शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

१२ हजार ९९६ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2016 03:09 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी यंदा ४१ केंद्रांवरून बारावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध विभागांमध्ये प्रवेश घेण्याचे मार्ग मोकळे होतात. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला टर्नींग पॉर्इंट मानले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे. सदर परीक्षा शांततेत पार पडण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कामाला लागला आहे. जिल्हाभरातून १२ हजार ९९६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा ४१ केंद्रांवरून घेतली जाणार आहे. मागील वर्षी ४० परीक्षा केंद्र होते. यावर्षी वैरागड येथील एका केंद्राची भर पडली आहे. परीक्षेदरम्यान कॉपीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी परीक्षेदरम्यान संबंधित विद्यार्थ्याला शूज घालून येण्यावर बंधन घालण्यात आले आहे. एकादा विद्यार्थी शूज घालून आल्यास त्याला ते शूज बाहेर ठेवावे लागणार आहे. त्याचबरोबर परीक्षेदरम्यान गणक यंत्र, मोबाईल आदी वस्तूंच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग कामाला लागला आहे. (नगर प्रतिनिधी)१७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणारदहावीची परीक्षा १ ते २९ मार्चपर्यंत चालणार आहे. ६९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. पोटेगाव येथील विदर्भ विद्यालय व कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा येथील पांडव हायस्कूल हे दोन नवीन परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. जिल्हाभरातील १७ हजार ३४५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. दहावीच्या परीक्षेचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.पाच भरारी पथकांची निर्मिती४परीक्षेदरम्यान कॉपीला आळा घालण्यासाठी पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), महिलांचे पथक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकांचा समावेश आहे. या पथकांव्यतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कधीही भेट देऊन परीक्षेचा आढावा घेऊ शकतात. त्यांच्या पथकालाही कॉपी करताना एखादा विद्यार्थी आढळून आल्यास त्याला निलंबित केले जाणार आहे. बैठे पथक, दक्षता समितीची राहणार नजरकॉपीमुक्त वातावरणात इयत्ता बारावीची परीक्षा व्हावी या हेतुने शिक्षण विभागाने प्रत्येक केंद्र स्तरावर बैठे पथकाची व्यवस्था केली आहे. याशिवाय परीक्षा केंद्रस्तरावर दक्षता समित्याही गठीत करण्यात आल्या आहेत. बैठे पथक व दक्षता समितीची कॉपीबहाद्दर परीक्षार्थ्यांवर करडी नजर राहणार आहे.एकही परीक्षा केंद्र काळ्या यादीत नाही४मागील दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेचे वातावरण तयार केले जात आहे. परीक्षेपूर्वी शिक्षण विभाग कॉपी न करण्याबाबत मार्गदर्शन करीत असल्याने कॉपी करणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. दोन वर्षांपूर्वी जवळपास पाच परीक्षा केंद्र काळ्या यादीत टाकण्यात आले होते. या केंद्रांवर भरारी पथकांची विशेष नजर राहत होती. यावर्षी मात्र एकही केंद्र काळ्या यादीत टाकलेले नाही.