बाॅक्स
मनाेधैर्य याेजनेला काेराेनाचा फटका
पीडितेचा अर्ज पाेलीस स्टेशनमार्फत जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणकडे प्राप्त झाल्यानंतर या अर्जाची शहानिशा केली जाते. गाेपनीय अहवाल मागविला जातो. दुसऱ्या याेजनेतून लाभ मिळाला नाही, याची खात्री केली जाते. त्यानंतर पुनर्वसन मंडळाची बैठक हाेऊन या बैठकीत पीडितेला किती मदत द्यायचे हे ठरविले जाते. पीडित महिलेला लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पुनर्वसन मंडळ प्रयत्न करतात. मात्र काेराेनामुळे जवळपास सात महिने पुनर्वसन मंडळाची बैठक झाली नाही. त्यामुळे या कालावधीतील पीडित महिलांना वेळेवर मदत मिळू शकली नाही. डिसेंबर महिन्यात पुनर्वसन मंडळाची सभा पार पडली. या सभेत आठ पीडितांना अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. मात्र अजूनपर्यंत त्याचे वितरण झाले नाही.
मनाेधैर्य याेजनेतून मदत
२०१९ - ७ लाखांची मदत
२०२० - ४.५० लाखांची मदत