शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

१२ हजार ९९६ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:09 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी यंदा ४१ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्याचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला टर्नींग पॉर्इंट मानले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे. सदर परीक्षा शांततेत पार पडण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ४१ केंद्रांवरून घेतली जाणार आहे. मागील वर्षी ४० परीक्षा केंद्र होते. यावर्षी वैरागड येथील एका केंद्राची भर पडली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थ्याला शूज घालून येण्यावर बंधन घालण्यात आले आहे. एकादा विद्यार्थी शूज घालून आल्यास त्याला ते शूज बाहेर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर परीक्षेदरम्यान गणक यंत्र, मोबाईल आदी वस्तूंच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. (नगर प्रतिनिधी)१७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणारदहावीची परीक्षा १ ते २९ मार्चपर्यंत चालणार आहे. ६९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. पोटेगाव येथील विदर्भ विद्यालय व कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील पांडव हायस्कूल हे दोन नवीन परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. जिल्हाभरातील १७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.पाच भरारी पथकांची निर्मिती४परीक्षेदरम्यान कॉपीला आळा घालण्यासाठी पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), महिलांचे पथक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकांचा समावेश आहे. या पथकांव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कधीही भेट देऊन परीक्षेचा आढावा घेऊ शकतात. त्यांच्या पथकालाही कॉपी करताना एखादा विद्यार्थी आढळून आल्यास त्याला निलंबित केले जाणार आहे. बैठे पथक, दक्षता समितीची राहणार नजरकॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीची परीक्षा व्हावी या हेतुने शिक्षण विभागाने प्रत्येक केंद्र स्तरावर बैठे पथकाची व्यवस्था केली आहे. याशिवाय परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. बैठे पथक व दक्षता समितीची कॉपीबहाद्दर परीक्षार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे.एकही परीक्षा केंद्र काळ्या यादीत नाही४मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेचे वातावरण तयार केले जात आहे. परीक्षेपूर्वी शिक्षण विभाग कॉपी न करण्याबाबत मार्गदर्शन करीत असल्याने कॉपी करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. दोन वर्षांपूर्वी जवळपास पाच परीक्षा केंद्र काळ्या यादीत टाकण्यात आले होते. या केंद्रांवर भरारी पथकांची विशेष नजर राहत होती. यावर्षी मात्र एकही केंद्र काळ्या यादीत टाकलेले नाही.