शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

१०५ जोडपी होणार विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:39 IST

मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआज गडचिरोलीत सोहळा : पोलीस विभाग व मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात १०५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यामध्ये दोन आत्मसमर्पीत नक्षल्यांचा सुद्धा समावेश आहे, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ३२ हजार चौरस फुटावर भव्य विवाह मंडप व २० हजार चौरस फूटावर जेवनाचा मंडप उभारण्यात आला आहे. प्रत्येक समाजातील चालीरितीप्रमाणे विवाह करता यावा, यासाठी १० यज्ञकुंड ठेवले जाणार आहेत. कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडण्यासाठी १४ आयोजन समित्या तयार करण्यात आले आहेत. आयोजकांमार्फत जोडप्यांना पोशाख, नवरीला मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य, आईवडिलांना अहेर दिला जाणार आहे. वधू व वरांकडील प्रत्येकी १५ नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर २१० नवविवाहीत वधू-वरांची जेवणाची पंगत विशेष आकर्षण असणार आहे. सगळे विधी आटोपल्यानंतर वधू-वरांची वाजतगाजत पाठवणी केली जाईल.केवळ लग्न लावून दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली, अशी भूमिका न घेता या नवदाम्पत्यांचा संसार सुखाचा व्हावा, म्हणून लग्नानंतरही दीड वर्ष या जोडप्यांचे पालकत्व मैत्री परिवार स्वीकारणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला प्रा. प्रमोद पेंडके, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश चौगावकर, डॉ. शिवनाथ कुंभारे, साखरकर, सहायक धर्मदाय आयुक्त प्रताप सातव, निरंजन वासेकर, दिलीप ठाकरे, सम्राट वाघ, अनिल तिडके आदी उपस्थित होते.अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थितीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपमहानिरीक्षक सीआरपीएफ (अभियान) टी. शेखर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित राहतील.गडचिरोली शहरात पोलीस विभागाच्या वतीने पहिल्यांदाच १०५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यापूर्वी संबंधित जोडप्याचा विवाह झाला नाही, याची पोलीस विभागाने खात्री केली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

टॅग्स :marriageलग्न