शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार ९९६ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:09 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी यंदा ४१ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्याचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला टर्नींग पॉर्इंट मानले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे. सदर परीक्षा शांततेत पार पडण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ४१ केंद्रांवरून घेतली जाणार आहे. मागील वर्षी ४० परीक्षा केंद्र होते. यावर्षी वैरागड येथील एका केंद्राची भर पडली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थ्याला शूज घालून येण्यावर बंधन घालण्यात आले आहे. एकादा विद्यार्थी शूज घालून आल्यास त्याला ते शूज बाहेर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर परीक्षेदरम्यान गणक यंत्र, मोबाईल आदी वस्तूंच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. (नगर प्रतिनिधी)१७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणारदहावीची परीक्षा १ ते २९ मार्चपर्यंत चालणार आहे. ६९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. पोटेगाव येथील विदर्भ विद्यालय व कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील पांडव हायस्कूल हे दोन नवीन परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. जिल्हाभरातील १७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.पाच भरारी पथकांची निर्मिती४परीक्षेदरम्यान कॉपीला आळा घालण्यासाठी पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), महिलांचे पथक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकांचा समावेश आहे. या पथकांव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कधीही भेट देऊन परीक्षेचा आढावा घेऊ शकतात. त्यांच्या पथकालाही कॉपी करताना एखादा विद्यार्थी आढळून आल्यास त्याला निलंबित केले जाणार आहे. बैठे पथक, दक्षता समितीची राहणार नजरकॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीची परीक्षा व्हावी या हेतुने शिक्षण विभागाने प्रत्येक केंद्र स्तरावर बैठे पथकाची व्यवस्था केली आहे. याशिवाय परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. बैठे पथक व दक्षता समितीची कॉपीबहाद्दर परीक्षार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे.एकही परीक्षा केंद्र काळ्या यादीत नाही४मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेचे वातावरण तयार केले जात आहे. परीक्षेपूर्वी शिक्षण विभाग कॉपी न करण्याबाबत मार्गदर्शन करीत असल्याने कॉपी करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. दोन वर्षांपूर्वी जवळपास पाच परीक्षा केंद्र काळ्या यादीत टाकण्यात आले होते. या केंद्रांवर भरारी पथकांची विशेष नजर राहत होती. यावर्षी मात्र एकही केंद्र काळ्या यादीत टाकलेले नाही.