांनी आलटून पालटून दिना प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला कुलूप ठोकले होते. (वार्ताहर)