शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

१४ हजार ३५४ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:18 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेतर्फे इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाभरात ४६ केंद्र : सहा भरारी पथकांची राहणार करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेतर्फे इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा २१ फेब्रुवारी बुधवारपासून घेण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुके मिळून या परीक्षेसाठी एकूण ४६ केंद्र ठेवण्यात आले असून या केंद्रांवरून जुने व नवे मिळूण एकूण १४ हजार ३५४ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यामध्ये १७६ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग विभागामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आली असून या केंद्रांची जबाबदारी विभागातील सर्व अधिकारी, केंद्र अध्यक्ष व मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे. शाळा स्तरावर शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.इयत्ता बारावीच्या परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकूण सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), डायटचे प्राचार्य यांचे एक व महिलांच्या एक स्वतंत्र पथकाचा समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात या परीक्षेसाठी एक विशेष पथक गठित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २२ फेब्रुवारी रोजी हिंदी, २३ फेब्रुवारीला मराठी, २४ फेब्रुवारीला सहकार, २६ फेब्रुवारीला कला शाखेचा सचिवाची कार्यपद्धती, राज्यशास्त्र तर विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. २८ फेब्रुवारीला वाणिज्य शाखेचा वाणिज्य व्यवस्थापन, कला शाखेचा इतिहास तर विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होणार आहे. ३ मार्चला गणित तर ६ मार्चला जीवशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात येणार आहे. ७ मार्चला कला शाखेचा कलाशास्त्र, ९ मार्चला अर्थशास्त्र, १३ मार्चला भूगोल तर १५ ते १७ मार्चदरम्यान माहिती तंत्रज्ञान विषयाचा पेपर होणार आहे.हे आहेत जिल्ह्यातील नवे परीक्षा केंद्रमहाराष्टÑ राज्य माध्यमिक तथा उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने राज्यभरातील परीक्षा केंद्राची यादी जाहीर करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही जुने परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले असून नव्या परीक्षा केंद्रास मान्यता देण्यात आली आहे. गतवर्षी गडचिरोली जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास ३६ परीक्षा केंद्र होते. मात्र यावर्षी परीक्षा केंद्राच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून पाच नवे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. या नव्या परीक्षा केंद्रांमध्ये भगवंतराव ज्युनिअर कॉलेज सिरोंचा, किसनराव खोब्रागडे कनिष्ठ महाविद्यालय वैरागड, देशबंधू चित्तरंजनदास येनापूर, विदर्भ कनिष्ठ महाविद्यालय पोटेगाव व भगवंतराव ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालय मुलचेरा आदी केंद्रांचा समावेश आहे.